शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शेतकऱ्यांनो, सेंद्रीय शेतीचा मार्ग अवलंबा

By admin | Updated: October 27, 2016 00:31 IST

सेंद्रीय शेतीमुळे जमिनीची पोत सुधारते. या शेतीमुळे उत्पन्नात घट येत नाही. उत्पादित मालाला चांगला बाजारभाव मिळते.

जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे : गट प्रशिक्षण कार्यक्र मगोंदिया : सेंद्रीय शेतीमुळे जमिनीची पोत सुधारते. या शेतीमुळे उत्पन्नात घट येत नाही. उत्पादित मालाला चांगला बाजारभाव मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांनी सेंद्रीय शेतीचा मार्ग अवलंबला पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.२५ आॅक्टोबर रोजी गोंदिया येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) अंतर्गत गट प्रशिक्षण कार्यक्र माचे मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी काळे बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के.आर.सराफ, नाशिकचे प्रगतीशील शेतकरी एकनाथ हांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, मी सुध्दा एक शेतकरी असून माङयाकडे देखील शेती आहे. या शेतीतून आंबा, सिताफळ यासह अन्य पिके घेतो. विशेष म्हणजे २००६ पासून मी देखील सेंद्रीय शेती करीत आहे. सेंद्रीय शेती करण्याचा माझा अनुभव अत्यंत चांगला असून पिकांवर रोगराई व किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे किटकनाशकांवर होणारा खर्च नगण्य आहे. सेंद्रीय शेतीतून उत्पादित मालाला बाजारपेठेत चांगला भाव मिळतो.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीतून उत्पादित मालाचे चांगले मार्केटिंग केले पाहिजे असे सांगून जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया येथे सेंद्रिय तांदुळाचे विक्र ी केंद्र तयार करावे त्याला चांगला भाव मिळेल. यासाठी आपण सहकार्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.श्री. चव्हाण म्हणाले, कमी खर्चात चांगली शेती सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून करता येते. सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करु न सेंद्रीय शेती करण्यासाठी त्यांना आग्रह करावा. यावेळी त्यांनी परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. सराफ यांनी सेंद्रीय शेतीमुळे खत व किडीवर होणारा खर्च वाचतो असे सांगितले. जिल्ह्यात सेंद्रीय शेती करणार्या शेतकर्यांच्या शेतीचा बायोडाटा तयार करण्यात आला असून त्या शेतीतील मातीचे नमूने गोळा करु न त्याची तपासणी करण्यात आली आहे. सेंद्रीय शेती करणारे शेतकरी निंबोळी व दशपर्णी अर्क चा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक येथील प्रगतीशील शेतकरी एकनाथ हांडे व गोरेगाव येथील कृषी सहायक आर.बी.सोरदे यांनी या प्रशिक्षणात उपस्थित शेतकर्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी कार्यक्र म नियोजक वैभव मुंडले, कृषी पणन तज्ञ सचिन कुंभार यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गट प्रशिक्षण कार्यक्र माला तिरोडा तालुक्यातील बिहिरीया, चिखली व माल्ही येथील सेंद्रीय शेती करणाऱ्या तीन गटांचे १५० शेतकरी तसेच कृषि विभागाचे अधिकारी व कृषी सहायक यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)