शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

अखेर धरणाच्या पाळीवरील वृक्षतोड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 22:34 IST

इटियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील वाढलेल्या झाडांमुळे पाळीला धोका निर्माण होण्याची शक्यता लोकमतने २० मार्चच्या अंकात प्रकाशित केली होती. हे वृत्त प्रकाशित होताच इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागात खळबळ माजली.

आॅनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : इटियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील वाढलेल्या झाडांमुळे पाळीला धोका निर्माण होण्याची शक्यता लोकमतने २० मार्चच्या अंकात प्रकाशित केली होती. हे वृत्त प्रकाशित होताच इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागात खळबळ माजली. अखेर धरणाच्या पाळीवरील वृक्षतोडीला शनिवारी सुरुवात करण्यात आली. २० ते २५ फूट उंचीची झाडे होईपर्यंत ही बाब विभाग तसेच धरण सुरक्षा विभागाच्या निदर्शनास कशी आली नाही? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असून यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.यासंदर्भात इटियाडोह संरक्षण, संवर्धन समितीचे श्रीधर हटवार यांनी २६ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या धरण सुरक्षा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना तक्रार केली होती. या तक्रारीनंतरच हे बिंग फुटले होते. या विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितापणामुळे पाळीवर सुमारे २० ते २५ फूट उंचीची झाडे वाढली. वेळोवेळी वृक्ष तोड झाली असती तर ऐवढी मोठी झाडे झालीच नसती. धरण व कालवे क्षेत्रातील वाढणाºया झाडांची कत्तल करण्यासाठी निधीच उपलब्ध होत नसल्याचे तुणतुणे वाजवितात. त्यामुळे शासन व प्रशासनाचे अशा गंभीर बाबींकडे लक्षच नाही हे यातून सिद्ध होते.हटवार यांनी केलेल्या तक्रारीत अनेक वर्षांपासून पाळीवरील झाडे कापलेली नाहीत. वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे पाळीची जमीन पोखरुन धरणाचे पाणी झिरपेल व यामुळे पाळीला धोका निर्माण होऊ शकतो. ही झाडे सुमारे २० ते २५ फूट उंचीची असून यासंदर्भात धरण सुरक्षा विभागाला मार्गदर्शन मागविले होते. मात्र त्यांनी मार्गदर्शन करण्याऐवजी पावसाळा पूर्व २०१४ ते पावसाळा उत्तर २०१७ मध्ये निरीक्षण केल्याचे स्पष्ट केले. या अहवालात धरणाच्या पाळीवर झाडे वाढलेली नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात नाशिकच्या कार्यकारी अभियंत्यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश इटियाडोह पाटबंधारे विभागाला १२ मार्च रोजी दिले आहेत.या पाळीवर सुमारे २० ते २५ फूट उंचीची झाडे आहेत. ही पावसाळा उत्तर २०१७ चे नंतर अवघ्या ६ महिन्यात ऐवढी मोठी कशी होऊ शकतात. याचा अर्थ वारंवार सादर होणारा तपासणी अहवाल संशयास्पद आहे. याची योग्य ती चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.