शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

आपसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST

राजकुमार बडोले : कार्यकर्ता मेळावा सडक अर्जुनी : येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून जोमाने कामाला ...

राजकुमार बडोले : कार्यकर्ता मेळावा

सडक अर्जुनी : येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागावे. येणाऱ्या जि.प.व पं.स. निवडणुकीत पक्ष ज्या कार्यकर्त्यांला तिकीट देईल त्यासाठी आपण इमानेइतबारे काम करावे. जि.प.व पं.स. निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागून आपला उमेदवार निवडून आला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांनी जिद्द ठेवून काम करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

तालुक्यातील पांढरी जि.प.सर्कलच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रनिहाय मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी कोसमतोंडी येथे करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मंचावर माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले, लक्ष्मीकांत धनगाये, शेषराव गिऱ्हेपुंजे, जे.डी. जगणीत अध्यक्ष अनुसूचित जाती, देवराम राहांगडाले, डॉ. बबन कांबळे, गिरिधारी हत्तीमारे, विश्वनाथ राहांगडाले, मनोहर काशीवार, चेतन वडगाये, भाजयुमो तालुकाध्यक्ष विलास बागडकर, शिशिर येळे, पांढरी जि.प. प्रमुख जगदीश काशीवार, महेंद्र टेंभरे, विजय बावनकर, किशोर मळकाम, प्रकाश काशीवार,अनिल गजभिये, माणिक चौधरी, प्रमोद खोब्रागडे, किशोर खोब्रागडे, मनोहर बावने, रामचंद्र काशीवार,भाजप तालुकाध्यक्ष अशोक लंजे आणि पांढरी जि.प.चे प्रभारी लक्ष्मीकांत धनगाये व पांढरी जि.प.क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित होते. मेळाव्याप्रसंगी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचासुद्धा पक्षाचा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला.

बडोले म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे शासन शेतकरी हिताचे नसून दलालांचे शासन आहे. या शासनाने कोविड-१९ कोरोना संक्रमण काळात शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांनी वीजबिल भरू नये, कोरोना संक्रमण काळातील वीजबिल माफ करण्यात येईल असा डिंडोरा पिटला; पण वीजबिल माफी तर सोडा, आता शासन वीज कनेक्शन तोडण्याच्या तयारीत आहे. फडणवीस सरकारमध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे एका एकरावर १६ क्विंटल धान्य खरेदी केले जात होते. ते या आघाडी शासनाने एकरी १३ क्विंटलवर आणले. आघाडी शासन शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे हिताचे नसून त्यांना लुबाडणारे शासन असल्याचा आरोप त्यांनी केला.