शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

२६ हजारांवर शेतकरी कर्जमाफीस मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:31 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ७६ हजार ७७० शेतकरी पात्र ठरले. चावडी वाचन आणि अर्जांच्या पडताळणीनंतर यापैकी केवळ ५० हजार ७७० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे७६ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र : किचकट प्रक्रियेचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ७६ हजार ७७० शेतकरी पात्र ठरले. चावडी वाचन आणि अर्जांच्या पडताळणीनंतर यापैकी केवळ ५० हजार ७७० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे २६ हजारावर शेतकरी कर्जमाफीस मुकण्याची शक्यता आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आहे. जिल्ह्यात एकूण अडीच लाख शेतकरी असून यापैकी ७६ हजार ७७० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले होते. या शेतकºयांकडे एकूण २६५ कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक आहे. कर्जमाफी योजनेतंर्गत हे कर्जमाफ केले जाणार आहे. यासाठी शासनाने काही अटी व शर्ती लागू केल्या आहेत. जे शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले त्यांच्याकडून शासनाने आॅनलाईन अर्ज मागविले होते. या अर्जांची पडताळणी चावडी वाचन करुन केली जाणार आहे. पडताळणीपैकी एकूण अर्जांपैकी २६ हजारावर अर्ज रद्द होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तविली जात आहे. बºयाच अर्जामध्ये त्रृट्या आहेत, तर काही शेतकरी शासनाने लागू केलेल्या अटी शर्तीमुळे अपात्र ठरण्याची शक्यता आहे. एकंदरीत जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एकूण ७६ हजार ७७० शेतकºयांपैकी अखेर ५० हजार ७७० शेतकºयांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याला जिल्हा प्रशासनाने देखील दुजोरा दिला आहे.अधिकारी कर्मचाºयांची सावध भूमिकाकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी चावडी वाचन घेऊन केली जात आहे. यामुळे बºयाच नावावर आक्षेप घेतले जात आहे. परिणामी ते अर्ज रद्द करण्याची वेळ कर्मचाºयांवर येत आहे. त्यामुळे शेतकºयांचा रोष ओढवून घेण्याची वेळ अधिकारी व कर्मचाºयांवर येत असल्याने काही कर्मचारी चावडी वाचन कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार देत असल्याची माहिती आहे.डिसेंबरपूर्वी कर्जमाफी अशक्यचजिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातली आहे. त्यामुळे आचार संहिता लागू असून त्या गावांमध्ये चावडी वाचन कार्यक्रम घेता येत नाही. त्यामुळे चावडी वाचनाचा कार्यक्रम महिनाभर लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. परिणामी कर्जमाफीची पुढील प्रक्रिया लांबणार असल्याने डिसेंबरपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे.पीक कर्ज वाटपाचे टार्गेट वाढणारकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना पुढीेल खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बँकाचे पीक कर्ज वाटपाचे टार्गेट २५० कोटी रुपयांनी वाढणार आहे.