शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

युवकांच्या श्रमदानाने सौंदर्यीकरणात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 22:27 IST

गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले.

ठळक मुद्देपर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न : गोरेगावच्या युवकांचा आदर्श

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले. दर रविवारी येथील नागरिक पवन तलाव येथे श्रमदान करतात. त्यामुळे दिवसेंदिवस या तलावाच्या सौंदर्यीकरणात भर पडत आहे.प्राप्त माहितीनुसार २ आॅक्टोबर पासून पवन तलाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एक महिन्याच्या कमी कालावधीत येथील नागरिकांना तलावाचा चेहरामोहराच बदलून टाकला. दर रविवारी आशीष बारेवार यांच्या संकल्पनेतून इथे स्वच्छता अभियान राबविण्यात येते. गावकरी हातात झाडू घेवून येथे साफसफाई करतात. त्यामुळे येथील पाण्याच्या शुध्दीकरणातही भर पडली आहे.गोरेगावात पवन तलाव हे मध्यभागी वसलेले आहे. बºयाच वर्षापासून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे तलाव समतल झाले असून पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात तलावात पाणी राहत नाही. तलावाची साफसफाई होत नसल्यामुळे येथील पाणी प्रदूषित झाले होते.या सर्व बाबीला आशिष यांनी हेरले व त्यांच्या कल्पनेतून पवन तलावाला जीवदान देण्यासाठी युवा शक्ती स्पोर्ट, विश्व गायत्री परिवार व गोरेगाव नगर पंचायत प्रशासनाने हातात झाडू घेत पवन तलावाला नंदनवन बनविण्याचा संकल्प केला. यासाठी नमन जैन, साकुरे गुरुजी, प्रणय वैद्य, विकास बारेवार, हिमांशु बारेवार, प्रविण बारेवार, यश कुंडजवार, दीपक रहांगडाले, अमोल भेंडारकर, संजय घासले व गावकरी यांनी पवन तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू केले. दर रविवारी येथे नागरिक स्वच्छतेसाठी पोहचू लागले. स्वच्छता अभियान राबवू लागले. तलावाचे पाणी साठवण क्षमता वाढावी, पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा, म्हणून इथे वृक्षारोपण करण्यात आले. झाडांना सुरक्षा देण्यासाठी जुन्या टायरचा वापर करण्यात आला. त्या टायरला रंगाने रंगविण्यात आले. टायरच्या मध्यभागी खड्डा खोदून झाडाचे रोपवन करण्यात आले. तर टायरचे कठडे तयार करुन जनावरांपासून त्या झाडाचे संरक्षण करण्यात आले.पवन तलावात विद्युत व नागरिकांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी येथे नागरिक येतात. या तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळेल अशी आशा गावकºयांना आहे. त्यासाठी इंजि. बारेवार परिश्रम घेत आहेत.