शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

उड्डाणपुलाच्या फाईलचा आॅफिस टू आॅफिस प्रवास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 20:53 IST

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो पाडण्याचे निर्देश रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. याला आठ महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही कुठलीच कारवाही करण्यात आली नाही.

ठळक मुद्देप्रस्ताव पाठवून प्रशासन मोकळे : शहरवासीयांवरील धोका कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो पाडण्याचे निर्देश रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. याला आठ महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही कुठलीच कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या फाईलचा प्रवास मागील आठ महिन्यापासून केवळ आॅफिस टू आॅफिस असाच सुरू आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने उड्डाणपुलावरुन जड वाहतूक बंद केली. सध्या केवळ टू व्हिलर आणि थ्री व्हिलर वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मात्र रेल्वे ट्रॅकच्या परिसरातील उड्डाणपुलाचा भाग पूर्णपणे जीर्ण झाला असून तेव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाला तीनदा पत्र देऊन जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करुन तो पाडण्याची सूचना केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन पुलाची थोडी डागडूजी केली.जुना जीर्ण उड्डाणपूल पाडूृन त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी ८४ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला. मात्र या प्रस्ताव अद्यापही कुठलाच विचार झाला नसून ही फाईल सुध्दा उघडून पाहण्यात आली नसल्याची माहिती आहे. मात्र यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुध्दा या फाईलचे नेमके काय झाले याचा पाठपुरावा केला नसल्याची माहिती आहे.केवळ शासनाकडे प्रस्ताव पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानली.त्यामुळे शहरवासीयांवरील धोका कायम आहे. एखाद्या वेळेस हा पूल कोसळून एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सुध्दा उपस्थित केला जात आहे.रेल्वे प्रशासन हतबलजुना जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात रेल्वे विभागाने आत्तापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा पत्र व्यवहार केला. तसेच या विषयावर चार ते पाच बैठका घेतल्या. मात्र यानंतरही जिल्हा प्रशासनातर्फे जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी कुठलेच पाऊल उचलण्यात आले नसल्याने रेल्वे विभाग सुध्दा हतबल झाला आहे.चारचाकी वाहनांची वाहतूक सुरूचजुन्या उड्डाणपुलावर चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असला तरी या पुलावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत आहे.विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक पोलीस शिपाय देखील कर्तव्यावर राहत असून त्यांच्याच डोळ्यादेखत नियमाचे उल्लघंन करुन सर्रासपणे चारचाकी वाहने धावत आहे.पाठपुराव्यासाठी कुणी पुढे येईनाशहरातील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी राजकीय वजनाची गरज आहे. मात्र मागील आठ महिन्यांपासून ८४ कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडला आहे. मात्र यासाठी पाठपुरावा करण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याचे चित्र आहे.आचारसंहितेने काम लांबणीवरसध्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने याचा उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला सुध्दा फटका बसल्याची माहिती आहे.पुन्हा दोन महिने पुलाच्या प्रस्तावावर विचार होण्याची शक्यता कमी असून तोपर्यंत शहरवासीयांना धोका पत्थकारावा लागणार आहे.