शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कॉपीमुक्त वातावरणात दहावीची परीक्षा अंतिम टप्प्यात

By admin | Updated: March 23, 2015 01:40 IST

परीक्षेदरम्यान चालणाऱ्या कॉपीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी शिक्षण विभाग कॉपी मुक्त अभियान राबवित आहे.

काचेवानी : परीक्षेदरम्यान चालणाऱ्या कॉपीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी शिक्षण विभाग कॉपी मुक्त अभियान राबवित आहे. या अंतर्गत परीक्षा केंद्रांवर लावण्यात आलेला पोलिसांचा बंदोबस्त तसेच कॉपी न करता परीक्षा देण्याबाबत विद्यार्थी व पालकांत निर्माण झालेली जागृती यामुळेच कॉपीमुक्त वातावरणात बारावीची परीक्षा संपली. आता दहावीची परीक्षा अंतिमटप्यात आली आहे. परीक्षा म्हटली की विद्यार्थीच काय तर त्यांचे पालकही तणावात असतात. यातूनच कॉपीचे प्रकार घडतात. विद्यार्थी कॉपी तर करतात, मात्र कित्येक पालकही या कामात त्यांची साथ देतात. आपल्या पाल्याला कॉपी मिळावी यासाठी कित्येक पालक परीक्षा केंद्रावर सेटींग करीत किंवा बाहेरून कॉपी पोचविण्यासाठी केंद्राबाहेर बसून राहतात. विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालक , नातलग किंवा मित्रमंडळीत अधिक उत्साह दिसून येत होता. परिणामी परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविण्यासाठी एकच गर्दी दिसून येत होती. मात्र दोन दशकापूर्वीचे हे चित्र आता पालटले आहे. स्पर्धात्मक दृष्टिकोन, परीक्षेविषयक शासनाचे दिवसेंदिवस कडक धोरण, सुलभ शिक्षण प्रणाली, शासनाद्वारे पाठ्यक्रम पुस्तकांचा पुरवठा, विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे आणि शिक्षकांसह परीक्षेशी संबंधित संचालन मंडळावर लादलेल्या जबाबदाऱ्या, शिवाय परीक्षा केंद्राबाहेर लावण्यात येत असलेला पोलिसांचा चोख बंदोबस्त, अशी अनेक कारणे कॉपी मुक्त परीक्षा अभियानाच्या यशस्वितेसाठी पोषक ठरत आहेत. शिक्षण विभागाने परीक्षा सोप्या व सुलभ करण्याकरिता प्रात्यक्षिकांवर २० गुण दिले. प्रश्नपत्रिकेत सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला. विद्यार्थ्यांना आपण उत्तीर्ण होणारच अशी भावना निर्माण झाली असून त्यातूनच अभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. तर दहावी आणि बारावी परीक्षेत कॉपी करण्यात आली तर त्यापुढील अभ्यासक्रमात यश संपादन करता येणार नाही. अर्थात दहावी आणि बारावी परीक्षेत कॉपी करून भरपूर टक्केवारी मिळविली, त्याला काहीच अर्थ राहणार नाही, अशी समजूत विद्यार्थी व पालकांत येवू लागली. त्यामुळेच पालक पाल्यांना मेहनत करून मिळेल तेवढी टक्केवारी पटकाविण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. याच कारणामुळे आजघडीला कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पडल्याचे दिसून येते. बारावीच्या परीक्षा नुकत्यात संपल्या. मात्र या परीक्षेदरम्यानही परीक्षा केंद्राबाहेर पूर्वी राहत होती तशी गर्दी दिसून आली नाही. तर दहावीच्या परीक्षाही सुरळीतपणे सुरू आहे. काही प्रमाणात कॉपीचे प्रकार चालतात. त्यावर बाहेरून पोलिसांची लाठी तर आतमध्ये भरारी पथकाची कारवाई आळा घालतेच. मात्र परीक्षा केंद्राची पाहणी केल्यावर शांत व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)