शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेच्या भीतीने लग्न सोहळ्यांचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशात ठरवून असलेले विवाह ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशात ठरवून असलेले विवाह सोहळे आता त्यापूर्वी आटोपून घेण्यासाठी वर-वधू पित्यांची धावपळ सुरू झाली आहे; मात्र शासनाने विवाह सोहळ्यांसाठी परवानगी बंधनकारक केली आहे. त्यामुळे लग्नाची कामे सोडून वर-वधू पित्यांना परवानगीसाठी शासकीय कार्यालयाची ये-जा करावी लागत आहे. शिवाय, ५० वऱ्हाडींच्या अटींचे पालन करणे गरजेचे असताना याला तिलांजली देत विवाह सोहळे त्याच थाटामाटात आटोपले जात आहेत; मात्र तिसऱ्या लाटेच्या भीतीने विवाह सोहळ्यांचा एकच धडाका दिसून येत आहे.

------------------------------

या असतील अटी...

आजघडीला विवाह सोहळा आटोपण्यासाठी सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच विवाह करता येणार आहे. तसेच दोन्ही पक्षाकडील ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. याशिवाय ज्या सभागृहात-लॉनमध्ये विवाह सोहळा आटोपला जाणार आहे त्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

-----------------------

परवानगीसाठी धावपळ

विवाह सोहळा आटोपण्यासाठी कित्येकांची तयारी आहे मात्र परवानगीसाठी धावपळ करावी लागत आहे. परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय अथवा तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा लागत आहे. अर्जासोबत वधू-वराचे आधारकार्ड, त्यांचे फोटो, लग्नाची पत्रिका, ज्या सभागृहात विवाह होणार आहे त्याचे परवानगी पत्र द्यावे लागते. तसेच याच अर्जाची एक प्रत पोलीस ठाण्यात द्यावी लागते. विशेष म्हणजे, सभागृहाचे सॅनिटायजेशन व मास्कचा वापर अनिवार्य असून या गोष्टींची काळजी वधू पक्षाला घ्यावी लागते.

------------------------------

घरी असलेल्या विवाह सोहळ्यासाठी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. २ दिवसांत परवानगी मिळाली व ते पत्र सभागृहाला दिले. त्यानंतर शारीरिक अंतराचे पालन, मास्कचा वापर व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नियमांचे पूर्णपणे पालन करून विवाह सोहळा आटोपला.

- सुनील धवने, गोंदिया

--------------------------

माझ्या मुलाचा विवाह सोहळा होता व त्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून सर्व प्रक्रिया केली. परवानगी घेऊन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे, मास्कचा वापर व शारीरिक अंतराचे पालन करणे आपल्या सुरक्षेसाठी गरजेचे आहे व ते प्रत्येकाने करावे.

- विजय बिलोना, गोंदिया

--------------------------

शुभमुहूर्त

आज समाज कितीही मॉडर्न झाला असला तरीही प्रत्येकच धर्म व जातीत विवाह सोहळ्यात पारंपरिक काही नियमांचे पालन केले जातेच. यात विवाह सोहळ्यांसाठी शुभमुहूर्त बघितलाच जातो. हिंदू धर्मात पंडितांकडून शुभदिवस व वेळ बघूनच विवाह ठरविले जातात. यंदा जुलै महिन्यात ७, ८, १२, १३, १४ व १५ या तारखा विवाहासाठी शुभ असल्याचे पंडित गोविंद शर्मा यांनी सांगितले. जोडप्याच्या भावी सुखी संसारासाठी आजही प्रत्येकच घरात विवाहाचा शुभमुहूर्त बघितला जातोच.