शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

चार वर्षांपासून तलाठी साज्यांचे भाडे प्रलंबित

By admin | Updated: October 13, 2016 01:49 IST

गावस्तरावर महसूल विभागाची सर्वच कामे तलाठी साज्यांमधून होतात. गावागावात तलाठ्यांचे कार्यालय म्हणून ग्रामस्थांच्या घरी भाड्याने हे साजे चालतात.

तिरोडा तालुका : तलाठ्यांच्या खिशांवर पडतोय भुर्दंडगोंदिया : गावस्तरावर महसूल विभागाची सर्वच कामे तलाठी साज्यांमधून होतात. गावागावात तलाठ्यांचे कार्यालय म्हणून ग्रामस्थांच्या घरी भाड्याने हे साजे चालतात. मात्र शासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे तिरोडा तालुक्यातील तलाठी साज्यांचे भाडे मागील चार वर्षांपासून देण्यात आले नाही. याचा आर्थिक ओझा तलाठ्यांना सहन करावा लागत आहे.तिरोडा तहसील कार्यालयांतर्गत एकूण ३३ तलाठी साजे आहेत. जवळपास सर्वच साजे भाड्यावर आहेत. या ३३ साज्यांमध्ये ३० तलाठी कार्यरत असून तीन तलाठी निलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. एका साज्यांतर्गत तीन ते चार गावांचा समावेश असतो. शिवाय पदभरती न झाल्याने किंवा निलंबनाच्या कारवाईमुळे एखाद्या साज्यात तलाठी नसला तर जवळच्या साज्यातील तलाठ्यावर त्या साज्याचा भार सोपविला जातो. त्यामुळे क्षेत्र वाढल्याने तलाठ्यावर कामाचा भारही वाढतो. अशावेळी शासनाकडून तलाठी साज्याचे भाडेच उपलब्ध झाले नाही तर तलाठ्यांना स्वत:च्या खिशातून भाडे देण्याचा प्रसंग येतो. असाच प्रकार तिरोडा तालुक्यात सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तिरोडा तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या साज्यांचे भाडे सन २०१२ पासून आतापर्यंत देण्यात आले नाही. या कालावधीत केवळ जुलै २०१३ व आॅगस्ट २०१३ या दोनच महिन्यांचे भाडे देण्यात आले आहेत. उर्वरित चार वर्षांतील इतर महिन्यांचे भाडे अद्यापही शासनाकडून उपलब्ध न झाल्याने संबंधित तलाठ्यांवर आर्थिक भार पडत असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. महसूल विभाग महसूल गोळा करून शासनाला पुरवठा करतो. मात्र महसुलाचे काम चालणाऱ्या गावस्तरावरील कार्यालयांचे भाडे देण्याकडेच शासनाचे दुर्लक्ष आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही साज्याचे भाडे काढण्यात आले नाही. त्यामुळे तलाठ्यांना संबंधित खोलीच्या मालकाचे बोलणे ऐकावे लागत असल्याचे काही तलाठ्यांनी सांगितले आहे.(प्रतिनिधी)