शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भरकटणाऱ्या पावलांना ‘मैत्री’ने सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:24 IST

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अर्श कार्यक्रमांतर्गत सुरू ‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून संकुचित प्रवृत्तीच्या पौगंडावस्थेतील मुला-मुलींना मोकळपणे व्यक्त होण्यास शिकविले जात आहे. बालकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांना वेळेवर शास्त्रीय पद्धतीने समाधान होणे गरजेचे असते. दररोज अनके पाल्यांचे आई-वडील पाल्यांचा समस्या घेऊन जिल्हा रूग्णालयातील ‘मैत्री’ संवाद केंद्रात पोहचून ...

ठळक मुद्देनऊ महिन्यातील मार्गदर्शन : संवाद केंद्र ठरत आहे उपयोगी

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अर्श कार्यक्रमांतर्गत सुरू ‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून संकुचित प्रवृत्तीच्या पौगंडावस्थेतील मुला-मुलींना मोकळपणे व्यक्त होण्यास शिकविले जात आहे. बालकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांना वेळेवर शास्त्रीय पद्धतीने समाधान होणे गरजेचे असते. दररोज अनके पाल्यांचे आई-वडील पाल्यांचा समस्या घेऊन जिल्हा रूग्णालयातील ‘मैत्री’ संवाद केंद्रात पोहचून मार्गदर्शन घेत आहेत. ‘मैत्री’ संवाद केंद्रातून मागील नऊ महिन्यात ३ हजार ६२३ मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.शारीरिक बदल होतांना अनेक समस्या येतात. शिक्षक व पालक त्यांच्या विचीत्र वागण्याची तक्रार करीत असतात. परंतु त्या वागण्यात मुला-मुलीची चूक नाही. वाढत्या वयासह शरीरात बदल होत असतात. या बदलाला स्वीकारताना अनेक समस्या येतात. अशा मुला-मुलींना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ते बरेचदा ते चुकीच्या मार्गावर जात असतात. ‘मैत्री’ द्वारे १० ते १९ वर्षातील मुला-मुलींना मार्गदर्शन केले जाते. जिल्हा सामान्य रूग्णालयातील ‘मैत्री’संवाद केंद्रात दररोज सुरू असतो. याशिवाय बाई गंगाबाई महिला रूग्णालयात गुरुवार, तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात बुधवार व देवरीच्या ग्रामीण अस्पतालयात शुक्रवारला आठवड्यातून एक दिवस सेवा दिली जाते. ‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून मुला-मुलींच्या शारीरिक, मानसिक व लैंगिक आरोग्यासंदर्भात माहिती दिली जाते.मोफत हिमोग्लोबीन, रक्त व सिकलसेल तपासणी केली जाते. विवाह पूर्वी मार्गदर्शन, आहार विषयक मार्गदर्शन व रक्ताची कमतरता उपचार केला जात आहे.मासिक पाळीतील आजारासंबंधी माहिती दिली जाते. प्रजनन व लैंगिक आजारसंबधी प्रतिबंधक आरोग्य शिक्षण व उपाय योजना केली जाते. ही सर्व माहिती गुप्त ठेवली जाते. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या ‘मैत्री’ केंद्रात सन २०१७ मध्ये एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत ३ हजार ६२३ मुला-मुलींना मार्गदर्शन केले जाते. एकट्या डिसेंबर महिन्यात ४०० मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.मोबाईल ठरत आहेत घातकअँड्रॉईड मोबाईलचा सर्वाधिक परिणाम तरुण आणि अल्पवयीन मुलांवर होत आहे. किशोरवयीन मुले- मुली अँड्रॉईड मोबाईल, इंटरनेटचा सर्रास वापर करतात, टी. व्ही. चॅनलवर त्यांनी जे पाहू नये ते पाहतात. त्याचेच अनुकरण करुन अश्लील कृत्य करतात. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. शाळांमध्ये अनेक कृत्य झाल्याचे उदाहरणे पुढे आली आहेत. बालके प्रौढ व्यक्तीसारखा व्यवहार करतात. या स्थितीमुळेलैंगिक शोषणाच्या प्रकरणात वाढ झाली आहे. पौगंडावस्थेतील बालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘मैत्री’ संवाद केंद्राकडून आश्रमशाळा, झोपडपट्टी परिसर, शाळेत मार्गदर्शन केले जाते. बालकांच्या समस्यांना घेऊन काही पालक व शिक्षक ‘संवाद केंद्रात येतात. परंतु मोकळेपणाने बोलत नाहीत. अश्यावेळी बालकांशी एकट्यात संवाद साधला जातो. काही मुले-मुली आपल्या समस्या कागदावर लिहून देतात.आकर्षणाची दोन कारणेतज्ञांच्या मते, भिन्न लिंगी व्यक्तीसंदर्भात १५ ते १७ वर्ष वयोगटात आकर्षण तयार होते. त्याला ते प्रेमाचे नाव देतात. काही मुले-मुलींमध्ये भावनात्मक संबधाची तीव्र इच्छा व्यक्त केली जाते. हे आकर्षण दोन प्रकारचे आहेत. पहिले आकर्षण शारीरिक रूपात असते. त्यात पोषाख, सौंदर्य याचे महत्व असते. तर दुसºयात मानसिक विचार, सवलत, सामाजिक दृष्टिकोणाचे महत्व असते. परंतु आता हे आकर्षण होण्याचे वय कमी होताना दिसत आहे. यामुळे बालगुन्हेगारी वाढत आहे.