शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

आवास योजनेतील लाभार्थ्यांची फसगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:17 IST

आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा राहत असून यासाठी कित्येकांकडून आपल्या पोटाला चिमटा देऊन ‘पै-पै’ जोडली जाते. जोडलेला पैसा कमी पडल्यास उधार उसनवारी किंवा बँकेक डून कर्ज घेऊन कशातरी चार भिंती व छतासाठी सर्वांचीच धडपड सुरू असते.

ठळक मुद्देअनुदानाअभावी बांधकाम अडकून : निधी देण्यात शासनाची दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याच्या उद्देशातून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. यांतर्गत नगर परिषदेच्या माध्यमातून शहरी आवास योजना राबविली जात असून नगर परिषदेने योजनेतील ‘आर्थिक दुर्बल घटक’ अंतर्गत ५१५ आवासांची मंजुरी मिळविली आहे. गरजुंनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले व या घटकातील ५१५ आवासांचे बांधकामही लाभार्थ्यांनी सुरू केले. मात्र काहींना एक तर काहींना दोनच अनुदान देण्यात आले आहेत. यामुळे लाभार्थ्यांचे बांधकाम अडकून पडले असून त्यांची अडचण होत आहे. कित्येकांना आता भाड्याने घर घेऊन राहावे लागत असून इकडे आड-तिकडे विहीर अशी त्यांची फसगत झाली आहे.आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा राहत असून यासाठी कित्येकांकडून आपल्या पोटाला चिमटा देऊन ‘पै-पै’ जोडली जाते. जोडलेला पैसा कमी पडल्यास उधार उसनवारी किंवा बँकेक डून कर्ज घेऊन कशातरी चार भिंती व छतासाठी सर्वांचीच धडपड सुरू असते. यात कित्येकांची स्वप्नपुर्ती होते, तर कित्येकांना मात्र भाडयाच्या घरातच तर त्याही पेक्षा हलाखीची स्थिती असलेल्यांना झोपडपट्टीतच आपले जीवन वाहून घ्यावे लागते. यामुळेच देशाच्या स्वांतत्र्याच्या ७५ व्या वर्षापर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळावे या दृष्टीकोनातून गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडून ‘पंतप्रधान शहरी आवास योजना’ राबविली जात आहे.चार घटकांतून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतील चवथ्या क्रमांकाच्या ‘आर्थिक दुर्बल घटक ’ यातून नगर परिषदेने ५१५ आवासांची मंजुरी मिळवून घेतली असून त्यांचे काम सुरू आहे.स्वत:ची जमीन पण पक्के घर नसलेल्यांचा यांचा समावेश असून या ५१५ लाभार्थ्यांनी त्यांच्या आशियानाचे काम सुरू केले असून त्यांना दोन लाख ५० हजार रूपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. त्यानुसार, यातील काहींना अनुदानाचा एक तर काहींना दुसराच टप्पा देण्यात आला आहे. अशाप्रकारे काहींना फक्त ४० हजार तर काहींना ८० हजार रूपये नगर परिषदेने दिले आहे. आता एवढ्या पैशांत घर काय घराच्या भिंतीही उभ्या होणे शक्य नसल्याने या लाभार्थ्यांचे बांधकाम अडकून पडले आहे.आवासाचे स्वप्न बघून या लाभार्थ्यांनी कच्चे-पक्के जसे होते ते घरही पाडून टाकले. त्यात आता शासनाकडून पैसे देण्यात दिरंगाई होत असल्याने या लाभार्थ्यांची चांगलीच फसगत झाली आहे. घराच्या अपेक्षेत कित्येकांना आता मांडव घालून, नातेवाईकांचा आसरा घेऊन किंवा भाड्याने घर घेऊन दिवस काढावे लागत आहे.शासन सन २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे सांगत असताना आहे त्यांना नियमित अनुदान देत नसल्याने शासन ही योजना किती तत्परतेने राबवित आहे हे दिसून येत आहे. अनुदानाची रक्कम देण्यात अशीच दिरंगाई होत राहिली तर पंतप्रधानांची स्वप्नपूर्ती कठीणच असून मात्र गरिबांचे हाल नक्कीच आहे.लाभार्थी घरभाड्याच्या बोझ्याखालीजेमतेम परिस्थिती असलेल्या कित्येकांनी आवासासाठी अर्ज केला व त्यांना आवास मिळाले. आता आपले हक्काचे घर लवकरच होणार या अपेक्षेने कित्येकांनी घराच्या बांधकामाला सुरूवात केली व यासाठी ते भाड्याचे घर घेऊन राहत आहेत. आता शासनाकडून नियमित अनुदान मिळत नसल्याने बांधकाम अडकले आहे. मात्र या लाभार्थ्यांना घराचे भाडे मोजावे लागत असल्याने त्यांची फसगत झाली आहे. असेच कित्येक लाभार्थी अनुदान आले काय हे बघण्यासाठी नगर परिषद कार्यालयात चकरा मारत आहेत.मिळाले फक्त २.०६ कोटीशासनाकडून नगर परिषदेला लार्भार्थ्यांच्या अनुदानासाठी २.०६ कोटी रूपये देण्यात आले होते. त्यानुसार, नगर परिषदेने ४० हजार रूपयांचा टप्पा यानुसार, ३५६ लाभार्थ्यांना एक व २१० लाभार्थ्यांना दोन टप्पे दिले आहेत. त्यानंतर आता शासनाकडून ६ आॅगस्ट रोजी २.०६ कोटी रूपये मिळाले असून त्यांचे वाटप केले जाणार आहे. म्हणजेच निधी पाठविण्यात शासनाकडून दिरंगाई होत असून लाभार्थी मात्र बळी पडत आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका