शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

बीडटोला व भुरसीटोला गावाला समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:33 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोमलपूर अंतर्गत येत असलेली बीडटोला व भुरसीटोला ही दोन्ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत.

ठळक मुद्देमार्कंड बडवाईक : स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोमलपूर अंतर्गत येत असलेली बीडटोला व भुरसीटोला ही दोन्ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत. गावात विविध समस्या असून अद्यापही त्या मार्गी न लावल्याने गावकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.मागील २० ते २५ वर्षापूर्वी या गावात तयार केलेला ५०० मीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला असून त्यावरुन वाहने तर सोडा पायी चालणे देखील कठीण झाले आहे. गावातील समस्यांकडे प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप बीडटोला ग्रामपंचायतचे उपसरपंच मार्कंड बडवाईक यांनी केला आहे. नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्रात सोमलपूर गट ग्रामपंचायतमध्ये बीडटोला गावाचा समावेश होता. तसेच भुरसीटोला गावाचाही समावेश या गट ग्रामपंचायतमध्ये होता. निवडणुका आल्या की एक सुरक्षीत मतदार म्हणून या गावाकडे सोमलपूर येथील राजकारणी बघत असतात.आपली सत्ता आली की बीडटोला किंवा भुरसीटोला या गावाला उपसरपंच पद देवून पुढील पाच वर्षे ग्रामपंचायतवर सत्ता गाजविण्याचा प्रकार मागील २५ वर्षांपासून सुरू आहे.भुरसीटोला, बीडटोला या गावातील मुख्य रस्त्यांची अवस्था फारच दयनिय आहे. सोमलपूर, बीडटोला व भुरसीटोला ही तीन गावे मिळून ही ग्रामपंचायत तयार झाली असली तरी बीडटोला व भुरसीटोला ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत. मुंगली ते बाक्टी मार्गावरुन बीडटोला गावाकडे जाण्याच्या मार्गावर पुढील कॅनलपर्यंत ५०० मीटरचा रस्त्याचे डांबरीकरण २५ वर्षांपूर्वी करण्यात आली.तर कॅनलपासून सानगडी-नवेगावबांध मार्गापर्यंत ६०० मीटरचा भुरसीटोला गावातील मुख्य रस्ताही दहा पंधरा वर्षापूर्वी तयार केला होता. मात्र आता या दोन्ही रस्त्यांची फारच दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांना पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहे.त्यामुळे बीडटोला, बीडटोली, भिमनगर व भुरसीटोलाच्या नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. पिण्याच्या पाण्याची सुध्दा पुरेशी व्यवस्था नाही. अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्याच इमारतीत अद्यापही चिमुकल्यांवर संस्कार केले जात आहे.योजनांपासून कोसो दूरबीडटोला व भुरसीटोला येथील गावकरी अद्यापही शासनाच्या विविध विकासात्मक योजनांपासून कोसो दूर आहेत. शासनाच्या योजना अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहचल्याच नाही. स्वच्छ भारत योजनेतंर्गत शौचालयाचा लाभ सुध्दा येथील गावकºयांना मिळाला नाही.स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करासोमलपूर ग्रामपंचायत बीडटोला व भुरसीटोला या गावाची विकासाबाबत उपेक्षा करीत आहे. त्यामुळे भुरसीटोला व बीडटोला गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करावी. सोमलपूर ग्रामपंचायतचे या गावांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या गावांना सोमलपूर ग्रामपंचायतमधून वगळण्यात यावे. या दोन्ही गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतने पावले उचलण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.