शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

कापसाच्या अत्यल्प दरामुळे शेतकरी चिंतेत

By admin | Updated: November 17, 2014 22:58 IST

निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने कापसाला सात हजार रुपये दर देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली होती. मात्र आता जुन्या कापसाला ३,५०० तर नवीन

वाढोणा : निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने कापसाला सात हजार रुपये दर देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली होती. मात्र आता जुन्या कापसाला ३,५०० तर नवीन कापसाला ३,८०० रुपये भाव देण्यात येत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या काळात तरी शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.या वर्षी पाऊसच वेळेवर न आल्यामुळे तब्बल दीड महिना उशिरा कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा घरात अद्यापही कापूस आला नाही. त्यातच पावसाचा अनियमितपणा सुरू असून कपाशीचे पीक भरघोस होण्याची शेतकऱ्यांना कुठलीच आशा नाही. मुगाचे पीक पूर्णत: हातचे गेले. कपाशीचे पीक पाहिजे तसे नाही. त्यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. त्याचत जुन्या कापसाला केवळ ३५०० व नवीन कापसाला ३८०० रुपये क्विंटलचा भाव असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना व भाजपा युतीने कापसला ७ हजार रुपये भाव देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना भरघोस मतदान करून निवडून दिले मात्र हा भाव आता मिळणार की केवळ घोषणाच राहणार, असा चिंतेचा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.(वार्ताहर)