शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

युवकांच्या श्रमदानाने सौंदर्यीकरणात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 22:27 IST

गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले.

ठळक मुद्देपर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न : गोरेगावच्या युवकांचा आदर्श

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले. दर रविवारी येथील नागरिक पवन तलाव येथे श्रमदान करतात. त्यामुळे दिवसेंदिवस या तलावाच्या सौंदर्यीकरणात भर पडत आहे.प्राप्त माहितीनुसार २ आॅक्टोबर पासून पवन तलाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एक महिन्याच्या कमी कालावधीत येथील नागरिकांना तलावाचा चेहरामोहराच बदलून टाकला. दर रविवारी आशीष बारेवार यांच्या संकल्पनेतून इथे स्वच्छता अभियान राबविण्यात येते. गावकरी हातात झाडू घेवून येथे साफसफाई करतात. त्यामुळे येथील पाण्याच्या शुध्दीकरणातही भर पडली आहे.गोरेगावात पवन तलाव हे मध्यभागी वसलेले आहे. बºयाच वर्षापासून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे तलाव समतल झाले असून पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात तलावात पाणी राहत नाही. तलावाची साफसफाई होत नसल्यामुळे येथील पाणी प्रदूषित झाले होते.या सर्व बाबीला आशिष यांनी हेरले व त्यांच्या कल्पनेतून पवन तलावाला जीवदान देण्यासाठी युवा शक्ती स्पोर्ट, विश्व गायत्री परिवार व गोरेगाव नगर पंचायत प्रशासनाने हातात झाडू घेत पवन तलावाला नंदनवन बनविण्याचा संकल्प केला. यासाठी नमन जैन, साकुरे गुरुजी, प्रणय वैद्य, विकास बारेवार, हिमांशु बारेवार, प्रविण बारेवार, यश कुंडजवार, दीपक रहांगडाले, अमोल भेंडारकर, संजय घासले व गावकरी यांनी पवन तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू केले. दर रविवारी येथे नागरिक स्वच्छतेसाठी पोहचू लागले. स्वच्छता अभियान राबवू लागले. तलावाचे पाणी साठवण क्षमता वाढावी, पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा, म्हणून इथे वृक्षारोपण करण्यात आले. झाडांना सुरक्षा देण्यासाठी जुन्या टायरचा वापर करण्यात आला. त्या टायरला रंगाने रंगविण्यात आले. टायरच्या मध्यभागी खड्डा खोदून झाडाचे रोपवन करण्यात आले. तर टायरचे कठडे तयार करुन जनावरांपासून त्या झाडाचे संरक्षण करण्यात आले.पवन तलावात विद्युत व नागरिकांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी येथे नागरिक येतात. या तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळेल अशी आशा गावकºयांना आहे. त्यासाठी इंजि. बारेवार परिश्रम घेत आहेत.