शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

रेल्वे प्रवासात दो गज की दुरी व मास्क जरुरीचा विसर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST

आमगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवासी रेल्वे गाडी पूर्णत: बंद केली होती. कालांतराने प्रवासी वाहतूक सेवा ...

आमगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवासी रेल्वे गाडी पूर्णत: बंद केली होती. कालांतराने प्रवासी वाहतूक सेवा कोविड नियमावली ठरवून काही रेल्वे गाड्यांना प्रारंभ करण्यात आला. पण प्रवासी नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेने अनेक उपाययोजना केल्या. परंतु शासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागले. त्यातच आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगण्याची गरज आहे. रेल्वे विभागाने प्रवासी वाहतूक हळूहळू पूर्ववत सुरू केली आहे. नियम पाळूनच सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू करून काही प्रवासी गाड्या सुरू केल्या. हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या काही मोजक्या प्रवासी लोकल, सुपरफास्ट प्रवासी

गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांमध्ये प्रवासात प्रवाशांनी कोविडची भीतीच बाजूला सारून बिनधास्तपणे प्रवास सुरू केला आहे. विनामास्क व सामाजिक अंतर टाळून गर्दी करणे सुरू केली आहे. त्यामुळे हा प्रवास आता धोक्याचा ठरत आहेत. प्रवासात कोणतेही सामाजिक अंतर कमी न करता विनामास्क आरोग्याला आव्हान देत प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेले नियमच प्रवाशांनी घालवले, असे चित्र दिसत आहे.

रेल्वेत प्रवाशांना कोविड नियंत्रणासाठी कायदा लागू करण्यात आला आहे की नाही, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. विनामास्क व सामाजिक अंतर याला डावलून सर्रास प्रवास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासामुळे कोविडचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.