शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

पहिल्याच दिवशी पाच शाळांची वाजली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

सालेकसा : शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग गुरुवारपासून (दि.१५) सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी ग्रामपंचायतचा ठराव आणि ...

सालेकसा : शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग गुरुवारपासून (दि.१५) सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी ग्रामपंचायतचा ठराव आणि पालकांचे संमतीपत्र अनिवार्य केले आहे. तालुक्यातील एकूण २७ शाळांपैकी पहिल्याच दिवशी प्रत्यक्षात केवळ ५ शाळा सुरु झाल्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळांमध्ये मोजकेच विद्यार्थी उपस्थित होते. तर तब्बल दीड वर्षानंतर शाळेचे प्रत्यक्षात दर्शन झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनाने राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत ठराव आणि पालकांचे संमतीपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासाठी अडचणी येत आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी तालुक्यातील एकूण २७ पैकी जेमतेम पाच शाळा सुरु झाल्या. यात दोन माध्यमिक शाळा आणि तीन प्राथमिक शाळेतील आठव्या वर्गांचा समावेश आहे. ग्रामीण भागात ज्या गावामध्ये मागील एक महिन्यापासून एकही कोरोना रुग्ण नाही अशा गावात ग्रामपंचायतने दिलेल्या ठरावानुसार शाळा सुरु करता येईल असे आदेश शासनाने काढले आहे. ठराव दिल्यास १५ जुलैपासून शाळा सुरु करावी. ज्यात ८ वी ते १२ पर्यंत किंवा त्यापैकी कोणतेही वर्ग असतील अशी शाळा सुरु करावी असे आदेश दिले. शाळा सुरु करण्याचा चेंडू ग्रामपंचायतच्या कोर्टात टाकला. प्राथमिक शाळांमध्ये आठव्या वर्गात त्या गावचेच विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु ज्या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जेथे बारावीपर्यंत वर्ग असतात त्या शाळांमध्ये इतर गावाचे विद्यार्थी सुध्दा येतात. तेथे येणारे विद्यार्थी ५ ते १० किमी पेक्षा जास्त अंतरावरचे सुध्दा असतात. अशात त्या शाळांना तसा ठराव मिळणे कठीण असते. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा पेच निर्माण झालेला आहे. तालुक्यातील बिंझली, बोदलबोडी आणि झालीया येथील प्राथमिक तर निंबा आणि मक्काटोला येथील माध्यमिक शाळा गुरुवारी पहिल्या दिवशी सुरु करण्यात आल्या. तर इतर शाळांना ग्रामपंचायतचा ठराव आणि पालकांच्या संमतीपत्राची प्रतीक्षा आहे.

..........

टप्प्या टप्प्याने सुरु होणार शाळा

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात आला असून पालक सुध्दा आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी अनुकूल होत आहेत. त्यामुळेच गुरुवारी जिल्ह्यातील १४२ ग्रामपंचायती व समित्यांनी शाळा सुरु करण्याचे ठराव पारित केले आहे. येत्या आठवडाभरात आणखी ठराव पारित होण्याची शक्यता असून टप्प्या टप्प्याने शाळा सुरु होणार आहेत. गुरुवारपासून काही शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता.

.............

कोट

शासन निर्णय ७ जुलै मधील समित्यांद्वारा निर्णय घेऊनच शाळा सुरु कराव्यात. विना समिती विना ठराव शाळा सुरु करु नये असे निर्देश शाळांना दिले आहे.

- एस.जी.वाघमारे, गटशिक्षणाधिकारी पं.स.सालेकसा