शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांना मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण

By admin | Updated: July 1, 2014 23:32 IST

राज्यातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची वाट धरावी आणि त्यांच्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बदल घडविण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

आमगाव : राज्यातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची वाट धरावी आणि त्यांच्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बदल घडविण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यात आता आदिवासींच्या मुलांना उच्च शिक्षणाची दिशा मिळावी यासाठी शासनाने मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरु केले आहे. यात खासगी संस्थाही प्रतिसाद देत आहेत.शासनाने राज्यातील आदिवासी नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. आदिवासीबहुल परिसरातच त्यांना प्राथमिक ते उच्च शिक्षण मिळावे यासाठी शासकीय व खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे कार्य निरंतर शासनाकडून सुरु आहे. कालांतराने या विद्यार्थ्यांना शहरी भागातून मिळणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आपल्याकडे आकृष्ट केले. परंतु शैक्षणिक शुल्क व विविध अडचणींमुळे या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून शिक्षण घेणे कठीण होते. शासनाने आदिवासी नागरिकांच्या मुलांनाही केंद्रीय बोर्डाचे सीबीएसई, आयसीएसई या इंग्रजी माध्यमांचे शिक्षण देण्यासाठी योजना सुरू केली.सन २०१०-११ मध्ये शासनाने २४ प्रकल्पाअंतर्गत राज्यात या शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांसाठी सुरु केली. प्रारंभी ठाणे नाशिक, रामटेक, अमरावती या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करुन दिले. विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाचे अभ्यासक्रमात शासकीय आश्रम शाळा व खाजगी अनुदानीत शाळा नागपूर विभागात १५७ आहेत. यात प्राथमिक ते माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात ८० हजार ८६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाची सोय शाळेतच उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासन योजनेला अधिक बळकट करित आहे. परंतु आदिवासी मागास परिसरात इंग्रजी माध्यमांच्या शाळा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी संस्थानांकडे वळावे लागत आहे.आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या माध्यमांच्या बदलामुळे देवरी प्रकल्पातील १४० विद्यार्थी प्राथमिक शिक्षणातूनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळले आहेत. त्यामुळे आदिवासीं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी खाजगी संस्थानांचा प्रतिसाद मिळत आहे. (शहर प्रतिनिधी) युवकाची आत्महत्याआमगाव : रिसामा येथील ग्रा.पं.च्या विहिरीत उडी घेवून संतोष महाविरसिंग बैस (३२) यानी आत्महत्या केली. त्यांच्याकडे संपूर्ण कुटुंबाचा भार होता. ही घटना मंगळवार (१ जुलै) ला सकाळी ९ वाजता उघडकीस आली. सदर घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.