शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांना मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण

By admin | Updated: July 1, 2014 23:32 IST

राज्यातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची वाट धरावी आणि त्यांच्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बदल घडविण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

आमगाव : राज्यातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची वाट धरावी आणि त्यांच्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बदल घडविण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यात आता आदिवासींच्या मुलांना उच्च शिक्षणाची दिशा मिळावी यासाठी शासनाने मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरु केले आहे. यात खासगी संस्थाही प्रतिसाद देत आहेत.शासनाने राज्यातील आदिवासी नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. आदिवासीबहुल परिसरातच त्यांना प्राथमिक ते उच्च शिक्षण मिळावे यासाठी शासकीय व खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे कार्य निरंतर शासनाकडून सुरु आहे. कालांतराने या विद्यार्थ्यांना शहरी भागातून मिळणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आपल्याकडे आकृष्ट केले. परंतु शैक्षणिक शुल्क व विविध अडचणींमुळे या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून शिक्षण घेणे कठीण होते. शासनाने आदिवासी नागरिकांच्या मुलांनाही केंद्रीय बोर्डाचे सीबीएसई, आयसीएसई या इंग्रजी माध्यमांचे शिक्षण देण्यासाठी योजना सुरू केली.सन २०१०-११ मध्ये शासनाने २४ प्रकल्पाअंतर्गत राज्यात या शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांसाठी सुरु केली. प्रारंभी ठाणे नाशिक, रामटेक, अमरावती या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करुन दिले. विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाचे अभ्यासक्रमात शासकीय आश्रम शाळा व खाजगी अनुदानीत शाळा नागपूर विभागात १५७ आहेत. यात प्राथमिक ते माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात ८० हजार ८६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाची सोय शाळेतच उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासन योजनेला अधिक बळकट करित आहे. परंतु आदिवासी मागास परिसरात इंग्रजी माध्यमांच्या शाळा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी संस्थानांकडे वळावे लागत आहे.आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या माध्यमांच्या बदलामुळे देवरी प्रकल्पातील १४० विद्यार्थी प्राथमिक शिक्षणातूनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळले आहेत. त्यामुळे आदिवासीं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी खाजगी संस्थानांचा प्रतिसाद मिळत आहे. (शहर प्रतिनिधी) युवकाची आत्महत्याआमगाव : रिसामा येथील ग्रा.पं.च्या विहिरीत उडी घेवून संतोष महाविरसिंग बैस (३२) यानी आत्महत्या केली. त्यांच्याकडे संपूर्ण कुटुंबाचा भार होता. ही घटना मंगळवार (१ जुलै) ला सकाळी ९ वाजता उघडकीस आली. सदर घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.