शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

८९ लाखांची वनसंपदा राख

By admin | Updated: March 6, 2015 01:42 IST

मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ‘ग्लोबल वार्मिंग’चे संकट उभे आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना आणली.

नरेश रहिले गोंदियामोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ‘ग्लोबल वार्मिंग’चे संकट उभे आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून १०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे, मात्र एकीकडे झाडे लावून ती जगविण्याचा खटाटोप सुरू असताना गुरुवारी सायंकाळी जिल्हाभरात २७२९ होळ्यांमधून १४ हजार ९५८ क्विंटल लाकडांची राखरांगोळी करण्यात आली. दुर्दैवाने या होळीत जाळण्यासाठी वापरलेली अर्ध्यापेक्षा जास्त लाकडे जीवंत झाडांवर कुऱ्हाड चालवून आणली होती.जिल्ह्याच्या १६ पोलीस ठाण्यांतर्गत १ हजार ७७३ सार्वजनिक तर ९५६ होळ्या खासगीरित्या पेटविण्यात आल्या. प्रत्येक होळीत किमान ५ क्विंटल लाकडे जळाल्याचे गृहित धरले तरी १५ हजार लाकडांची किंमत आजघडीला ८९ लाख १२ हजार ४०० रूपये होते. होळीतून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी कितीही जनजागृती केली तरी प्रत्यक्षात परंपरा जपण्याकडेच नागरिकांचा कल असल्याचे यातून दिसून आले.गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १२६ सार्वजनिक होळी तर खासगी ३००, रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६५, खासगी २६, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४० तर खासगी ९१, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १७१ खासगी ५०, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६०, खासगी २१, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४० तर खासगी २६, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १६१ तर खासगी ७०, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १५० तर खासगी ४३, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ७६, खासगी १०, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक २४२, खासगी ४६, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३५, खासगी ५१, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ५६ तर खासगी ११५, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४३ तर खासगी १०, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ९१ तर खासगी ६० होळ्या पेटविण्यात आल्या.एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. मात्र त्याच गावातील नागरिकांनी जंगलातील, शेतातील झाडे तोडून कोट्यवधीची वनसंपदा होळीसाठी नष्ट केली जाते. आजघडीला एक क्विंटल लाकडाची किमत ६०० रुपये सांगितले जाते. या १४ हजार क्विंटल लाकडाची किंमत ८९ लाख १२ हजार ४०० रुपये होते. वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे नागरिक जंगलातील लाकडे कापून होळीत जाळून आनंदोत्सव साजरा करतात. पर्यावरणाची हाणी करणाऱ्या या प्रकाराला टाळण्यासाठी मात्र नागरिकांकडून फारसा प्रतिसाद दिसत नाही.होळीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी ‘इको फ्रेन्डली होळी’ सारखे उपक्रम प्रत्येक गावात राबविले जाणे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने गरजेचे आहे. पण त्यासाठी शासनाकडून पुढाकार घेतला जात नाही.