शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या आशियानासाठी पाच हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 21:42 IST

सर्वांच्या स्वप्नातील हक्काच्या घरकुलाचे साकारण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडून पतप्रधान शहरी आवास योजना राबविली जात आहे. चार विविध घटकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आपल्या हक्काच्या आशियानासाठी नगर परिषदेकडे शहरातील चार हजार ६६७ नागरिकांनी अर्ज केले आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान शहरी आवास योजना : चार घटकांतून होणार घरांची निर्मिती

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वांच्या स्वप्नातील हक्काच्या घरकुलाचे साकारण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडून पतप्रधान शहरी आवास योजना राबविली जात आहे. चार विविध घटकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आपल्या हक्काच्या आशियानासाठी नगर परिषदेकडे शहरातील चार हजार ६६७ नागरिकांनी अर्ज केले आहे.आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी कित्येक जण आपल्या पोटाला चिमटा देऊन पै पै जोडतात. जोडलेला पैसा कमी पडल्यास उधार उसणवारी किंवा बँकेक डून कर्ज घेऊन छोट्याशा काही होईना घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. यात कित्येकांची स्वप्नपुर्ती होते तर काहींना भाडयाच्या घरात तर त्यापेक्षा हलाखीची परिस्थिती असलेल्यांना झोपडपट्टीतच जीवन जगावे लागते. मात्र प्रत्येकाकडे त्यांच्या हक्काचे घर असावे हा हेतू बाळगून गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मुलन मंत्रालयाच्यावतीने पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. ग्रामीण व शहरी अशा दोन भागांत राबविण्यात येत असलेल्या या योजनेला देशात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. २०२२ पर्यंत प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे घर देण्याचा शासनाचे उद्दिष्टय आहे. सर्व घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा. यासाठी ही योजना चार टप्प्यात राबविली जात आहे. शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेत ही योजना पंतप्रधान आवास योजना (शहरी) या नावाने राबविली जात आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात ही योजना राबविली जात असल्याने यासाठी नगर परिषदेकडे आतापर्यंत ४ हजार ६६७ अर्ज आले आहेत. यावर नगर परिषदेकडून कारवाई सुरू आहे.त्यामुळे अर्ज करणाऱ्या नागरिकांचे हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकारण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यात आहे.नगर परिषदेक डून प्रक्रिया सुरूचार घटकांतून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत नगर परिषदेला चार हजार ६६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील पात्र अर्जांची छाननी सुरू आहे. याशिवाय नगर परिषदेकडून यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू आहे. या योजनेचे शहरात क्रियान्वयन झाल्यास शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांना फायदा मिळणार.याशिवाय कमकुवत घटकातील नागरिकांनाही त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहे.