शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

शेतकऱ्यांना सातबारा प्रत घरपोच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:34 IST

केशोरी : भारत हा कृषी प्रधान देश असून, देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये शेती क्षेत्राचा फार मोठा वाटा राहिलेला ...

केशोरी : भारत हा कृषी प्रधान देश असून, देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये शेती क्षेत्राचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वराज्य संकल्पनेनुसार शेती ही सर्व विकासाची आधारशिला आहे. त्यामुळे येणाऱ्या गांधी जयंती २ ऑक्टोबरपासून प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा उताऱ्याची प्रत गावातील तलाठ्यामार्फत देण्याचा उपक्रम शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत राबविण्यात येणार असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा उताऱ्याची अद्ययावत प्रत शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मोफत वितरण करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये शेती क्षेत्राचा मोठा वाटा राहिला आहे. तसेच महात्मा गांधी यांच्या स्वराज्य संकल्पनेतून म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्य यामध्ये शेती ही सर्व विकासाची आधारशिला होती. या संदर्भाधीन शासन निर्णयान्वये महसूल लेखांकन पद्धतीविषयक ७/१२ अधिकार अभिलेख पत्रक अद्ययावत करण्यात आले आहे. चालू वर्ष २०२१-२२ हे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून डिजिटल भूमिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ई-महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या सातबारा उताऱ्याची प्रत गावातील तलाठ्यामार्फत प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन मोफत वितरण करण्याचा उपक्रम राबविण्याची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. ही योजना महात्मा गांधी जयंतीपासून राबविण्यात येणार असून, याचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार आहे हे निश्चित.