शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

अखेर धरणाच्या पाळीवरील वृक्षतोड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 22:34 IST

इटियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील वाढलेल्या झाडांमुळे पाळीला धोका निर्माण होण्याची शक्यता लोकमतने २० मार्चच्या अंकात प्रकाशित केली होती. हे वृत्त प्रकाशित होताच इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागात खळबळ माजली.

आॅनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : इटियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील वाढलेल्या झाडांमुळे पाळीला धोका निर्माण होण्याची शक्यता लोकमतने २० मार्चच्या अंकात प्रकाशित केली होती. हे वृत्त प्रकाशित होताच इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागात खळबळ माजली. अखेर धरणाच्या पाळीवरील वृक्षतोडीला शनिवारी सुरुवात करण्यात आली. २० ते २५ फूट उंचीची झाडे होईपर्यंत ही बाब विभाग तसेच धरण सुरक्षा विभागाच्या निदर्शनास कशी आली नाही? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असून यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.यासंदर्भात इटियाडोह संरक्षण, संवर्धन समितीचे श्रीधर हटवार यांनी २६ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या धरण सुरक्षा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना तक्रार केली होती. या तक्रारीनंतरच हे बिंग फुटले होते. या विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितापणामुळे पाळीवर सुमारे २० ते २५ फूट उंचीची झाडे वाढली. वेळोवेळी वृक्ष तोड झाली असती तर ऐवढी मोठी झाडे झालीच नसती. धरण व कालवे क्षेत्रातील वाढणाºया झाडांची कत्तल करण्यासाठी निधीच उपलब्ध होत नसल्याचे तुणतुणे वाजवितात. त्यामुळे शासन व प्रशासनाचे अशा गंभीर बाबींकडे लक्षच नाही हे यातून सिद्ध होते.हटवार यांनी केलेल्या तक्रारीत अनेक वर्षांपासून पाळीवरील झाडे कापलेली नाहीत. वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे पाळीची जमीन पोखरुन धरणाचे पाणी झिरपेल व यामुळे पाळीला धोका निर्माण होऊ शकतो. ही झाडे सुमारे २० ते २५ फूट उंचीची असून यासंदर्भात धरण सुरक्षा विभागाला मार्गदर्शन मागविले होते. मात्र त्यांनी मार्गदर्शन करण्याऐवजी पावसाळा पूर्व २०१४ ते पावसाळा उत्तर २०१७ मध्ये निरीक्षण केल्याचे स्पष्ट केले. या अहवालात धरणाच्या पाळीवर झाडे वाढलेली नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात नाशिकच्या कार्यकारी अभियंत्यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश इटियाडोह पाटबंधारे विभागाला १२ मार्च रोजी दिले आहेत.या पाळीवर सुमारे २० ते २५ फूट उंचीची झाडे आहेत. ही पावसाळा उत्तर २०१७ चे नंतर अवघ्या ६ महिन्यात ऐवढी मोठी कशी होऊ शकतात. याचा अर्थ वारंवार सादर होणारा तपासणी अहवाल संशयास्पद आहे. याची योग्य ती चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.