शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

आपसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST

राजकुमार बडोले : कार्यकर्ता मेळावा सडक अर्जुनी : येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून जोमाने कामाला ...

राजकुमार बडोले : कार्यकर्ता मेळावा

सडक अर्जुनी : येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागावे. येणाऱ्या जि.प.व पं.स. निवडणुकीत पक्ष ज्या कार्यकर्त्यांला तिकीट देईल त्यासाठी आपण इमानेइतबारे काम करावे. जि.प.व पं.स. निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागून आपला उमेदवार निवडून आला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांनी जिद्द ठेवून काम करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

तालुक्यातील पांढरी जि.प.सर्कलच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रनिहाय मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी कोसमतोंडी येथे करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मंचावर माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले, लक्ष्मीकांत धनगाये, शेषराव गिऱ्हेपुंजे, जे.डी. जगणीत अध्यक्ष अनुसूचित जाती, देवराम राहांगडाले, डॉ. बबन कांबळे, गिरिधारी हत्तीमारे, विश्वनाथ राहांगडाले, मनोहर काशीवार, चेतन वडगाये, भाजयुमो तालुकाध्यक्ष विलास बागडकर, शिशिर येळे, पांढरी जि.प. प्रमुख जगदीश काशीवार, महेंद्र टेंभरे, विजय बावनकर, किशोर मळकाम, प्रकाश काशीवार,अनिल गजभिये, माणिक चौधरी, प्रमोद खोब्रागडे, किशोर खोब्रागडे, मनोहर बावने, रामचंद्र काशीवार,भाजप तालुकाध्यक्ष अशोक लंजे आणि पांढरी जि.प.चे प्रभारी लक्ष्मीकांत धनगाये व पांढरी जि.प.क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित होते. मेळाव्याप्रसंगी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचासुद्धा पक्षाचा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला.

बडोले म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे शासन शेतकरी हिताचे नसून दलालांचे शासन आहे. या शासनाने कोविड-१९ कोरोना संक्रमण काळात शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांनी वीजबिल भरू नये, कोरोना संक्रमण काळातील वीजबिल माफ करण्यात येईल असा डिंडोरा पिटला; पण वीजबिल माफी तर सोडा, आता शासन वीज कनेक्शन तोडण्याच्या तयारीत आहे. फडणवीस सरकारमध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे एका एकरावर १६ क्विंटल धान्य खरेदी केले जात होते. ते या आघाडी शासनाने एकरी १३ क्विंटलवर आणले. आघाडी शासन शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे हिताचे नसून त्यांना लुबाडणारे शासन असल्याचा आरोप त्यांनी केला.