शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

पटोलेंच्या आश्वासनानंतर सोडले उपोषण

By admin | Updated: December 6, 2015 01:47 IST

महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेच्या वतीने नवेगाव अभयारण्य राष्ट्रीय उद्यान (पार्क) येथील वनमजुरांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.

नऊ वनमजूर होते उपोषणावर : ३२ रोजंदारी मजुरांवर आर्थिक संकटगोंदिया : महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेच्या वतीने नवेगाव अभयारण्य राष्ट्रीय उद्यान (पार्क) येथील वनमजुरांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू होते. खा. नाना पटोले यांच्या पुढाकाराने वनमजुरांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष संपत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात ९ वनमजूर नवेगाव अभयारण्यातील वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसले होते. नवेगावबांध राष्ट्रीय अभयारण्य व उद्यानात सन २००० पासून ३२ रोजंदारी वनमजूर काम करीत आहेत. १२ वर्ष सेवा दिल्यावर २०१३ मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आल्यावर या वनमजुरांना काम मिळानासे झाले. त्यामुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला. गेल्या तीन वर्षात वनविभागाने त्यांच्या रोजगाराचा विचार केला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची पाळी आली होती. संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सदर वनमजुरांना पूर्ववत काम करण्याची मागणी करीत होते. तसेच अधिकारांशी चर्चा करून वनमजुरांना कोटेशन पद्धतीने कामावर घेण्याची मागणी केली. परंतु, अधिकाऱ्यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. वारंवार मागणी करूनही अधिकारी वनमजुरांच्या प्रश्न व समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने व आपल्याला पूर्ववत कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी वनविभाग कार्यालयासमोर ३२ रोजंदारी वनमजुर आमरण उपोषणावर बसणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी वनमजुरांच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्याने ९ मजूर वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर उपोषणाला बसले. खा. नाना पटोले यांनी संबधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून वनमजुरांच्या मागण्यांसदर्भात चर्चा करून वनमजुरांच्या सर्व मागण्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. सोबतच वनकर्मचारी व वनमजुरांच्या संघटनेची बैठक हिवाळी अधिवेशनात घडवून आणून इतर समस्यांही सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खा. पटोलेंच्या आश्वासनानंतर संघटनेचे अध्यक्ष व वनमजुरांनी आपले उपोषण मागे घेतले. खा. पटोले यांनी उपोषणावर असलेल्या वनमजुरांना निंबू पाणी पाजून उपोषण सोडविले. यावेळी प्रामुख्याने वनविभागाचे विभागीय वनाधिकारी कातोरे, उपविभागीय वनअधिकारी गुप्ता, वनपरिक्षेत्राधिकारी दोनोडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)