शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आगीत १६ दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:27 IST

शहरातील भाजीबाजारातील पान लाईनमध्ये लागलेल्या आगीत १६ दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपान लाईनमधील घटना : लाखो रुपयांचे नुकसान, व्यावसायिकांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील भाजीबाजारातील पान लाईनमध्ये लागलेल्या आगीत १६ दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास घडली. या आगीत जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.पान लाईनमध्ये लागलेल्या आगीत सिंध बुट हाऊस, साईबाबा बुट हाऊस, अंबे बुट हाऊस, न्यू बजाज क्लाथ स्टोअर्स, मुकेश फुट वेयरसह इतर दुकान जळून खाक झाली. ही आग ऐवढी उग्र होती की त्यात दुकानातील संपूर्ण साहित्याची राख झाली.प्राप्त माहितीनुसार सोमवारी पहाटेच्या सुमारास भाजीबाजारातील पान लाईनमधील दुकानांना आग लागल्याची बाब या परिसरातील रहिवाश्यांच्या लक्षात आली. त्यांनी याची माहिती लगेच शहर पोलीस स्टेशन व अग्नीशमन विभागाला दिली. त्यानंतर गोंदिया अग्नीशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीने उग्र रुप धारण केल्याने लांजी, बालघाट, तुमसर आणि अदानी प्रकल्पाच्या अग्नीशमन वाहनाना पाचारण करण्यात आले होते. जवळपास दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.गोंदिया नगर परिषद अग्नीशमन विभागाच्या चार गाड्यांनी २३ वेळा फेºया मारुन आगीवर नियंत्रण मिळविले. तर अदानी प्रकल्पाचे एक व बालाघाटच्या दोन आणि लांजी येथील वाहनाव्दारे पाणी भरुन आणून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्नीशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी वित्त हाणी टळली. याच दुकानांना लागून लोहा लाईन व भाजीबाजारातील इतर दुकाने आहे. त्यामुळे ही आग इतरत्र पसरली असती तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. दरम्यान या आगीत १६ दुकानांची अक्षरक्ष:राख झाली. दुकानातील संपूर्ण सामानाचा कोळसा झाला. त्यामुळे दुकानदारांचे दीड कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही आग शार्ट सर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच या परिसरातील एका भाड्यांच्या दुकानाला शार्ट सर्कीटमुळे आग लागली होती. मात्र वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टळले होते.लोकप्रतिनिधी, अधिकाºयांची भेटभाजीबाजारातील पान लाईनमधील दुकानांना आग लागल्याची माहिती मिळताच आ.गोपालदास अग्रवाल, माजी. आ. राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्याधिकारी चंदन पाटील, नगरसेवक पकंज यादव, लोकेश यादव व दुर्गेश रहांगडाले यांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली.विद्युत पुरवठा खंडीतपान लाईनमधील दुकांनाना शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात. त्यामुळेच आगीच्या घटनेनंतर या परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडीत ठेवण्यात आल्याची माहिती आहे. पान लाईनमधील आगीच्या घटनेनंतर शहरात विविध चर्चेला पेव फुटले आहे.