शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

चोरांची भीती अन् पालकमंत्र्यांची रात्रगस्त

By admin | Updated: June 3, 2017 00:11 IST

मंत्री म्हटले की, कुठल्यातरी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला, भूमिपूजनाला येणारे महत्त्वाचे व्यक्ती.

ग्रामस्थांना दिलासा : गस्तीसाठी पोलीस विभागाने केले युवकांना तयार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मंत्री म्हटले की, कुठल्यातरी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला, भूमिपूजनाला येणारे महत्त्वाचे व्यक्ती. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राजकुमार बडोले यांनी चोरांच्या भीतीने भयभीत असलेल्या सडक-अर्जुनी तालुक्यातील पिपरी, मनेरी, कोहमारा, कोदामेडी व कन्हेरी-राम या गावातील ग्रामस्थांना रात्री ११.३० वाजता पोलिसांसोबत रात्रीची गस्त घालून दिलासा दिला. सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे व त्यांच्याशी सहज संवाद साधता येईल असे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेले राजकुमार बडोले यांनी स्वत: रात्री गावागावात भेटी दिल्या आहेत. जिल्ह्यातील विविध लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा व जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी त्यांची प्रामाणिक धडपड. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक सुरक्षित असला पाहिजे व चोरांच्या भीतीमुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांना रात्रगस्तीच्या भेटीतून दिलासा देण्याचे कामही त्यांनी नुकतेच केले. सडक-अर्जुनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोर येण्याच्या अफवेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. अशा गावात पोलीस विभागाने सभा घेवून गावातील १० ते १५ युवकांना रात्रगस्तीसाठी तयार करु न त्यांना शिट्ट्या दिल्या. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांना रात्रीला सुखाने झोपता येईल, यासाठी ही उपाययोजना केली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी या गावांना भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधला. चोरांची ही केवळ अफवा असून घाबरु न जावू नका, असे त्यांनी सांगितले. गावात कोणतीही अनोळखी व्यक्ती आल्यास त्याला मारहाण न करता व कायदा व सुव्यवस्था हातात न घेता त्याची विचारपूस करु न पोलिसांच्या सुपूर्द करावे. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला मारहाण करु न त्याच्या जीवाशी खेळू नये, असे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले. पालकमंत्र्यांनी रात्रगस्त घालून ग्रामस्थांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्या समवेत पं.स. सभापती कविता रंगारी, पं.स. सदस्य राजेश कठाणे, डुग्गीपारचे ठाणेदार केशव वाभळे उपस्थित होते.