शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

अन्न पदार्थांची तपासणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:39 IST

उघड्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने पोटात आजार होण्याचा धोका असल्याने तपासणीचे कडक नियम तयार करण्यात आले. परंतु गोंदिया शहर व जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी अशी तपासणी केली जात नाही. परिणामी संबंधित विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उघड्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने पोटात आजार होण्याचा धोका असल्याने तपासणीचे कडक नियम तयार करण्यात आले. परंतु गोंदिया शहर व जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी अशी तपासणी केली जात नाही. परिणामी संबंधित विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.उघड्यावरील विविध खाद्यपदार्थांचे आपण सेवन करतो. पण यातील अन्नघटक आरोग्यासाठी कितपत हितकारक व घातक आहे याची कल्पना नसते. त्यामुळेच अन्न पदार्थाची विविध निकषावर तपासणी करण्यासाठी शासनाने अन्न व औषध प्रशासन विभागाची यंत्रणा तयार केली आहे. गोंदिया शहरातील बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत आहे. विविध हॉटेल्स व रस्त्यावर अन्न पदार्थ विक्री केले जाते. पण नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, अन्न पदार्थापासून त्यांना कोणताही अपाय होऊ नये, याकरिता कठोर तपासणी करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या या यंत्रणेची जवाबदारी महत्वपूर्ण ठरते.मात्र, जिल्ह्यात विभागाच्या कारवाया थंडावल्या आहेत. याचा गैरफायदा अन्न पदार्थ विकणारे विक्रेते घेत आहेत. असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याशिवाय खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करुन ग्राहकांच्या माथी मारण्याच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. यातून आर्थिक व आरोग्याचे नुकसान होत आहे. खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी संबंधित विभागाने कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.खाद्य तेलात भेसळीचे प्रमाण वाढलेदुग्धजन्य पदार्थासोबत खाद्यतेलात भेसळ करण्याच्या घटना उजेडात येत आहेत. खाद्य पदार्थात भेसळीचे प्रमाण वाढले. शासनाने तंबाखूजन्य पदार्थांची बंदी केली आहे. खर्रा विक्री करणाऱ्या पानठेला चालकांवर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. पण, पानठेल्यांवर कारवाई करण्याची मोहिम थंडावली. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन संबंधित दोषी दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी ग्राहक करीत आहेत.अपायकारक औषधींचा शोध घ्यावाखाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या हॉटेलांपासून तर पानठेला चालकांची नियमित तपासणी करावी लागते. खाद्य पदार्थ उघड्यावर बनविण्यास नियमानुसार सक्त मनाई आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता आहे किंवा नाही यासंदर्भात अनेक बाबींची तपासणी केली जाते. दोष सिद्ध झाल्यास कारवाई होते. औषध विक्रेत्यांकडेही अपयकारक औषधी असण्याची शक्यता असल्याने कठोर तपासणीची गरज आहे.कॉर्बाईडचा सर्रास वापरसध्या बाजारात अपरिपक्क टरबूज, केळी, परराज्यातील आंबे मोठ्या प्रमाणात येत आहेत. ते सर्रासपणे कार्बाईडने पिकविले जातात. अन्न प्रशासनाच्या नियमानुसार ही कार्बाईडने पिकविलेली फळे आरोग्यास घातक असल्यामुळे ती विकताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला गजाआड केले जाते. परंतु शहरात ना कोणत्या फळविक्रेत्याची तपासणी होते, ना कुणावर कारवाई केली जाते.

टॅग्स :foodअन्न