शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

शेतात पडल्या भेगा

By admin | Updated: October 15, 2014 23:20 IST

यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने खरीप पिकांना अगोदरच झळ बसली आहे. आता भातपीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत.

नवेझरी : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने खरीप पिकांना अगोदरच झळ बसली आहे. आता भातपीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भाताचे पीक सुकू लागले. परंतु चोरखमारा जलाशयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे कालव्याचे पाणी शेतासाठी मिळेनासे झाले. या प्रकाराने नवेझरी, मुरमाडी, खैरी, नवेगाव येथील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. गोंदिया जिल्ह्याची भाताचा व तलावाचा जिल्हा अशी ओळख आहे. यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला असून दोन महिने उशीरा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे भाताची रोवणी उशीरा का होईना कसीबसी शेतकऱ्यांनी आटोपली. महाग बियाणे, भरमसाठ वाढलेली मजुरी, गगणाला भिडलेले रासायनिक खताचे भाव याचा विचार न करता शेतकऱ्यांनी भात पिकाची रोवणी केली. अधामधात कमी-जास्त पाऊस आल्याने भातपिके डोलू लागले. आता काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या व धान पिकाचे लोंब्या निघण्याच्या वेळेवरच पीक सुकू लागले. चोरखमारा जलाशयाचे पाणी सोडण्याला आठ-दहा दिवस होऊन मुरमाडी व खैरी मायनरला पाहिजे तसा पाणी नसल्याने शेतकरी अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहेत. परंतु अधिकारी भेटत नाही आणि भेटलेच तर पाणी वाढवितो म्हणून सांगतात मोकळे होतात. पण मुरमाडी, खैरी मायनरला पाणी वाढतच नाही. पाण्यासाठी शेतकरी दिवस रात्र जागतात. पण पाणी मिळत नसल्यामुळे आल्या पिकावर शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जबाजारीच होईल. (वार्ताहर)