शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

पाऊले चालती शहराची वाट...

By admin | Updated: August 29, 2015 01:51 IST

शहरातील चमक-धमक म्हणा किंवा रोजीरोटीची साधने, मात्र ग्रामीण जनता शहराकडे ओढली जात आहे.

जनगणना २०११ : शहरी क्षेत्रात ५७.५२ तर ग्रामीण ४.२१ टक्के वाढगोंदिया : शहरातील चमक-धमक म्हणा किंवा रोजीरोटीची साधने, मात्र ग्रामीण जनता शहराकडे ओढली जात आहे. हेच कारण आहे की, ग्रामीण क्षेत्रात जेथे लोकसंख्या वाढ फक्त ४.२१ टक्के झाली, तिथेच शहरी क्षेत्रात ५७.५२ टक्के वाढ झाली आहे. ही नोंद जिल्ह्यात सन २००१ व सन २०११ या दशकाच्या जनगणनेत करण्यात आली आहे. धर्मनिहाय बघितल्यास ग्रामीण क्षेत्रात मुस्लीम, शिख, जैन, बौद्ध व अन्य धर्मियांत चांगलीच घट झाल्याचे दिसते. सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख २२ हजार ५०७ नोंदविण्यात आली आहे. यात १० लाख ९६ हजार ५७७ लोक ग्रामीण तर दोन लाख २५ हजार ९३० लोक शहरी क्षेत्रात असल्याचे नोंद आहे. सन २००१ मध्ये १२ लाख ७०७ लोकसंख्येतून ग्रामीण क्षेत्रात १० लाख ५२ हजार २७६ व शहरात एक लाख ४३ हजार ४३१ लोकसंख्येची नोंद आहे. येथे सन २००१ च्या तुलनेत सन २०११ मध्ये ग्रामीण क्षेत्रात ४.२१ टक्के वाढ बघण्यात आली आहे. यात हिंदू ४.८७ टक्के, ख्रिश्चन ५८.९४ टक्के, मुस्लीम ५.५९ टक्के, शिख १०.३८ टक्के, जैन १४.९० टक्के, बौद्ध २.९९ टक्के व अन्य धर्मियांत ६२.२५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे जनगणनेदरम्यान ग्रामीण क्षेत्रातील दोन हजार ७०९ पुरूषांनी व दोन ४८३ महिलांनी आपला धर्म सांगीतलेला नाही. मात्र शहरातील लोकसंख्येत ५७.५२ टक्के वाढ झाली आहे. सन २००१ मध्ये शहरातील लोकसंख्या एक लाख ४३ हजार ४३१ होती. सन २०११ पर्यंत ही वाढून दोन लाख २५ हजार ९३० वर पोहचली. यात धर्मनिहाय बघितल्यास हिंदू ६०.०६ टक्के, मुस्लीम ४६.४३ टक्के, शिख ५२.६४ टक्के, ख्रिश्चन २४.०३ टक्के, जैन १६.४६ टक्के व अन्य धर्मियांत ५५.९२ टक्के वाढ झाली आहे. शहरात ७५० पुरूष व ६३० महिलांनी आपला धर्म सांगीतला नाही. जिल्ह्यात लोकसंख्येत घट नोंद करण्यात आली आहे. मात्र काही विशेष धर्मांची लोकसंख्या वाढलेली असल्याचे दिसते. (शहर प्रतिनिधी)