शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

एकाच सातबारावर चारवेळा धानाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा या दोन्ही विभागाच्या शंभरावर धान खरेदीवर केंद्रावरुन धान खरेदी करण्यात आली. धानाला यंदा १८२५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि प्रोत्साहान अनुदान आणि बोनस असे मिळून एकूण २५२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

ठळक मुद्देखरेदी केंद्रावर सर्वच शक्य : शेती नसलेल्यांकडून धान खरेदी, प्रशासन दखल घेणार का, शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकाच सातबारावर एकदा धान विक्री करता येता असा नियम असला तरी शासकीय धान खरेदी केंद्रावर हा नियम लागू होत नसल्याचे चित्र आहे. एकाच सातबारा एक वेळा नव्हे तर चक्क चार वेळा धान खरेदी करुन बोनसचा देखील लाभ घेण्यात आला.हा सर्व प्रकार केवळ शासकीय धान खरेदी केंद्रावरच शक्य असल्याचे आता काहीजण छातीठोकपणे बोलून दाखवित आहे. हा प्रकार जिल्ह्यातील काही खरेदी केंद्रावर उघडकीस आला आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा या दोन्ही विभागाच्या शंभरावर धान खरेदीवर केंद्रावरुन धान खरेदी करण्यात आली. धानाला यंदा १८२५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि प्रोत्साहान अनुदान आणि बोनस असे मिळून एकूण २५२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यामुळेच यंदा एकट्या जिल्हा मार्केंटिंग फेडरेशन खरीप व रब्बी हंगामात एकूण ५७ लाख क्विंटल धान खरेदी केली. पण जिल्ह्यातील एकूण धान लागवडीचे क्षेत्र आणि झालेले उत्पादन पाहता धान खरेदी ही अधिक झाल्याची चर्चा होती. त्यामुळे बाहेरील जिल्हा आणि राज्यातील धानाची या खरेदी केंद्रावर विक्री केल्याचे सुध्दा आता स्पष्ट झाले आहे. काही खासगी व्यापाऱ्यांनी तलाठ्यांना हाताशी घेवून एकाच सातबारावर वेगवेगळ्या शेतकºयांची नाव टाकून चारवेळा धानाची विक्री केली. ऐवढेच नव्हे तर शाळेकरी मुलांच्या आधारकार्डवरील नाव आणि वयात बदल करुन त्याचा सुध्दा धानाची विक्री करण्यासाठी उपयोग केल्याची माहिती आहे. ऐवढेच नव्हे तर काही बनावट सातबारा देखील तयार करण्यात आल्याची माहिती आहे. हा प्रकार सालेकसा तालुक्यातील काही केंद्रावर सर्वाधिक घडला आहे. याची लेखी तक्रार सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.शासकीय धान खरेदी केंद्राचा उपयोग शेतकऱ्यांना कमी आणि खासगी व्यापाºयांना अधिक झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे तक्रारकर्त्यांने हा सर्व घोळ कसा करण्यात आला. कोणत्या शेतकऱ्याच्या नावाचे बनावट सातबारा तयार करण्यात आले, एकाच सातबारावर चार वेगवेगळ्या शेतकऱ्यांची नावे कशी चढविण्यात आली, खरेदी केंद्रावर यासर्व प्रकाराकडे कशी डोळेझाक करण्यात आली याची लेखी तक्रारीत नोंद केली आहे. धान खरेदी केंद्रावरील सातबारा आणि शेतकऱ्यांच्या मुख्य सातबाराची पडताळणी केल्यास याचे बिंग सहज फुटू शकते. यात कोट्यवधी रुपयांचा घोळ असून खरेदी केंद्राशी निगडीत लोकांचे खरे चेहरे सुध्दा उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेती नसलेला व्यक्ती झाला शेतकरीशासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी तुमच्यावर नाव शेती आणि त्याचा सातबारा, आधारकार्ड, नमुना आठ ही कागदपत्रे आवश्यक आहे. त्याशिवाय धानाची विक्री करता येत नाही. मात्र शेती नसलेल्या व्यक्तीच्या नावावर शेती दाखवून आणि त्याच्या नावे बनावट सातबारा तयार करुन धानाची विक्री करण्यात आल्याची माहिती आहे.शिवाय हीच कागदपत्रे जोडून बँकेत खाते उघडून त्याच नावावर बोनसचा सुध्दा लाभ घेण्यात आला आहे. यावर सर्व प्रकाराची सुध्दा लेखी तक्रार करण्यात आली आहे.शेतकºयांकडून २५ रुपये प्रति क्विंटल अतिरिक्तधान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाºया शेतकºयाचा धानाचा काटा करणे, त्यानंतर त्याची छल्ली मारणे, कट्टे शिवणे याकरिता शासनाकडून प्रति क्विंटल ११ रुपये प्रमाणे धान खरेदी केंद्राला दिले जातात. मात्र यानंतरही काही खरेदी केंद्रावर शेतकºयांकडून २५ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे अतिरिक्त पैसे घेण्यात आल्याची ओरड आहे.चौकशी अहवालाची माहिती देण्यास टाळटाळजिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली. याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आली. संबंधितानी चौकशी अहवाल तयार करुन जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे सोपविला आहे. या अहवालात बराच सावळा गोंधळ पुढे आल्याची माहिती आहे. मात्र याची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शेतकºयांच्या नावावर लोणी खाणाऱ्यांवर प्रशासन कठोर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.भरडाईस जाणाऱ्या कट्टयावरील शिक्का गायबशासकीय धान खरेद केंद्रावर खरेदी करण्यात आलेला धान राईस मिलर्सच्या माध्यमातून भरडाई केला जातो. त्यानंतर सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. मात्र केंद्रावरुन धानाची उचल करताना त्या कट्टयावर संबंधित केंद्राचा शिक्का मारला जातो. त्यावर केंद्राचे नाव, लॉट नंबर, धानाचा प्रकार, वजन लिहिले असते.मात्र काही केंद्रावर भरडाईसाठी धान पाठविताना कट्टयावर शिक्काच मारला जात नसल्याची माहिती आहे.