शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या किमतीमध्ये झाली भरमसाठ वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:29 IST

आमगाव : कोरोनाच्या प्रकोपामुळे व मागील वर्षीच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असतानाच आता खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी खतांचे ...

आमगाव : कोरोनाच्या प्रकोपामुळे व मागील वर्षीच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असतानाच आता खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी खतांचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन खतांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बी-बियाणे, खत, कीटकनाशके यांचा काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मागील लॉकडाऊनमध्ये बोगस बियांणामुळे बहुतांश भागात बियाणांची उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. यावर्षीही खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच कोरोनाकाळात खतांचा काळाबाजार झाल्यास शेतकरी पुरता हवालदिल होईल. त्यामुळे कृषी विभागाने अधिक दक्ष राहून काळाबाजार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. खतांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणेही आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यातच ट्रॅक्टर मालकांनी इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांना दुहेरी भुर्दंडाचा भार सोसावा लागणार आहे.

...............

खरिपाचा खर्च वाढणार

खरीप हंगामाच्या तोंडावर झालेली ही दरवाढ शेतकऱ्यांची कंबरडे मोडणारी आहे. डीएपी ह्या खताच्या ५० किलोच्या बॅगला पूर्वी १३००रुपये मोजावे लागत होते आता १९०० रुपये मोजावे लागणार आहेत. १०:२६:२० ह्या खताची किंमत ११७४ रुपयांवरून वाढून १७७५ रुपये झाली आहे. १२५० रुपयांना मिळणारे १२:३२:१६ हे खत आता शेतकऱ्यांना १८०० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे खरिपाच्या लागवड खर्चात यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.