शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

गोंदिया जिल्ह्यात मारबत विसर्जनानंतर अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 20:20 IST

Gondia News नदीवर मारबत घेऊन गेल्यानंतर अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. आमगाव तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील वाघ नदीत मंगळवारी (दि.८) सकाळी ८ वाजेदरम्यान ही घटना घडली.

ठळक मुद्देअंघोळीसाठी उतरले होते नदीतमुंडीपार येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंदिया : नदीवर मारबत घेऊन गेल्यानंतर अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. आमगाव तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील वाघ नदीत मंगळवारी (दि.८) सकाळी ८ वाजेदरम्यान ही घटना घडली. मयूर अशोक खोब्रागडे (२०), सुमित दिलीप शेंडे (१७), संतोष अशोक बहेकार (१९) व बंडू किशोर बहेकार (१६, सर्व रा. कालीमाटी) अशी मृत मुलांची नावे आहेत. (Four children drowned in Gondia district)

बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत काढली जात असून सकाळी घरातून काढण्यात आलेली मारबत गावातील शिवारात नेऊन टाकली जाते. त्यानुसार, आमगाव तालुक्यातील ग्राम कालीमाटी येथील शंभरावर मुले गावातील शिवारावर मारबत घेऊन गेले होते. तेथे गेल्यावर आंघोळीसाठी मयूर खोब्रागडे, सुमित शेंडे, संतोष बहेकार, बंडू बहेकार व अन्य काही मुले नदीत उतरली. ते नदीत उतरल्यावर पावसाला सुरुवात झाली व वीज चमकत असल्याने काही मुले तेथून घरी परत आली.

मात्र, नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मयूर खोब्रागडे, सुमित शेंडे, संतोष बहेकार व बंडू बहेकार यांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले असून, आमगाव पोलीस मृतदेहांचा शोध घेत आहेत. मात्र, वृत्त लिहीपर्यंत त्यांचे मृतदेह हाती लागले नसल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यू