शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सुविधा विकासाला प्रथम प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : वाहतुकीसाठी चांगले रस्ते, शेतकऱ्यांना सिंचनाची सोय, नागरिकांना शुध्द पाणी व दर्जेदार आरोग्याची सुविधा व ...

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : पांजरा-खातीया येथे विकास कामांना सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहतुकीसाठी चांगले रस्ते, शेतकऱ्यांना सिंचनाची सोय, नागरिकांना शुध्द पाणी व दर्जेदार आरोग्याची सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या कामांना आपले प्रथम प्राधान्य आहे. पायाभूत सुविधांचा विकास झाला तर परिसराचा सर्वांगीण विकास होईल. याच दृष्टीने तालुक्यात १० नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. तर सिंचनाच्या सुविधेमुळे मागील पाच वर्षांत चारशे हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय झाल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.आ.अग्रवाल यांच्या प्रयत्नांने मंजूर ५० लाख रुपयांच्या निधीतून पांजरा-कामठा मार्गांचे डांबरीकरण व रस्ता सिंमेटीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा सीमा मडावी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विजय लोणारे,सत्यम बहेकार, संतोष घरसेले, हुकुमचंद नागपूरे, टिकाराम भाजीपाले, दिनेश अग्रवाल, खेमन बिरनवार, चेतन नागपूरे, रमन लिल्हारे, महेश माहुले, रामरतन गणविर,अनिल धुर्वे, निर्मला सव्वालाखे, कविता मेश्राम, लक्ष्मी लिल्हारे, डुलेश्वरी कापसे, गिरधारी बघेले, रमेश नागपूरे, फागुजी मेश्राम, जयचंद लिल्हारे उपस्थित होते.सीमा मडावी म्हणाल्या, शासनाच्या विविध योजना जतनेपर्यंत पोहचवून त्यांचा सर्वांगिन विकास करण्याचे काम आ.अग्रवाल यांच्या नेतृत्वात सुरू आहे. विविध योजनांच्या शिबिरांचे आयोजन करुन गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला जात असल्याचे सांगितले.माधुरी हरिणखेडे म्हणाल्या, आ.अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात या परिसरात विविध विकास कामे सुरू आहेत. रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाला लवकरच सुरूवात होणार आहे. तर रजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांच्याच पाठपुराव्यामुळे गती मिळाल्याचे सांगितले.सरपंच नागपूरे यांनी आ.अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे यावर्षी १२ लाख रुपयांच्या ग्रामपंचायत इमारत बांधकामाला मंजुरी मिळाली. तर पांगोली नदीवर पांजरा-लंबाटोला दरम्यान तयार करण्यात येणाºया बंधाºयामुळे या परिसरातील शेकडो हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश रहमतकर, मनीष मेश्राम, गेंदलाल शरणागत, संतोष बागडे, इठूजी तावाडे, मनोज नैकाने, मोहन मेंढे, बाबुराव तावाडे, सुकचंद शहारे, बंडू सोलंकी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल