शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

आगीत १६ दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:27 IST

शहरातील भाजीबाजारातील पान लाईनमध्ये लागलेल्या आगीत १६ दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपान लाईनमधील घटना : लाखो रुपयांचे नुकसान, व्यावसायिकांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील भाजीबाजारातील पान लाईनमध्ये लागलेल्या आगीत १६ दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास घडली. या आगीत जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.पान लाईनमध्ये लागलेल्या आगीत सिंध बुट हाऊस, साईबाबा बुट हाऊस, अंबे बुट हाऊस, न्यू बजाज क्लाथ स्टोअर्स, मुकेश फुट वेयरसह इतर दुकान जळून खाक झाली. ही आग ऐवढी उग्र होती की त्यात दुकानातील संपूर्ण साहित्याची राख झाली.प्राप्त माहितीनुसार सोमवारी पहाटेच्या सुमारास भाजीबाजारातील पान लाईनमधील दुकानांना आग लागल्याची बाब या परिसरातील रहिवाश्यांच्या लक्षात आली. त्यांनी याची माहिती लगेच शहर पोलीस स्टेशन व अग्नीशमन विभागाला दिली. त्यानंतर गोंदिया अग्नीशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीने उग्र रुप धारण केल्याने लांजी, बालघाट, तुमसर आणि अदानी प्रकल्पाच्या अग्नीशमन वाहनाना पाचारण करण्यात आले होते. जवळपास दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.गोंदिया नगर परिषद अग्नीशमन विभागाच्या चार गाड्यांनी २३ वेळा फेºया मारुन आगीवर नियंत्रण मिळविले. तर अदानी प्रकल्पाचे एक व बालाघाटच्या दोन आणि लांजी येथील वाहनाव्दारे पाणी भरुन आणून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्नीशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी वित्त हाणी टळली. याच दुकानांना लागून लोहा लाईन व भाजीबाजारातील इतर दुकाने आहे. त्यामुळे ही आग इतरत्र पसरली असती तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. दरम्यान या आगीत १६ दुकानांची अक्षरक्ष:राख झाली. दुकानातील संपूर्ण सामानाचा कोळसा झाला. त्यामुळे दुकानदारांचे दीड कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही आग शार्ट सर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच या परिसरातील एका भाड्यांच्या दुकानाला शार्ट सर्कीटमुळे आग लागली होती. मात्र वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टळले होते.लोकप्रतिनिधी, अधिकाºयांची भेटभाजीबाजारातील पान लाईनमधील दुकानांना आग लागल्याची माहिती मिळताच आ.गोपालदास अग्रवाल, माजी. आ. राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्याधिकारी चंदन पाटील, नगरसेवक पकंज यादव, लोकेश यादव व दुर्गेश रहांगडाले यांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली.विद्युत पुरवठा खंडीतपान लाईनमधील दुकांनाना शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात. त्यामुळेच आगीच्या घटनेनंतर या परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडीत ठेवण्यात आल्याची माहिती आहे. पान लाईनमधील आगीच्या घटनेनंतर शहरात विविध चर्चेला पेव फुटले आहे.