शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

शेतात पडल्या भेगा

By admin | Updated: October 15, 2014 23:20 IST

यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने खरीप पिकांना अगोदरच झळ बसली आहे. आता भातपीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत.

नवेझरी : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने खरीप पिकांना अगोदरच झळ बसली आहे. आता भातपीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भाताचे पीक सुकू लागले. परंतु चोरखमारा जलाशयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे कालव्याचे पाणी शेतासाठी मिळेनासे झाले. या प्रकाराने नवेझरी, मुरमाडी, खैरी, नवेगाव येथील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. गोंदिया जिल्ह्याची भाताचा व तलावाचा जिल्हा अशी ओळख आहे. यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला असून दोन महिने उशीरा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे भाताची रोवणी उशीरा का होईना कसीबसी शेतकऱ्यांनी आटोपली. महाग बियाणे, भरमसाठ वाढलेली मजुरी, गगणाला भिडलेले रासायनिक खताचे भाव याचा विचार न करता शेतकऱ्यांनी भात पिकाची रोवणी केली. अधामधात कमी-जास्त पाऊस आल्याने भातपिके डोलू लागले. आता काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या व धान पिकाचे लोंब्या निघण्याच्या वेळेवरच पीक सुकू लागले. चोरखमारा जलाशयाचे पाणी सोडण्याला आठ-दहा दिवस होऊन मुरमाडी व खैरी मायनरला पाहिजे तसा पाणी नसल्याने शेतकरी अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहेत. परंतु अधिकारी भेटत नाही आणि भेटलेच तर पाणी वाढवितो म्हणून सांगतात मोकळे होतात. पण मुरमाडी, खैरी मायनरला पाणी वाढतच नाही. पाण्यासाठी शेतकरी दिवस रात्र जागतात. पण पाणी मिळत नसल्यामुळे आल्या पिकावर शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जबाजारीच होईल. (वार्ताहर)