शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीची कामे जोरात सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

केशोरी : रब्बी धान पिकाचा हंगाम आटोपताच पावसाळा काही दिवसांच्या अंतरावर येवून ठेपला आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी मशागतीच्या कामाला ...

केशोरी : रब्बी धान पिकाचा हंगाम आटोपताच पावसाळा काही दिवसांच्या अंतरावर येवून ठेपला आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी मशागतीच्या कामाला लागला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खतांच्या वाढलेल्या किंमती लक्षात घेता कोंबड्यांचे चिचडी खत शेतीत टाकण्याचा विचार करताना शेतकरी दिसून येत आहेत.

गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर ही चारही जिल्हे भात शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. उन्हाळी धान पीकांचा हंगाम आटोपताच शेतीत शेणखत टाकणे, बांध्या सपाट करणे, कचरा पेटविणे, नांगरणी, वखारणी आणि धुरे निटनेटके करण्याच्या कामात शेतकरी दिसून येत आहे. यावर्षी खताच्या किंमतीत भरमसाट झालेली वाढ लक्षात घेता शेतकरी शेणखताकडे वळण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. परंतु जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे शेणखत पाहिजे त्या प्रमाणात मिळणे कठिण आहे. ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची कामे करीत असल्याने बैलजोड्या कमी झाल्या आहेत.

परिणामी शेणखत मिळणे कठिण झाले आहे. नाईलाजास्तव रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. काही शेतकऱ्यांकडे शेणखत उपलब्ध असून त्यांचे शेखणत टाकणे सुरु आहे. यावर्षी कोरोना महामारीने मागील वर्षापेक्षा शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळली असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे घेण्यासााठी पैशांची जुळवाजुळव करणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात मंजूर बोनसची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. किमान कृषी विभागाने धानाचे बी-बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. अशात आता रासायनिक खतांऐवजी कोंबड्याच्या चिचडी खताकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.