शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

पहिल्याच पावसात जिल्ह्यातील तलाव भरले

By admin | Updated: July 21, 2016 01:25 IST

गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. मात्र पहिल्याच पावसात जिल्ह्यातील दिना जलाशय व इतर तलाव तुडूंब भरले आहेत.

शेती सिंचनासाठी सोय : धान रोवणीची कामे मात्र रखडली गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. मात्र पहिल्याच पावसात जिल्ह्यातील दिना जलाशय व इतर तलाव तुडूंब भरले आहेत. अनेक ठिकाणी तलाव भरल्यामुळे उन्हाळ्यात शेती सिंचनाची चांगली सोय निर्माण झाली आहे. अजून पावसाळ्याचे दीड ते दोन महिने बाकी असताना गडचिरोली जिल्ह्यातील तलाव भरल्यामुळे शेतकरी सध्या आनंदी आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी गडचिरोली जिल्ह्यात धानाच्या पेरण्या केवळ १३ ते १५ टक्केच जवळपासच झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी रोवणीसाठी टाकलेले पऱ्हे अतिवृष्टीमुळे कुजले व सडून गेले. त्यामुळे रोवणी करिता पऱ्हे मिळणे कठीण झाले आहे. पऱ्हे नसल्यामुळे रोवणीचे काम सध्या ठप्प आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात ७३४.६ मिमी म्हणजे ५४.२ टक्के पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी तलावाच्या पाळ्या फुटल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. अहेरी तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस यंदा झाला आहे. (प्रतिनिधी) आतापर्यंत जिल्ह्यात ५५.५ टक्के पाऊस २० जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यात १०.३ मीमी पाऊस झाला आहे. गडचिरोली, कुरखेडा येथे पाऊस झाला नाही. तर आरमोरी येथे ७.३, चामोर्शी १४.८, सिरोंचा १४.४, अहेरी २८, एटापल्ली १२.८, धानोरा ४.७, कोरची ०.३, देसाईगंज २.३, मुलचेरा ३२.८, भामरागड तालुक्यात २२.६ मीमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. ५५२ मीमी पाऊस जिल्ह्यात झाला असून यावर्षात ५५.५ मीमी पाऊस झाला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मागील वर्षी या कालावधीपर्यंत ८८.५ मीमी पाऊस झाला होता, असेही प्रशासनाने म्हटले आहे.