शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

८९ लाखांची वनसंपदा राख

By admin | Updated: March 6, 2015 01:42 IST

मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ‘ग्लोबल वार्मिंग’चे संकट उभे आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना आणली.

नरेश रहिले गोंदियामोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ‘ग्लोबल वार्मिंग’चे संकट उभे आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून १०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे, मात्र एकीकडे झाडे लावून ती जगविण्याचा खटाटोप सुरू असताना गुरुवारी सायंकाळी जिल्हाभरात २७२९ होळ्यांमधून १४ हजार ९५८ क्विंटल लाकडांची राखरांगोळी करण्यात आली. दुर्दैवाने या होळीत जाळण्यासाठी वापरलेली अर्ध्यापेक्षा जास्त लाकडे जीवंत झाडांवर कुऱ्हाड चालवून आणली होती.जिल्ह्याच्या १६ पोलीस ठाण्यांतर्गत १ हजार ७७३ सार्वजनिक तर ९५६ होळ्या खासगीरित्या पेटविण्यात आल्या. प्रत्येक होळीत किमान ५ क्विंटल लाकडे जळाल्याचे गृहित धरले तरी १५ हजार लाकडांची किंमत आजघडीला ८९ लाख १२ हजार ४०० रूपये होते. होळीतून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी कितीही जनजागृती केली तरी प्रत्यक्षात परंपरा जपण्याकडेच नागरिकांचा कल असल्याचे यातून दिसून आले.गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १२६ सार्वजनिक होळी तर खासगी ३००, रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६५, खासगी २६, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४० तर खासगी ९१, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १७१ खासगी ५०, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६०, खासगी २१, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४० तर खासगी २६, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १६१ तर खासगी ७०, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १५० तर खासगी ४३, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ७६, खासगी १०, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक २४२, खासगी ४६, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३५, खासगी ५१, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ५६ तर खासगी ११५, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४३ तर खासगी १०, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ९१ तर खासगी ६० होळ्या पेटविण्यात आल्या.एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. मात्र त्याच गावातील नागरिकांनी जंगलातील, शेतातील झाडे तोडून कोट्यवधीची वनसंपदा होळीसाठी नष्ट केली जाते. आजघडीला एक क्विंटल लाकडाची किमत ६०० रुपये सांगितले जाते. या १४ हजार क्विंटल लाकडाची किंमत ८९ लाख १२ हजार ४०० रुपये होते. वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे नागरिक जंगलातील लाकडे कापून होळीत जाळून आनंदोत्सव साजरा करतात. पर्यावरणाची हाणी करणाऱ्या या प्रकाराला टाळण्यासाठी मात्र नागरिकांकडून फारसा प्रतिसाद दिसत नाही.होळीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी ‘इको फ्रेन्डली होळी’ सारखे उपक्रम प्रत्येक गावात राबविले जाणे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने गरजेचे आहे. पण त्यासाठी शासनाकडून पुढाकार घेतला जात नाही.