शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

ठरावीक वेळापत्रकातील बसफेऱ्या केल्या जातात रद्द

By admin | Updated: November 19, 2014 22:50 IST

गोंदियाच्या मुख्य बस स्थानकातून सकाळ ते सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या वेळी वेळापत्रकानुसार देवरी, चिचगड व ककोडीसाठी बसेस आहेत. परंतु कधी वाहक नाही, कधी चालक नाही तर कधी बस उपलब्ध नाही,

देवरी : गोंदियाच्या मुख्य बस स्थानकातून सकाळ ते सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या वेळी वेळापत्रकानुसार देवरी, चिचगड व ककोडीसाठी बसेस आहेत. परंतु कधी वाहक नाही, कधी चालक नाही तर कधी बस उपलब्ध नाही, असे सांगून यापैकी अनेक बसफेऱ्या रद्द केल्या जातात. त्यामुळे देवरी, चिचगड व ककोडीकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठीच गैरसोय होत आहे. यासाठी आगार व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या मार्गावर अनेकदा बसेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन ते तीन तास विलंबाने सुटतात. तसेच अनेकदा दोन ते तीन बसेस एकापाठोपाठ एक सुटत असल्याचे चित्र बघायला मिळते. अशावेळी त्या बसेस रिकाम्याच धावत असल्याचेसुध्दा दिसून येते. याप्रकारामुळे प्रवाशांची मोठीच गैरसोय होते. शिवाय एसटी महामंडळाचेसुध्दा नुकसान होते. याकडे एसटी महामंडळाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. याबाबत अनेकदा आगार व्यवस्थापक व भंडाऱ्याचे विभागीय नियंत्रक यांच्याकडे प्रवाशांनी व लोकप्रतिनिधींनी लिखीत तक्रारी दिल्या आहे. परंतु वेळापत्रकानुसार बसेसच्या संचालनात कसलीही सुधारणा करण्यात आली नाही. यावरून अधिकाऱ्यांना मनमर्जीने काम करण्याची खुली सुट देण्यात आली तर नाही, असा संशय निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. देवरी तालुका आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त तालुका आहे. शासनाव्दारे आदिवासींच्या उन्नती व प्रगतीसाठी विविध योजना करोडो रुपये खर्च करून राबविल्या जात आहे. परंतु राज्य परिवहन महामंडळ कुंभकर्णी निद्रेत असल्याने आदिवासी भागातील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गोंदिया आगार व्यवस्थापकांव्दारे १६, १७, व १८ नोव्हेंबर रोजी एक अतिरीक्त बस सकाळी ६.३० वाजता गोंदियावरून देवरीसाठी सोडण्यात येत असल्याची चर्चा आहे. परंतु आता गर्दीचे कसलेही सिजन नसताना सदर बसेस का सोडल्या जातात, अशा प्रश्न देवरी परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. वेळापत्रानुसार बसेस चालविल्या जात नाही. त्याबाबत चौकशी केली तर बहानेबाजी करून टालमटोल केला जातो. असे असतानाही मग एक अतिरीक्त बस सोडण्यामागे काय कारण आहे, याविषयी चर्चा होत आहे. नवीन आमदार संजय पुराम यांनी या समस्येकडे लक्ष देऊन प्रवाश्यांचे सोईसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी देवरी तालुकावासीयांनी केली आहे.