शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

जलयुक्त शिवार ठरणार शेतकऱ्यांना वरदान!

By admin | Updated: July 1, 2016 01:47 IST

गावात सिंचन व पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीने शासनाची जलयुक्त शिवार ही योजना शेतकरी व गावकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

तालुक्यात भरीव कामे : पाऊस आल्यानंतर भरणार नाले, बंधारेअर्जुनी-मोरगाव : गावात सिंचन व पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीने शासनाची जलयुक्त शिवार ही योजना शेतकरी व गावकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. तालुक्यात याअंतर्गत चांगली कामे झाली आहेत. या योजनेंतर्गत २०१६-१७ या वर्षात कृषी विभागातर्फे बोळदे, करडगाव, भिवखिडकी, परसोडी, येरंडी देवी, डोंगरगाव, सावरटोला, पिंपळगाव व गुढरी येथे कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही कामे १ एप्रिल ते १६ जून २०१७ पर्यंत पूर्ण करावयाची आहेत. २०१५-१६ या वर्षात कृषी विभागातर्फे नवनीतपुर, बोळदे/कवडा, कुंभीटोला व परसटोला या चार गावातील कामे हाती घेण्यात आली होती. ही कामे ३० जूनपर्यंत पूर्णत्वास येत आहेत. गावात जलस्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीने जुन्या नाल्यांचे खोलीकरण, जुने बंधारा दुरुस्ती, भातखाचर, शेततळे, मामा तलावा दुरूस्ती, वनतळे, सिमेंट बंधारे ही कामे या योजनेच्या माध्यमातून केली जात आहेत. १० टक्के मनुष्यबळ व ९० टक्के यांत्रिकी पध्दतीने प्रस्तावित कामे पूर्ण होतील. कोरडवाहू जमिनीत संरक्षित ओलीताच्या दृष्टीने नाला खोलीकरणाची कामे प्रस्तावित झाली आहेत. एक ते दिड मीटर खोलीकरण झाल्याचे पाणी साठा साधारणत: डिसेंबर महिन्यापर्यंत उपलब्ध राहील. एरवी हा साठा आॅक्टोबरपर्यंत राहतो. उशीरापर्यंत पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी वाढीव जलसाठ्याचा लाभ होणार आहे. खोलीकरणामुळे अतिवृष्टी झाली तरी शेतात पाणी साचणार नाही. योग्य वाटेने साचलेले पाणी नाल्यात जाईल. या प्रकारामुळे शेतमालाची नासाडी होण्याची शक्यता राहत नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या व कोरडवाहू गावात अशी कामे मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ग्रामीण भागात आनंद व्यक्त केला जातो तर ९० टक्के यांत्रिकीपध्दतीने कामे होत असल्याने रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून नाराजीचा सूरसुध्दा असतो. गतवर्षी झालेल्या चार कामांवर सुमारे २ कोटी रुपये खर्च झाले. अशी कामे पूर्ण झाल्यानंतर शासनाची परत विस्तारीत योजना आहे. याच ठिकाणी तीन मीटर खोल खड्या (डोह) तयार करून बारमाही पाणी उपलब्ध राहण्याची योजना आहे. वनविभागाने वनतलावात या पध्दतीची कामे सुरू केली आहेत. ही सर्व कामे विभागांतर्गत होत असली तरी या कामांवर देखरेखीसाठी एनजीओ नेमणे आहेत. ते या कामांना भेटी देवून चित्रीकरण करतात व तसा अहवाल शासनाला सादर करीत असल्यामुळे पारदर्शकता आली आहे. शेतकऱ्यांना तलाव, बोडीतील गाळ हवा असल्यास त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च आकारणी करून गाळ उपलब्ध करून दिला जातो. तलाव अथवा बोडीतील गाळ हा शेतजमिनीच्या सुपीकतेसाठी अधिक लाभदायक असतो. एकंदरीत जलयुक्त शिवार ही योजना कोरडवाहू शेतजमिनीच्या मालकांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)कडधान्याचे पिक वाढणारवाढीव जलस्त्रोतांचा कडधान्याचे पीक घेण्यासाठी अधिक लाभ होणार आहे. ग्रामीणांना यांत्रिकी पध्दतीने होणाऱ्या कामात स्वारस्य नसते, मात्र तीच कामे मग्रारोहयोजनेतून केल्यास त्यांना अर्थप्राप्ती होते. पण यांत्रिकी पध्दतीपेक्षा शासनाला चारपटीने खर्च अधिक येतो. तरी सुध्दा काही यंत्रणा ही कामे मग्रारोहयोजनेतून करतात. असा प्रकार करडगाव/बोळदे येथे अनुभवास आला. ज्या भागात तलाव व नाले दुरूस्तीची कामे केली जातात. जलस्त्रोत वाढीमुळे नाल्यापासून १ किमी परिसरातील बोअरवेल्स व विहीरींच्या पाणीसाठ्यात वाढ होते.