शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

शेतकऱ्यांना सातबारा प्रत घरपोच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:34 IST

केशोरी : भारत हा कृषी प्रधान देश असून, देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये शेती क्षेत्राचा फार मोठा वाटा राहिलेला ...

केशोरी : भारत हा कृषी प्रधान देश असून, देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये शेती क्षेत्राचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वराज्य संकल्पनेनुसार शेती ही सर्व विकासाची आधारशिला आहे. त्यामुळे येणाऱ्या गांधी जयंती २ ऑक्टोबरपासून प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा उताऱ्याची प्रत गावातील तलाठ्यामार्फत देण्याचा उपक्रम शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत राबविण्यात येणार असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा उताऱ्याची अद्ययावत प्रत शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मोफत वितरण करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये शेती क्षेत्राचा मोठा वाटा राहिला आहे. तसेच महात्मा गांधी यांच्या स्वराज्य संकल्पनेतून म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्य यामध्ये शेती ही सर्व विकासाची आधारशिला होती. या संदर्भाधीन शासन निर्णयान्वये महसूल लेखांकन पद्धतीविषयक ७/१२ अधिकार अभिलेख पत्रक अद्ययावत करण्यात आले आहे. चालू वर्ष २०२१-२२ हे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून डिजिटल भूमिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ई-महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या सातबारा उताऱ्याची प्रत गावातील तलाठ्यामार्फत प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन मोफत वितरण करण्याचा उपक्रम राबविण्याची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. ही योजना महात्मा गांधी जयंतीपासून राबविण्यात येणार असून, याचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार आहे हे निश्चित.