शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भरकटणाऱ्या पावलांना ‘मैत्री’ने सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:24 IST

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अर्श कार्यक्रमांतर्गत सुरू ‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून संकुचित प्रवृत्तीच्या पौगंडावस्थेतील मुला-मुलींना मोकळपणे व्यक्त होण्यास शिकविले जात आहे. बालकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांना वेळेवर शास्त्रीय पद्धतीने समाधान होणे गरजेचे असते. दररोज अनके पाल्यांचे आई-वडील पाल्यांचा समस्या घेऊन जिल्हा रूग्णालयातील ‘मैत्री’ संवाद केंद्रात पोहचून ...

ठळक मुद्देनऊ महिन्यातील मार्गदर्शन : संवाद केंद्र ठरत आहे उपयोगी

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अर्श कार्यक्रमांतर्गत सुरू ‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून संकुचित प्रवृत्तीच्या पौगंडावस्थेतील मुला-मुलींना मोकळपणे व्यक्त होण्यास शिकविले जात आहे. बालकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांना वेळेवर शास्त्रीय पद्धतीने समाधान होणे गरजेचे असते. दररोज अनके पाल्यांचे आई-वडील पाल्यांचा समस्या घेऊन जिल्हा रूग्णालयातील ‘मैत्री’ संवाद केंद्रात पोहचून मार्गदर्शन घेत आहेत. ‘मैत्री’ संवाद केंद्रातून मागील नऊ महिन्यात ३ हजार ६२३ मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.शारीरिक बदल होतांना अनेक समस्या येतात. शिक्षक व पालक त्यांच्या विचीत्र वागण्याची तक्रार करीत असतात. परंतु त्या वागण्यात मुला-मुलीची चूक नाही. वाढत्या वयासह शरीरात बदल होत असतात. या बदलाला स्वीकारताना अनेक समस्या येतात. अशा मुला-मुलींना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ते बरेचदा ते चुकीच्या मार्गावर जात असतात. ‘मैत्री’ द्वारे १० ते १९ वर्षातील मुला-मुलींना मार्गदर्शन केले जाते. जिल्हा सामान्य रूग्णालयातील ‘मैत्री’संवाद केंद्रात दररोज सुरू असतो. याशिवाय बाई गंगाबाई महिला रूग्णालयात गुरुवार, तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात बुधवार व देवरीच्या ग्रामीण अस्पतालयात शुक्रवारला आठवड्यातून एक दिवस सेवा दिली जाते. ‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून मुला-मुलींच्या शारीरिक, मानसिक व लैंगिक आरोग्यासंदर्भात माहिती दिली जाते.मोफत हिमोग्लोबीन, रक्त व सिकलसेल तपासणी केली जाते. विवाह पूर्वी मार्गदर्शन, आहार विषयक मार्गदर्शन व रक्ताची कमतरता उपचार केला जात आहे.मासिक पाळीतील आजारासंबंधी माहिती दिली जाते. प्रजनन व लैंगिक आजारसंबधी प्रतिबंधक आरोग्य शिक्षण व उपाय योजना केली जाते. ही सर्व माहिती गुप्त ठेवली जाते. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या ‘मैत्री’ केंद्रात सन २०१७ मध्ये एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत ३ हजार ६२३ मुला-मुलींना मार्गदर्शन केले जाते. एकट्या डिसेंबर महिन्यात ४०० मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.मोबाईल ठरत आहेत घातकअँड्रॉईड मोबाईलचा सर्वाधिक परिणाम तरुण आणि अल्पवयीन मुलांवर होत आहे. किशोरवयीन मुले- मुली अँड्रॉईड मोबाईल, इंटरनेटचा सर्रास वापर करतात, टी. व्ही. चॅनलवर त्यांनी जे पाहू नये ते पाहतात. त्याचेच अनुकरण करुन अश्लील कृत्य करतात. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. शाळांमध्ये अनेक कृत्य झाल्याचे उदाहरणे पुढे आली आहेत. बालके प्रौढ व्यक्तीसारखा व्यवहार करतात. या स्थितीमुळेलैंगिक शोषणाच्या प्रकरणात वाढ झाली आहे. पौगंडावस्थेतील बालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘मैत्री’ संवाद केंद्राकडून आश्रमशाळा, झोपडपट्टी परिसर, शाळेत मार्गदर्शन केले जाते. बालकांच्या समस्यांना घेऊन काही पालक व शिक्षक ‘संवाद केंद्रात येतात. परंतु मोकळेपणाने बोलत नाहीत. अश्यावेळी बालकांशी एकट्यात संवाद साधला जातो. काही मुले-मुली आपल्या समस्या कागदावर लिहून देतात.आकर्षणाची दोन कारणेतज्ञांच्या मते, भिन्न लिंगी व्यक्तीसंदर्भात १५ ते १७ वर्ष वयोगटात आकर्षण तयार होते. त्याला ते प्रेमाचे नाव देतात. काही मुले-मुलींमध्ये भावनात्मक संबधाची तीव्र इच्छा व्यक्त केली जाते. हे आकर्षण दोन प्रकारचे आहेत. पहिले आकर्षण शारीरिक रूपात असते. त्यात पोषाख, सौंदर्य याचे महत्व असते. तर दुसºयात मानसिक विचार, सवलत, सामाजिक दृष्टिकोणाचे महत्व असते. परंतु आता हे आकर्षण होण्याचे वय कमी होताना दिसत आहे. यामुळे बालगुन्हेगारी वाढत आहे.