शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

हक्काच्या आशियानासाठी पाच हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 21:42 IST

सर्वांच्या स्वप्नातील हक्काच्या घरकुलाचे साकारण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडून पतप्रधान शहरी आवास योजना राबविली जात आहे. चार विविध घटकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आपल्या हक्काच्या आशियानासाठी नगर परिषदेकडे शहरातील चार हजार ६६७ नागरिकांनी अर्ज केले आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान शहरी आवास योजना : चार घटकांतून होणार घरांची निर्मिती

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वांच्या स्वप्नातील हक्काच्या घरकुलाचे साकारण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडून पतप्रधान शहरी आवास योजना राबविली जात आहे. चार विविध घटकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आपल्या हक्काच्या आशियानासाठी नगर परिषदेकडे शहरातील चार हजार ६६७ नागरिकांनी अर्ज केले आहे.आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी कित्येक जण आपल्या पोटाला चिमटा देऊन पै पै जोडतात. जोडलेला पैसा कमी पडल्यास उधार उसणवारी किंवा बँकेक डून कर्ज घेऊन छोट्याशा काही होईना घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. यात कित्येकांची स्वप्नपुर्ती होते तर काहींना भाडयाच्या घरात तर त्यापेक्षा हलाखीची परिस्थिती असलेल्यांना झोपडपट्टीतच जीवन जगावे लागते. मात्र प्रत्येकाकडे त्यांच्या हक्काचे घर असावे हा हेतू बाळगून गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मुलन मंत्रालयाच्यावतीने पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. ग्रामीण व शहरी अशा दोन भागांत राबविण्यात येत असलेल्या या योजनेला देशात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. २०२२ पर्यंत प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे घर देण्याचा शासनाचे उद्दिष्टय आहे. सर्व घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा. यासाठी ही योजना चार टप्प्यात राबविली जात आहे. शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेत ही योजना पंतप्रधान आवास योजना (शहरी) या नावाने राबविली जात आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात ही योजना राबविली जात असल्याने यासाठी नगर परिषदेकडे आतापर्यंत ४ हजार ६६७ अर्ज आले आहेत. यावर नगर परिषदेकडून कारवाई सुरू आहे.त्यामुळे अर्ज करणाऱ्या नागरिकांचे हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकारण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यात आहे.नगर परिषदेक डून प्रक्रिया सुरूचार घटकांतून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत नगर परिषदेला चार हजार ६६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील पात्र अर्जांची छाननी सुरू आहे. याशिवाय नगर परिषदेकडून यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू आहे. या योजनेचे शहरात क्रियान्वयन झाल्यास शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांना फायदा मिळणार.याशिवाय कमकुवत घटकातील नागरिकांनाही त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहे.