शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिक्षणाशिवाय आर्थिक, सामाजिक क्रांती अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:48 IST

शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजचा तरूण उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे. त्याला सर्वार्थाने स्वयंपूर्ण व मजबूत बनविण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण

ऑनलाईन लोकमतअर्जुनी-मोरगाव : शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजचा तरूण उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे. त्याला सर्वार्थाने स्वयंपूर्ण व मजबूत बनविण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणाने मानवाच्या ज्ञानकक्षा रूंदावतात. माणूस अधिक प्रगल्भ बनतो व तो जबाबदारीने वागतो. पुस्तकांचे निरंतर वाचन हे आपल्या सुखी व उज्ज्वल भविष्याची दिशा ठरविणारी असते. त्यामुळे पुस्तके वाचावी. शिक्षणाने सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, बौद्धिक क्रांती घडविता येते, असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी तथा गोंदिया जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.ते येरंडी-दर्रे येथील बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात बोलत होते.उद्घाटन डी.एम. सोयाम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी चेतन उईके, शीला उईके, गोवर्धन ताराम, सरपंच शहारे, मधू बिहारी, मंजुषा चंद्रिकापुरे, ईश्वार आदी मंचावर उपस्थित होेते.चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, जोपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही तोपर्यंत प्रगती साधता येत नाही. युवकांनी इतरांची मोलमजुरी करण्यापेक्षा शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करावे. पालकांनी आपल्या पाल्यांना शिकवावे. बिरसा मुंडा यांनी शिक्षण घेतले व बंड करुन उठले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, दोन आणे जर असतील तर एक आण्याची भाकर व दुसऱ्या आण्याची पुस्तक घ्या. भाकर तुमची भूक भागवेल व पुस्तक जीवन जगवायला शिकवेल, असे विचार त्यांनी व्यक्त केले.या वेळी इतर अतिथींनीसुध्दा मार्गदशन केले. संचालन काटंगे यांनी केले. प्रास्ताविक मधू बिहारी यांनी मांडले. आभार उपसरपंच वाढवे यांनी आभार मानले.