शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अन्न पदार्थांची तपासणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:39 IST

उघड्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने पोटात आजार होण्याचा धोका असल्याने तपासणीचे कडक नियम तयार करण्यात आले. परंतु गोंदिया शहर व जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी अशी तपासणी केली जात नाही. परिणामी संबंधित विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उघड्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने पोटात आजार होण्याचा धोका असल्याने तपासणीचे कडक नियम तयार करण्यात आले. परंतु गोंदिया शहर व जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी अशी तपासणी केली जात नाही. परिणामी संबंधित विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.उघड्यावरील विविध खाद्यपदार्थांचे आपण सेवन करतो. पण यातील अन्नघटक आरोग्यासाठी कितपत हितकारक व घातक आहे याची कल्पना नसते. त्यामुळेच अन्न पदार्थाची विविध निकषावर तपासणी करण्यासाठी शासनाने अन्न व औषध प्रशासन विभागाची यंत्रणा तयार केली आहे. गोंदिया शहरातील बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत आहे. विविध हॉटेल्स व रस्त्यावर अन्न पदार्थ विक्री केले जाते. पण नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, अन्न पदार्थापासून त्यांना कोणताही अपाय होऊ नये, याकरिता कठोर तपासणी करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या या यंत्रणेची जवाबदारी महत्वपूर्ण ठरते.मात्र, जिल्ह्यात विभागाच्या कारवाया थंडावल्या आहेत. याचा गैरफायदा अन्न पदार्थ विकणारे विक्रेते घेत आहेत. असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याशिवाय खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करुन ग्राहकांच्या माथी मारण्याच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. यातून आर्थिक व आरोग्याचे नुकसान होत आहे. खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी संबंधित विभागाने कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.खाद्य तेलात भेसळीचे प्रमाण वाढलेदुग्धजन्य पदार्थासोबत खाद्यतेलात भेसळ करण्याच्या घटना उजेडात येत आहेत. खाद्य पदार्थात भेसळीचे प्रमाण वाढले. शासनाने तंबाखूजन्य पदार्थांची बंदी केली आहे. खर्रा विक्री करणाऱ्या पानठेला चालकांवर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. पण, पानठेल्यांवर कारवाई करण्याची मोहिम थंडावली. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन संबंधित दोषी दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी ग्राहक करीत आहेत.अपायकारक औषधींचा शोध घ्यावाखाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या हॉटेलांपासून तर पानठेला चालकांची नियमित तपासणी करावी लागते. खाद्य पदार्थ उघड्यावर बनविण्यास नियमानुसार सक्त मनाई आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता आहे किंवा नाही यासंदर्भात अनेक बाबींची तपासणी केली जाते. दोष सिद्ध झाल्यास कारवाई होते. औषध विक्रेत्यांकडेही अपयकारक औषधी असण्याची शक्यता असल्याने कठोर तपासणीची गरज आहे.कॉर्बाईडचा सर्रास वापरसध्या बाजारात अपरिपक्क टरबूज, केळी, परराज्यातील आंबे मोठ्या प्रमाणात येत आहेत. ते सर्रासपणे कार्बाईडने पिकविले जातात. अन्न प्रशासनाच्या नियमानुसार ही कार्बाईडने पिकविलेली फळे आरोग्यास घातक असल्यामुळे ती विकताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला गजाआड केले जाते. परंतु शहरात ना कोणत्या फळविक्रेत्याची तपासणी होते, ना कुणावर कारवाई केली जाते.

टॅग्स :foodअन्न