शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

पहिल्याच दिवशी पाच शाळांची वाजली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

सालेकसा : शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग गुरुवारपासून (दि.१५) सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी ग्रामपंचायतचा ठराव आणि ...

सालेकसा : शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग गुरुवारपासून (दि.१५) सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी ग्रामपंचायतचा ठराव आणि पालकांचे संमतीपत्र अनिवार्य केले आहे. तालुक्यातील एकूण २७ शाळांपैकी पहिल्याच दिवशी प्रत्यक्षात केवळ ५ शाळा सुरु झाल्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळांमध्ये मोजकेच विद्यार्थी उपस्थित होते. तर तब्बल दीड वर्षानंतर शाळेचे प्रत्यक्षात दर्शन झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनाने राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत ठराव आणि पालकांचे संमतीपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासाठी अडचणी येत आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी तालुक्यातील एकूण २७ पैकी जेमतेम पाच शाळा सुरु झाल्या. यात दोन माध्यमिक शाळा आणि तीन प्राथमिक शाळेतील आठव्या वर्गांचा समावेश आहे. ग्रामीण भागात ज्या गावामध्ये मागील एक महिन्यापासून एकही कोरोना रुग्ण नाही अशा गावात ग्रामपंचायतने दिलेल्या ठरावानुसार शाळा सुरु करता येईल असे आदेश शासनाने काढले आहे. ठराव दिल्यास १५ जुलैपासून शाळा सुरु करावी. ज्यात ८ वी ते १२ पर्यंत किंवा त्यापैकी कोणतेही वर्ग असतील अशी शाळा सुरु करावी असे आदेश दिले. शाळा सुरु करण्याचा चेंडू ग्रामपंचायतच्या कोर्टात टाकला. प्राथमिक शाळांमध्ये आठव्या वर्गात त्या गावचेच विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु ज्या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जेथे बारावीपर्यंत वर्ग असतात त्या शाळांमध्ये इतर गावाचे विद्यार्थी सुध्दा येतात. तेथे येणारे विद्यार्थी ५ ते १० किमी पेक्षा जास्त अंतरावरचे सुध्दा असतात. अशात त्या शाळांना तसा ठराव मिळणे कठीण असते. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा पेच निर्माण झालेला आहे. तालुक्यातील बिंझली, बोदलबोडी आणि झालीया येथील प्राथमिक तर निंबा आणि मक्काटोला येथील माध्यमिक शाळा गुरुवारी पहिल्या दिवशी सुरु करण्यात आल्या. तर इतर शाळांना ग्रामपंचायतचा ठराव आणि पालकांच्या संमतीपत्राची प्रतीक्षा आहे.

..........

टप्प्या टप्प्याने सुरु होणार शाळा

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात आला असून पालक सुध्दा आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी अनुकूल होत आहेत. त्यामुळेच गुरुवारी जिल्ह्यातील १४२ ग्रामपंचायती व समित्यांनी शाळा सुरु करण्याचे ठराव पारित केले आहे. येत्या आठवडाभरात आणखी ठराव पारित होण्याची शक्यता असून टप्प्या टप्प्याने शाळा सुरु होणार आहेत. गुरुवारपासून काही शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता.

.............

कोट

शासन निर्णय ७ जुलै मधील समित्यांद्वारा निर्णय घेऊनच शाळा सुरु कराव्यात. विना समिती विना ठराव शाळा सुरु करु नये असे निर्देश शाळांना दिले आहे.

- एस.जी.वाघमारे, गटशिक्षणाधिकारी पं.स.सालेकसा