शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

हवामान खात्याचा अंदाज चुकला

By admin | Updated: July 9, 2017 00:17 IST

मे महिन्याच्या शेवटी शासनाच्या अखत्यारीतील हवामान खात्याने मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर

परशुरामकर : जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी संकटात लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मे महिन्याच्या शेवटी शासनाच्या अखत्यारीतील हवामान खात्याने मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर मान्सून सक्रिय झाल्याने पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार शेतकरी कामाला लागले. परंतु आजपर्यंत २९२ मिमी पावसाची आवश्यकता असताना जिल्ह्यात फक्त १५० मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन आतापासूनच शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जि.प. सदस्य परशुरामकर यांनी केली आहे. जिल्ह्यात सुमारे १.९० लाख हेक्टरमध्ये धानाचे पीक घेतले जाते. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी साधारणत: मृग नक्षत्राच्या मध्यानंतर धानाची पेरणी करतात. पण यावर्षी शासनाच्या अखत्यारीतील हवामान खात्याने व त्याला अनुसरुन प्रसिध्दी माध्यमांनी, मानसून सक्रिय झाल्याने जून महिन्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस होईल, असे भाकीत वर्तविले. त्यानुसार शेतकऱ्यांनी रोपवाटिकेसाठी जमिनी तयार करुन महागडे वान खरेदी केले व नर्सरी टाकली. सुरुवातीला एक-दोन दिवस पाऊस झाला, त्यामुळे काही रोपे उगवली व काही उगवलीच नाही. तसेच जिल्ह्यात इतर भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अजूनपर्यंत पेरणी झालेली नाही. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पाऊस झालाच नाही. आजपर्यंत जिल्ह्यात भात शेतीला २९० मिमी. पावसाची आवश्यकता असताना फक्त १५० मिमी. पाऊस झाला, म्हणजे निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. काही ठिकाणी उगवलेली नर्सरी पाऊस न झाल्याने करपू लागलेली आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. तर काही ठिकाणी पेरणी झालेली नाही. त्या शेतकऱ्यांंना चांगल्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस आल्यावरच शेतीकामांना गती येऊ शकेल. एकंदरीत पावसाचे प्रमाण पाहता दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे.