शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आदिवासी मुलांना मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण

By admin | Updated: July 1, 2014 23:32 IST

राज्यातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची वाट धरावी आणि त्यांच्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बदल घडविण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

आमगाव : राज्यातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची वाट धरावी आणि त्यांच्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बदल घडविण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यात आता आदिवासींच्या मुलांना उच्च शिक्षणाची दिशा मिळावी यासाठी शासनाने मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरु केले आहे. यात खासगी संस्थाही प्रतिसाद देत आहेत.शासनाने राज्यातील आदिवासी नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. आदिवासीबहुल परिसरातच त्यांना प्राथमिक ते उच्च शिक्षण मिळावे यासाठी शासकीय व खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे कार्य निरंतर शासनाकडून सुरु आहे. कालांतराने या विद्यार्थ्यांना शहरी भागातून मिळणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आपल्याकडे आकृष्ट केले. परंतु शैक्षणिक शुल्क व विविध अडचणींमुळे या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून शिक्षण घेणे कठीण होते. शासनाने आदिवासी नागरिकांच्या मुलांनाही केंद्रीय बोर्डाचे सीबीएसई, आयसीएसई या इंग्रजी माध्यमांचे शिक्षण देण्यासाठी योजना सुरू केली.सन २०१०-११ मध्ये शासनाने २४ प्रकल्पाअंतर्गत राज्यात या शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांसाठी सुरु केली. प्रारंभी ठाणे नाशिक, रामटेक, अमरावती या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करुन दिले. विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाचे अभ्यासक्रमात शासकीय आश्रम शाळा व खाजगी अनुदानीत शाळा नागपूर विभागात १५७ आहेत. यात प्राथमिक ते माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात ८० हजार ८६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाची सोय शाळेतच उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासन योजनेला अधिक बळकट करित आहे. परंतु आदिवासी मागास परिसरात इंग्रजी माध्यमांच्या शाळा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी संस्थानांकडे वळावे लागत आहे.आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या माध्यमांच्या बदलामुळे देवरी प्रकल्पातील १४० विद्यार्थी प्राथमिक शिक्षणातूनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळले आहेत. त्यामुळे आदिवासीं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी खाजगी संस्थानांचा प्रतिसाद मिळत आहे. (शहर प्रतिनिधी) युवकाची आत्महत्याआमगाव : रिसामा येथील ग्रा.पं.च्या विहिरीत उडी घेवून संतोष महाविरसिंग बैस (३२) यानी आत्महत्या केली. त्यांच्याकडे संपूर्ण कुटुंबाचा भार होता. ही घटना मंगळवार (१ जुलै) ला सकाळी ९ वाजता उघडकीस आली. सदर घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.