शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आगीत १६ दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:27 IST

शहरातील भाजीबाजारातील पान लाईनमध्ये लागलेल्या आगीत १६ दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपान लाईनमधील घटना : लाखो रुपयांचे नुकसान, व्यावसायिकांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील भाजीबाजारातील पान लाईनमध्ये लागलेल्या आगीत १६ दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास घडली. या आगीत जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.पान लाईनमध्ये लागलेल्या आगीत सिंध बुट हाऊस, साईबाबा बुट हाऊस, अंबे बुट हाऊस, न्यू बजाज क्लाथ स्टोअर्स, मुकेश फुट वेयरसह इतर दुकान जळून खाक झाली. ही आग ऐवढी उग्र होती की त्यात दुकानातील संपूर्ण साहित्याची राख झाली.प्राप्त माहितीनुसार सोमवारी पहाटेच्या सुमारास भाजीबाजारातील पान लाईनमधील दुकानांना आग लागल्याची बाब या परिसरातील रहिवाश्यांच्या लक्षात आली. त्यांनी याची माहिती लगेच शहर पोलीस स्टेशन व अग्नीशमन विभागाला दिली. त्यानंतर गोंदिया अग्नीशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीने उग्र रुप धारण केल्याने लांजी, बालघाट, तुमसर आणि अदानी प्रकल्पाच्या अग्नीशमन वाहनाना पाचारण करण्यात आले होते. जवळपास दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.गोंदिया नगर परिषद अग्नीशमन विभागाच्या चार गाड्यांनी २३ वेळा फेºया मारुन आगीवर नियंत्रण मिळविले. तर अदानी प्रकल्पाचे एक व बालाघाटच्या दोन आणि लांजी येथील वाहनाव्दारे पाणी भरुन आणून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्नीशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी वित्त हाणी टळली. याच दुकानांना लागून लोहा लाईन व भाजीबाजारातील इतर दुकाने आहे. त्यामुळे ही आग इतरत्र पसरली असती तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. दरम्यान या आगीत १६ दुकानांची अक्षरक्ष:राख झाली. दुकानातील संपूर्ण सामानाचा कोळसा झाला. त्यामुळे दुकानदारांचे दीड कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही आग शार्ट सर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच या परिसरातील एका भाड्यांच्या दुकानाला शार्ट सर्कीटमुळे आग लागली होती. मात्र वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टळले होते.लोकप्रतिनिधी, अधिकाºयांची भेटभाजीबाजारातील पान लाईनमधील दुकानांना आग लागल्याची माहिती मिळताच आ.गोपालदास अग्रवाल, माजी. आ. राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्याधिकारी चंदन पाटील, नगरसेवक पकंज यादव, लोकेश यादव व दुर्गेश रहांगडाले यांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली.विद्युत पुरवठा खंडीतपान लाईनमधील दुकांनाना शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात. त्यामुळेच आगीच्या घटनेनंतर या परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडीत ठेवण्यात आल्याची माहिती आहे. पान लाईनमधील आगीच्या घटनेनंतर शहरात विविध चर्चेला पेव फुटले आहे.