शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

खतांच्या किमतीमध्ये झाली भरमसाठ वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:29 IST

आमगाव : कोरोनाच्या प्रकोपामुळे व मागील वर्षीच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असतानाच आता खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी खतांचे ...

आमगाव : कोरोनाच्या प्रकोपामुळे व मागील वर्षीच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असतानाच आता खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी खतांचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन खतांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बी-बियाणे, खत, कीटकनाशके यांचा काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मागील लॉकडाऊनमध्ये बोगस बियांणामुळे बहुतांश भागात बियाणांची उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. यावर्षीही खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच कोरोनाकाळात खतांचा काळाबाजार झाल्यास शेतकरी पुरता हवालदिल होईल. त्यामुळे कृषी विभागाने अधिक दक्ष राहून काळाबाजार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. खतांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणेही आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यातच ट्रॅक्टर मालकांनी इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांना दुहेरी भुर्दंडाचा भार सोसावा लागणार आहे.

...............

खरिपाचा खर्च वाढणार

खरीप हंगामाच्या तोंडावर झालेली ही दरवाढ शेतकऱ्यांची कंबरडे मोडणारी आहे. डीएपी ह्या खताच्या ५० किलोच्या बॅगला पूर्वी १३००रुपये मोजावे लागत होते आता १९०० रुपये मोजावे लागणार आहेत. १०:२६:२० ह्या खताची किंमत ११७४ रुपयांवरून वाढून १७७५ रुपये झाली आहे. १२५० रुपयांना मिळणारे १२:३२:१६ हे खत आता शेतकऱ्यांना १८०० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे खरिपाच्या लागवड खर्चात यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.