शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

तिसऱ्या लाटेच्या भीतीने लग्न सोहळ्यांचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशात ठरवून असलेले विवाह ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशात ठरवून असलेले विवाह सोहळे आता त्यापूर्वी आटोपून घेण्यासाठी वर-वधू पित्यांची धावपळ सुरू झाली आहे; मात्र शासनाने विवाह सोहळ्यांसाठी परवानगी बंधनकारक केली आहे. त्यामुळे लग्नाची कामे सोडून वर-वधू पित्यांना परवानगीसाठी शासकीय कार्यालयाची ये-जा करावी लागत आहे. शिवाय, ५० वऱ्हाडींच्या अटींचे पालन करणे गरजेचे असताना याला तिलांजली देत विवाह सोहळे त्याच थाटामाटात आटोपले जात आहेत; मात्र तिसऱ्या लाटेच्या भीतीने विवाह सोहळ्यांचा एकच धडाका दिसून येत आहे.

------------------------------

या असतील अटी...

आजघडीला विवाह सोहळा आटोपण्यासाठी सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच विवाह करता येणार आहे. तसेच दोन्ही पक्षाकडील ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. याशिवाय ज्या सभागृहात-लॉनमध्ये विवाह सोहळा आटोपला जाणार आहे त्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

-----------------------

परवानगीसाठी धावपळ

विवाह सोहळा आटोपण्यासाठी कित्येकांची तयारी आहे मात्र परवानगीसाठी धावपळ करावी लागत आहे. परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय अथवा तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा लागत आहे. अर्जासोबत वधू-वराचे आधारकार्ड, त्यांचे फोटो, लग्नाची पत्रिका, ज्या सभागृहात विवाह होणार आहे त्याचे परवानगी पत्र द्यावे लागते. तसेच याच अर्जाची एक प्रत पोलीस ठाण्यात द्यावी लागते. विशेष म्हणजे, सभागृहाचे सॅनिटायजेशन व मास्कचा वापर अनिवार्य असून या गोष्टींची काळजी वधू पक्षाला घ्यावी लागते.

------------------------------

घरी असलेल्या विवाह सोहळ्यासाठी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. २ दिवसांत परवानगी मिळाली व ते पत्र सभागृहाला दिले. त्यानंतर शारीरिक अंतराचे पालन, मास्कचा वापर व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नियमांचे पूर्णपणे पालन करून विवाह सोहळा आटोपला.

- सुनील धवने, गोंदिया

--------------------------

माझ्या मुलाचा विवाह सोहळा होता व त्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून सर्व प्रक्रिया केली. परवानगी घेऊन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे, मास्कचा वापर व शारीरिक अंतराचे पालन करणे आपल्या सुरक्षेसाठी गरजेचे आहे व ते प्रत्येकाने करावे.

- विजय बिलोना, गोंदिया

--------------------------

शुभमुहूर्त

आज समाज कितीही मॉडर्न झाला असला तरीही प्रत्येकच धर्म व जातीत विवाह सोहळ्यात पारंपरिक काही नियमांचे पालन केले जातेच. यात विवाह सोहळ्यांसाठी शुभमुहूर्त बघितलाच जातो. हिंदू धर्मात पंडितांकडून शुभदिवस व वेळ बघूनच विवाह ठरविले जातात. यंदा जुलै महिन्यात ७, ८, १२, १३, १४ व १५ या तारखा विवाहासाठी शुभ असल्याचे पंडित गोविंद शर्मा यांनी सांगितले. जोडप्याच्या भावी सुखी संसारासाठी आजही प्रत्येकच घरात विवाहाचा शुभमुहूर्त बघितला जातोच.