शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जंगलालगतच्या शेतांना जाळीचे कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

या योजनेतंर्गत मागील दोन वर्षांपासून काम सुरू आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील शेकडो गावात लोखंडी जाळी लावण्याचे काम करण्यात आले आहे. या योजनेशिवाय सेंट्रल इंडिया टायगर कंजरवेशन प्रकल्पातंर्गत स्वंयसेवी संस्था सुध्दा जंगलाच्या सीमेलगत असलेल्या गावांच्या सीमेवर लोखंडी जाळी लावण्याचे काम करीत आहे.

ठळक मुद्दे५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद : ७० गावात लावली जाळी, स्वंयसेवी संस्थाचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहे. तर दुसरीकडे जंगलालगत असलेल्या गावांमध्ये मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष वाढत आहे.जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे हे नुकसान टाळून मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी जंगल आणि शेतालगत जाळीचे कुंपन तयार करण्याचे काम सुरू केले आहे. जिल्ह्यातील ७० गावात काम पूर्ण झाले असून पुन्हा काही गावांची निवड करण्यात आली आहे.डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत प्रायोगिक तत्त्वावर जंगला लगत असलेल्या संवेदनशिल गावांच्या सीमेवर लोखंडी जाळी लावण्यासाठी शासनाने २८ ऑगस्टला २०१९ ला ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या योजनेतंर्गत मागील दोन वर्षांपासून काम सुरू आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील शेकडो गावात लोखंडी जाळी लावण्याचे काम करण्यात आले आहे. या योजनेशिवाय सेंट्रल इंडिया टायगर कंजरवेशन प्रकल्पातंर्गत स्वंयसेवी संस्था सुध्दा जंगलाच्या सीमेलगत असलेल्या गावांच्या सीमेवर लोखंडी जाळी लावण्याचे काम करीत आहे. वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडिया या स्वंयसेवी संस्थेने आत्तापर्यंत जिल्ह्यातील ६८ गावात लोखंडी जाळी लावण्याचे काम पूर्ण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत झाली.यासंदर्भात वन्यजीव विभागाचे अधिकारी एस.डब्ल्यू.सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या ग्रामपंचायतीकडून लोखंडी जाळी लावण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन पाठविले जातात त्याच गावांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लोखंडी जाळी उपलब्ध करुन दिली जाते. सध्या यासंदर्भात गावांकडून प्रस्ताव मागविले जात असल्याचे सांगितले.मुरपारटोली,लेंडेझरी येथील शेतकºयांनी केले श्रमदानसडक अर्जुनी तालुक्यातील मुरपारटोली आणि लेंडेझरी येथील शेतकरी ऊसाची लागवड करतात.मात्र वन्यप्राण्यांकडून ऊसाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ते त्रस्त झाले होते. वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाचे व्यवस्थापक अनिल कुमार यांनी वन्यप्राण्यामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी जाळी लावण्याचा प्रस्ताव ठेवला.त्यानंतर शेतकरी यासाठी तयार झाले. मुरपारटोली येथे २९.१७ हेक्टर आणि लेंडेझरी येथे ७१ हेक्टरवर लोखंडी जाळी लावण्यात आली.मुरपारटोली येथील २१ आणि लेंडेझरी येथील २७ शेतकºयांनी १५ टक्के प्रमाणे खर्च केला.तर वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाने या दोन्ही गावांसाठी ८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च केला. जाळी लावण्यासाठी खड्डे तयार करण्याचे काम शेतकºयांनी श्रमदान करुन केले.अधिक क्षमतेची बॅटरी लावाडॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत जंगलाच्या सीमेलगत असलेल्या भागात पिकांचे संरक्षण करण्यासाठी लोखंडी जाळी लावून दिली जात आहे. यास अधिक क्षमतेची बॅटरी सुध्दा लावून दिली जात आहे. मात्र ती कमी क्षमतेची असल्याचे बोलल्या जाते.वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाकडून अधिक क्षमतेच्या बॅटºया लावून देण्यात आल्या आहे. यासाठी प्रती शेतकरी १६ ते १७ हजार रुपयांचा खर्च येतो. लोखंडी जाळीमध्ये सौम्य स्वरुपाचा विद्युत प्रवाह राहत असल्याने वन्यप्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यास मदत होते.

टॅग्स :agricultureशेती