शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

युवकांच्या श्रमदानाने सौंदर्यीकरणात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 22:27 IST

गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले.

ठळक मुद्देपर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न : गोरेगावच्या युवकांचा आदर्श

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले. दर रविवारी येथील नागरिक पवन तलाव येथे श्रमदान करतात. त्यामुळे दिवसेंदिवस या तलावाच्या सौंदर्यीकरणात भर पडत आहे.प्राप्त माहितीनुसार २ आॅक्टोबर पासून पवन तलाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एक महिन्याच्या कमी कालावधीत येथील नागरिकांना तलावाचा चेहरामोहराच बदलून टाकला. दर रविवारी आशीष बारेवार यांच्या संकल्पनेतून इथे स्वच्छता अभियान राबविण्यात येते. गावकरी हातात झाडू घेवून येथे साफसफाई करतात. त्यामुळे येथील पाण्याच्या शुध्दीकरणातही भर पडली आहे.गोरेगावात पवन तलाव हे मध्यभागी वसलेले आहे. बºयाच वर्षापासून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे तलाव समतल झाले असून पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात तलावात पाणी राहत नाही. तलावाची साफसफाई होत नसल्यामुळे येथील पाणी प्रदूषित झाले होते.या सर्व बाबीला आशिष यांनी हेरले व त्यांच्या कल्पनेतून पवन तलावाला जीवदान देण्यासाठी युवा शक्ती स्पोर्ट, विश्व गायत्री परिवार व गोरेगाव नगर पंचायत प्रशासनाने हातात झाडू घेत पवन तलावाला नंदनवन बनविण्याचा संकल्प केला. यासाठी नमन जैन, साकुरे गुरुजी, प्रणय वैद्य, विकास बारेवार, हिमांशु बारेवार, प्रविण बारेवार, यश कुंडजवार, दीपक रहांगडाले, अमोल भेंडारकर, संजय घासले व गावकरी यांनी पवन तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू केले. दर रविवारी येथे नागरिक स्वच्छतेसाठी पोहचू लागले. स्वच्छता अभियान राबवू लागले. तलावाचे पाणी साठवण क्षमता वाढावी, पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा, म्हणून इथे वृक्षारोपण करण्यात आले. झाडांना सुरक्षा देण्यासाठी जुन्या टायरचा वापर करण्यात आला. त्या टायरला रंगाने रंगविण्यात आले. टायरच्या मध्यभागी खड्डा खोदून झाडाचे रोपवन करण्यात आले. तर टायरचे कठडे तयार करुन जनावरांपासून त्या झाडाचे संरक्षण करण्यात आले.पवन तलावात विद्युत व नागरिकांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी येथे नागरिक येतात. या तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळेल अशी आशा गावकºयांना आहे. त्यासाठी इंजि. बारेवार परिश्रम घेत आहेत.