शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

आवास योजनेतील लाभार्थ्यांची फसगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:17 IST

आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा राहत असून यासाठी कित्येकांकडून आपल्या पोटाला चिमटा देऊन ‘पै-पै’ जोडली जाते. जोडलेला पैसा कमी पडल्यास उधार उसनवारी किंवा बँकेक डून कर्ज घेऊन कशातरी चार भिंती व छतासाठी सर्वांचीच धडपड सुरू असते.

ठळक मुद्देअनुदानाअभावी बांधकाम अडकून : निधी देण्यात शासनाची दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याच्या उद्देशातून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. यांतर्गत नगर परिषदेच्या माध्यमातून शहरी आवास योजना राबविली जात असून नगर परिषदेने योजनेतील ‘आर्थिक दुर्बल घटक’ अंतर्गत ५१५ आवासांची मंजुरी मिळविली आहे. गरजुंनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले व या घटकातील ५१५ आवासांचे बांधकामही लाभार्थ्यांनी सुरू केले. मात्र काहींना एक तर काहींना दोनच अनुदान देण्यात आले आहेत. यामुळे लाभार्थ्यांचे बांधकाम अडकून पडले असून त्यांची अडचण होत आहे. कित्येकांना आता भाड्याने घर घेऊन राहावे लागत असून इकडे आड-तिकडे विहीर अशी त्यांची फसगत झाली आहे.आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा राहत असून यासाठी कित्येकांकडून आपल्या पोटाला चिमटा देऊन ‘पै-पै’ जोडली जाते. जोडलेला पैसा कमी पडल्यास उधार उसनवारी किंवा बँकेक डून कर्ज घेऊन कशातरी चार भिंती व छतासाठी सर्वांचीच धडपड सुरू असते. यात कित्येकांची स्वप्नपुर्ती होते, तर कित्येकांना मात्र भाडयाच्या घरातच तर त्याही पेक्षा हलाखीची स्थिती असलेल्यांना झोपडपट्टीतच आपले जीवन वाहून घ्यावे लागते. यामुळेच देशाच्या स्वांतत्र्याच्या ७५ व्या वर्षापर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळावे या दृष्टीकोनातून गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडून ‘पंतप्रधान शहरी आवास योजना’ राबविली जात आहे.चार घटकांतून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतील चवथ्या क्रमांकाच्या ‘आर्थिक दुर्बल घटक ’ यातून नगर परिषदेने ५१५ आवासांची मंजुरी मिळवून घेतली असून त्यांचे काम सुरू आहे.स्वत:ची जमीन पण पक्के घर नसलेल्यांचा यांचा समावेश असून या ५१५ लाभार्थ्यांनी त्यांच्या आशियानाचे काम सुरू केले असून त्यांना दोन लाख ५० हजार रूपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. त्यानुसार, यातील काहींना अनुदानाचा एक तर काहींना दुसराच टप्पा देण्यात आला आहे. अशाप्रकारे काहींना फक्त ४० हजार तर काहींना ८० हजार रूपये नगर परिषदेने दिले आहे. आता एवढ्या पैशांत घर काय घराच्या भिंतीही उभ्या होणे शक्य नसल्याने या लाभार्थ्यांचे बांधकाम अडकून पडले आहे.आवासाचे स्वप्न बघून या लाभार्थ्यांनी कच्चे-पक्के जसे होते ते घरही पाडून टाकले. त्यात आता शासनाकडून पैसे देण्यात दिरंगाई होत असल्याने या लाभार्थ्यांची चांगलीच फसगत झाली आहे. घराच्या अपेक्षेत कित्येकांना आता मांडव घालून, नातेवाईकांचा आसरा घेऊन किंवा भाड्याने घर घेऊन दिवस काढावे लागत आहे.शासन सन २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे सांगत असताना आहे त्यांना नियमित अनुदान देत नसल्याने शासन ही योजना किती तत्परतेने राबवित आहे हे दिसून येत आहे. अनुदानाची रक्कम देण्यात अशीच दिरंगाई होत राहिली तर पंतप्रधानांची स्वप्नपूर्ती कठीणच असून मात्र गरिबांचे हाल नक्कीच आहे.लाभार्थी घरभाड्याच्या बोझ्याखालीजेमतेम परिस्थिती असलेल्या कित्येकांनी आवासासाठी अर्ज केला व त्यांना आवास मिळाले. आता आपले हक्काचे घर लवकरच होणार या अपेक्षेने कित्येकांनी घराच्या बांधकामाला सुरूवात केली व यासाठी ते भाड्याचे घर घेऊन राहत आहेत. आता शासनाकडून नियमित अनुदान मिळत नसल्याने बांधकाम अडकले आहे. मात्र या लाभार्थ्यांना घराचे भाडे मोजावे लागत असल्याने त्यांची फसगत झाली आहे. असेच कित्येक लाभार्थी अनुदान आले काय हे बघण्यासाठी नगर परिषद कार्यालयात चकरा मारत आहेत.मिळाले फक्त २.०६ कोटीशासनाकडून नगर परिषदेला लार्भार्थ्यांच्या अनुदानासाठी २.०६ कोटी रूपये देण्यात आले होते. त्यानुसार, नगर परिषदेने ४० हजार रूपयांचा टप्पा यानुसार, ३५६ लाभार्थ्यांना एक व २१० लाभार्थ्यांना दोन टप्पे दिले आहेत. त्यानंतर आता शासनाकडून ६ आॅगस्ट रोजी २.०६ कोटी रूपये मिळाले असून त्यांचे वाटप केले जाणार आहे. म्हणजेच निधी पाठविण्यात शासनाकडून दिरंगाई होत असून लाभार्थी मात्र बळी पडत आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका