शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

बीडटोला व भुरसीटोला गावाला समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:33 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोमलपूर अंतर्गत येत असलेली बीडटोला व भुरसीटोला ही दोन्ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत.

ठळक मुद्देमार्कंड बडवाईक : स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोमलपूर अंतर्गत येत असलेली बीडटोला व भुरसीटोला ही दोन्ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत. गावात विविध समस्या असून अद्यापही त्या मार्गी न लावल्याने गावकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.मागील २० ते २५ वर्षापूर्वी या गावात तयार केलेला ५०० मीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला असून त्यावरुन वाहने तर सोडा पायी चालणे देखील कठीण झाले आहे. गावातील समस्यांकडे प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप बीडटोला ग्रामपंचायतचे उपसरपंच मार्कंड बडवाईक यांनी केला आहे. नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्रात सोमलपूर गट ग्रामपंचायतमध्ये बीडटोला गावाचा समावेश होता. तसेच भुरसीटोला गावाचाही समावेश या गट ग्रामपंचायतमध्ये होता. निवडणुका आल्या की एक सुरक्षीत मतदार म्हणून या गावाकडे सोमलपूर येथील राजकारणी बघत असतात.आपली सत्ता आली की बीडटोला किंवा भुरसीटोला या गावाला उपसरपंच पद देवून पुढील पाच वर्षे ग्रामपंचायतवर सत्ता गाजविण्याचा प्रकार मागील २५ वर्षांपासून सुरू आहे.भुरसीटोला, बीडटोला या गावातील मुख्य रस्त्यांची अवस्था फारच दयनिय आहे. सोमलपूर, बीडटोला व भुरसीटोला ही तीन गावे मिळून ही ग्रामपंचायत तयार झाली असली तरी बीडटोला व भुरसीटोला ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत. मुंगली ते बाक्टी मार्गावरुन बीडटोला गावाकडे जाण्याच्या मार्गावर पुढील कॅनलपर्यंत ५०० मीटरचा रस्त्याचे डांबरीकरण २५ वर्षांपूर्वी करण्यात आली.तर कॅनलपासून सानगडी-नवेगावबांध मार्गापर्यंत ६०० मीटरचा भुरसीटोला गावातील मुख्य रस्ताही दहा पंधरा वर्षापूर्वी तयार केला होता. मात्र आता या दोन्ही रस्त्यांची फारच दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांना पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहे.त्यामुळे बीडटोला, बीडटोली, भिमनगर व भुरसीटोलाच्या नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. पिण्याच्या पाण्याची सुध्दा पुरेशी व्यवस्था नाही. अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्याच इमारतीत अद्यापही चिमुकल्यांवर संस्कार केले जात आहे.योजनांपासून कोसो दूरबीडटोला व भुरसीटोला येथील गावकरी अद्यापही शासनाच्या विविध विकासात्मक योजनांपासून कोसो दूर आहेत. शासनाच्या योजना अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहचल्याच नाही. स्वच्छ भारत योजनेतंर्गत शौचालयाचा लाभ सुध्दा येथील गावकºयांना मिळाला नाही.स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करासोमलपूर ग्रामपंचायत बीडटोला व भुरसीटोला या गावाची विकासाबाबत उपेक्षा करीत आहे. त्यामुळे भुरसीटोला व बीडटोला गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करावी. सोमलपूर ग्रामपंचायतचे या गावांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या गावांना सोमलपूर ग्रामपंचायतमधून वगळण्यात यावे. या दोन्ही गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतने पावले उचलण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.