शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सायकल दुकानाला आग लाखों रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:30 IST

अर्जुनी-मोरगाव : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या राजेश सायकल दुकानाला शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत सायकल ...

अर्जुनी-मोरगाव : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या राजेश सायकल दुकानाला शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत सायकल व इतर साहित्य जळून खाक झाले. बाहेरून अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर आग विझविण्यात यश आले. मात्र, या आगीत सायकल दुकानातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पाऊस झाला. वादळामुळे शहरातील वीज बंद होती. स्थानिक अर्बन बँकेनजीक राजेश सायकल स्टोअर आहे. या दुकानातून धुराचे लोट निघत असल्याचे कुणीतरी बघितले. बघता-बघता आगीने रौद्र रूप धारण केले. शहरातील सेवाभावी मंडळींनी आग विझविण्याचा बराच प्रयत्न केला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील बऱ्याच सायकली व इतर साहित्य जळून खाक झाले होते. नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.

......

अग्निशमन वाहनाची गरज

शहरात व तालुक्याच्या इतर गावांत आगीच्या अनेक घटना घडत असतात. मात्र, तालुक्यात एकही अग्निशमन वाहन नाही. मागील काळात अग्निशमन वाहन खरेदीचा नगरपंचायतने प्रस्ताव तयार केला होता. नंतर कुठे घोडे अडले कुणास ठाऊक? तालुक्याच्या ठिकाणी अग्निशमन वाहन नसणे ही दुर्दैवी बाब आहे. घटना घडल्यानंतर बाहेरून अग्निशमन दलाला बोलवावे लागते. एखादी घटना घडल्यानंतरच अग्निशमन वाहनाचे स्मरण होते. दोन दिवस चर्चाही होते. नंतर पदाधिकारी व प्रशासनालाही त्याचा विसर पडतो. कदाचित ही सुविधा असती, तर वेळीच आगीवर नियंत्रण मिळवून मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान टाळता येऊ शकले असते.