शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाची झाडे अवैधरीत्या कापली

By admin | Updated: August 26, 2014 23:32 IST

गोंदिया वन परिक्षेत्र सर्कलच्या गंगाझरी, दांडेगाव बीटच्या मालकीच्या जागेवरील सात सागवानी झाडे कापण्यात आली. श्री समर्थ शिक्षण संस्थेने आपल्याच जागेत ती झाडे असल्याचे सांगत कापली.

चार लाख किंमत : खासगी मालमत्ता असल्याचा बनावएकोडी : गोंदिया वन परिक्षेत्र सर्कलच्या गंगाझरी, दांडेगाव बीटच्या मालकीच्या जागेवरील सात सागवानी झाडे कापण्यात आली. श्री समर्थ शिक्षण संस्थेने आपल्याच जागेत ती झाडे असल्याचे सांगत कापली. मात्र हा प्रकार अवैधपणे झाल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.दांडेगाव येथील वन विभागाचे बीटरक्षक डी.एन. शुक्ला यांच्या निर्देशनात ही बाब आणून देण्यात आल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता असे लक्षात आले की, श्री समर्थ शिक्षण संस्था दांडेगाव यांची अध्यापक विद्यालय व माध्यमिक शाळा ही दांडेगाव येथील टेकडीला लागून बांधण्यात आलेली आहे. ती जागा वनविभागाच्या अधिकारक्षेत्रात असून टी.सी.एम. नालीच्या जवळ लागूनच एकूण सागवानाची मोठी सात लाकडे होती. ती झाडे आपली असल्याचे सांगून सर्व सात झाडे कापण्यात आली. वास्तविक खाजगी झाडे असली तरी सागवानी झाडे कापण्यासाठी वनविभागाकडून परवानगी घ्यावी लागते. ती घेण्यात आली नव्हती. यासर्व प्रकरणाची चौकशी गंगाझरी क्षेत्र सहायक बी.पी.राऊत हे करीत आहे. बिना परवानगीने झाडे कापल्यामुळे संस्था व पदाधिकाऱ्यांनी केलेली ही कारवाई नियमबाह्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकूण ३४ इमारती लाकुड व दोन बिटल्या जप्त करण्यात आल्या. एकूण लाकुड चार घनमिटर असून अंदाजे त्याची किंमत ४ लाख ३० हजार रु. आहे. संस्थेने बिनापरवानगी झाडे कापल्याने याची जबाबदारी संस्थेचे पदाधिकारी सुरेश काळसर्पे रा.दांडेगाव यांनी घेतली असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी संगितले की, ती झाडे संस्थेच्या खाजगी जागेवर होती. यावर्षी नव्याने ज्यु. कॉलेजचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी मुलांच्या बसण्याची सोय व्हावी म्हणून झाडे कापण्यात आली. परंतु जर शालेय साहित्य बनविण्यासाठी कापली तर गुन्हा एका संस्था सदस्यांच्य नावे कसा काय दाखल करण्यात आला. जप्तीची कार्यवाही पुर्ण करुन रिपोर्ट नुसार ६४/१८/१६/८/१४ प्रमाणे प्रकरण दाखल करण्यात आले व जप्त केलेले सागवान इमारती लाकूड गंगाझरी सर्कलमध्ये जमा करण्यात आले आहे.परंतु या प्रकरणात आता पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे बोलले जात आहे. वन कायद्यानुसार टी.सी.एम.पासून ६ मिटर अंतरापर्यंत सीमेवर वनविभागाची देखरेख असते. परंतु संस्थेमार्फत कापण्यात आलेली झाडे टीसीएन पासून एक ते दिड मिटर अंतरावर आहे. व आतापर्यंत संस्थेने आपली खाजगी मालकी असल्याचे कोणतेच पुरावे सादर केले नाही. यावरुन असे लक्षात येते की, संस्था व वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी यांच्यात साटेलोटे झाल्याचे बोलले जाते.या प्रकरणाची सखोल चौकशी वनक्षेत्राधिकारी के.एम. मेश्राम करीत आहेत. प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करुन दोषी लोकांवर कार्यवाही करण्यात येते की नाही, याबद्दल लोकांच्या मनात संशय बळावत आहे. संस्थेत असलेले पदाधिकारी राजकिय पक्षाशी जुळलेले असल्यामुळे कारवाईबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. (वार्ताहर)