शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
3
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
4
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
5
महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
6
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
8
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
9
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
10
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
11
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
12
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
13
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
14
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
15
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
16
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
17
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
18
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
19
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
20
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक

पहिल्याच दिवशी एटीएममध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:07 IST

शहरात विविध कंपन्यांचे पन्नासावर एटीएम आहेत. मात्र रविवारी (दि.४) जवळपास सर्वच एटीएममध्ये नो कॅशचे फलक लागले होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एटीएममध्ये तुटवडा निर्माण झाल्याने पुढील तीन चार दिवस काय असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देग्राहकांची भटकंती : कॅशचा तुटवडा, अर्ध्यापेक्षा अधिक एटीएम रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात विविध कंपन्यांचे पन्नासावर एटीएम आहेत. मात्र रविवारी (दि.४) जवळपास सर्वच एटीएममध्ये नो कॅशचे फलक लागले होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एटीएममध्ये तुटवडा निर्माण झाल्याने पुढील तीन चार दिवस काय असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. तर एटीएम घेवून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आल्या पावलीच परत जाण्याची वेळ आली. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.दिवाळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असून बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. रविवारी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसूबारस निमित्त शहरातील व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आले होते. जेव्हापासून एटीएमची सुविधा उपलब्ध झाली तेव्हापासून बरेच ग्राहक स्वत:जवळ रोख रक्कम न बाळगता एटीएम ठेवतात. तसेच शहरातील बाजारपेठ व इतर भागात विविध कंपन्याचे ५२ एटीएम आहे. यापैकी बाजारपेठ परिसरातील सर्वच एटीएममध्ये रविवारी नो कॅशचे बोर्ड लागले होते.तर शनिवारी सुद्धा बहुतेक एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच अडचण झाली. शहरातील सर्वच विक्रेत्यांकडे एटीएम कार्ड स्वॉप करुन खरेदी करण्याची सुविधा नाही.काही मोजक्याच व्यावसायीकांकडे ही सुविधा आहे. त्यामुळे एटीएम कार्डच्या भरोश्यावर खरेदी करण्यासाठी आलेल्या अनेक ग्राहकांना खरेदी न करताच परत जावे लागले. रविवारी दुपारी स्टेट बँकेच्या एटीएममध्ये कॅश उपलब्ध होती. त्यामुळे या एटीएम केंद्राबाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांची रांग लागली होती. मात्र संध्याकाळी हे एटीएम सुद्धा रिकामे झाले. परिणामी काही ग्राहकांना शहराबाहेरील एटीएम केंद्रात जावून पैसे काढण्याची वेळ आली आहे. दरम्यान या प्रकारामुळे ग्राहकांनी बँक प्रशासन आणि एटीएम कंपन्यांवर रोष व्यक्त केला.कार्डलेस व्यवहारासाठी नो कॅशदिवाळी दरम्यान ग्राहक विविध वस्तूंची खरेदी करतात. मात्र हा सर्व व्यवहार रोख रक्कमेने केला जातो. यामुळे बरेचदा कॅशची टंचाई निर्माण होत असते. केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीनंतर कार्डलेस व्यवहाराला अधिक प्राधान्य दिले आहे. यासाठी विविध अ‍ॅप देखील तयार केले आहे. पण, यानंतरही याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच एटीएममध्ये कॅशचा तुटवडा निर्माण करुन ग्राहकांना कार्डलेस व्यवहाराची सवय लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.बहुतेक एटीएम सुरक्षा रक्षकाविनाचएटीएम मशीन्सची छेडछाड व फोडण्याचे घटना वाढत आहे. मात्र यानंतर बँका आणि संबंधित कंपन्यानी अद्यापही एटीएमच्या सुरक्षेबाबत पाऊल उचलले नाही. त्यामुळे केवळ सीसीटिव्ही भरोश्यावर एटीएमची सुरक्षा केली जात असल्याचे चित्र आहे. तर बहुतेक एटीएममध्ये सुरक्षा रक्षकाची नियुक्तीच करण्यात आली नाही.बँकांचे मौनशहरातील बहुतेक एटीएम हे राष्ट्रीयीकृत बँका आणि कंपन्याचे आहेत. मात्र या सर्व एटीएममध्ये शनिवार (दि.३)पासून ठणठणाठ आहे. यामुळे ग्राहकांना एटीएमच्या शोधात दूरवर भटकंती करावी लागत आहे. एटीएममध्ये निर्माण झालेल्या कॅशच्या तुटवड्याबाबत बँकाना विचारणा केली असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.