शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पहिल्याच दिवशी एटीएममध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:07 IST

शहरात विविध कंपन्यांचे पन्नासावर एटीएम आहेत. मात्र रविवारी (दि.४) जवळपास सर्वच एटीएममध्ये नो कॅशचे फलक लागले होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एटीएममध्ये तुटवडा निर्माण झाल्याने पुढील तीन चार दिवस काय असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देग्राहकांची भटकंती : कॅशचा तुटवडा, अर्ध्यापेक्षा अधिक एटीएम रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात विविध कंपन्यांचे पन्नासावर एटीएम आहेत. मात्र रविवारी (दि.४) जवळपास सर्वच एटीएममध्ये नो कॅशचे फलक लागले होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एटीएममध्ये तुटवडा निर्माण झाल्याने पुढील तीन चार दिवस काय असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. तर एटीएम घेवून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आल्या पावलीच परत जाण्याची वेळ आली. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.दिवाळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असून बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. रविवारी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसूबारस निमित्त शहरातील व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आले होते. जेव्हापासून एटीएमची सुविधा उपलब्ध झाली तेव्हापासून बरेच ग्राहक स्वत:जवळ रोख रक्कम न बाळगता एटीएम ठेवतात. तसेच शहरातील बाजारपेठ व इतर भागात विविध कंपन्याचे ५२ एटीएम आहे. यापैकी बाजारपेठ परिसरातील सर्वच एटीएममध्ये रविवारी नो कॅशचे बोर्ड लागले होते.तर शनिवारी सुद्धा बहुतेक एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच अडचण झाली. शहरातील सर्वच विक्रेत्यांकडे एटीएम कार्ड स्वॉप करुन खरेदी करण्याची सुविधा नाही.काही मोजक्याच व्यावसायीकांकडे ही सुविधा आहे. त्यामुळे एटीएम कार्डच्या भरोश्यावर खरेदी करण्यासाठी आलेल्या अनेक ग्राहकांना खरेदी न करताच परत जावे लागले. रविवारी दुपारी स्टेट बँकेच्या एटीएममध्ये कॅश उपलब्ध होती. त्यामुळे या एटीएम केंद्राबाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांची रांग लागली होती. मात्र संध्याकाळी हे एटीएम सुद्धा रिकामे झाले. परिणामी काही ग्राहकांना शहराबाहेरील एटीएम केंद्रात जावून पैसे काढण्याची वेळ आली आहे. दरम्यान या प्रकारामुळे ग्राहकांनी बँक प्रशासन आणि एटीएम कंपन्यांवर रोष व्यक्त केला.कार्डलेस व्यवहारासाठी नो कॅशदिवाळी दरम्यान ग्राहक विविध वस्तूंची खरेदी करतात. मात्र हा सर्व व्यवहार रोख रक्कमेने केला जातो. यामुळे बरेचदा कॅशची टंचाई निर्माण होत असते. केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीनंतर कार्डलेस व्यवहाराला अधिक प्राधान्य दिले आहे. यासाठी विविध अ‍ॅप देखील तयार केले आहे. पण, यानंतरही याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच एटीएममध्ये कॅशचा तुटवडा निर्माण करुन ग्राहकांना कार्डलेस व्यवहाराची सवय लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.बहुतेक एटीएम सुरक्षा रक्षकाविनाचएटीएम मशीन्सची छेडछाड व फोडण्याचे घटना वाढत आहे. मात्र यानंतर बँका आणि संबंधित कंपन्यानी अद्यापही एटीएमच्या सुरक्षेबाबत पाऊल उचलले नाही. त्यामुळे केवळ सीसीटिव्ही भरोश्यावर एटीएमची सुरक्षा केली जात असल्याचे चित्र आहे. तर बहुतेक एटीएममध्ये सुरक्षा रक्षकाची नियुक्तीच करण्यात आली नाही.बँकांचे मौनशहरातील बहुतेक एटीएम हे राष्ट्रीयीकृत बँका आणि कंपन्याचे आहेत. मात्र या सर्व एटीएममध्ये शनिवार (दि.३)पासून ठणठणाठ आहे. यामुळे ग्राहकांना एटीएमच्या शोधात दूरवर भटकंती करावी लागत आहे. एटीएममध्ये निर्माण झालेल्या कॅशच्या तुटवड्याबाबत बँकाना विचारणा केली असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.