शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

शेतकऱ्यांनो, सेंद्रीय शेतीचा मार्ग अवलंबा

By admin | Updated: October 27, 2016 00:31 IST

सेंद्रीय शेतीमुळे जमिनीची पोत सुधारते. या शेतीमुळे उत्पन्नात घट येत नाही. उत्पादित मालाला चांगला बाजारभाव मिळते.

जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे : गट प्रशिक्षण कार्यक्र मगोंदिया : सेंद्रीय शेतीमुळे जमिनीची पोत सुधारते. या शेतीमुळे उत्पन्नात घट येत नाही. उत्पादित मालाला चांगला बाजारभाव मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांनी सेंद्रीय शेतीचा मार्ग अवलंबला पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.२५ आॅक्टोबर रोजी गोंदिया येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) अंतर्गत गट प्रशिक्षण कार्यक्र माचे मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी काळे बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के.आर.सराफ, नाशिकचे प्रगतीशील शेतकरी एकनाथ हांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, मी सुध्दा एक शेतकरी असून माङयाकडे देखील शेती आहे. या शेतीतून आंबा, सिताफळ यासह अन्य पिके घेतो. विशेष म्हणजे २००६ पासून मी देखील सेंद्रीय शेती करीत आहे. सेंद्रीय शेती करण्याचा माझा अनुभव अत्यंत चांगला असून पिकांवर रोगराई व किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे किटकनाशकांवर होणारा खर्च नगण्य आहे. सेंद्रीय शेतीतून उत्पादित मालाला बाजारपेठेत चांगला भाव मिळतो.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीतून उत्पादित मालाचे चांगले मार्केटिंग केले पाहिजे असे सांगून जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया येथे सेंद्रिय तांदुळाचे विक्र ी केंद्र तयार करावे त्याला चांगला भाव मिळेल. यासाठी आपण सहकार्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.श्री. चव्हाण म्हणाले, कमी खर्चात चांगली शेती सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून करता येते. सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करु न सेंद्रीय शेती करण्यासाठी त्यांना आग्रह करावा. यावेळी त्यांनी परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. सराफ यांनी सेंद्रीय शेतीमुळे खत व किडीवर होणारा खर्च वाचतो असे सांगितले. जिल्ह्यात सेंद्रीय शेती करणार्या शेतकर्यांच्या शेतीचा बायोडाटा तयार करण्यात आला असून त्या शेतीतील मातीचे नमूने गोळा करु न त्याची तपासणी करण्यात आली आहे. सेंद्रीय शेती करणारे शेतकरी निंबोळी व दशपर्णी अर्क चा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक येथील प्रगतीशील शेतकरी एकनाथ हांडे व गोरेगाव येथील कृषी सहायक आर.बी.सोरदे यांनी या प्रशिक्षणात उपस्थित शेतकर्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी कार्यक्र म नियोजक वैभव मुंडले, कृषी पणन तज्ञ सचिन कुंभार यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गट प्रशिक्षण कार्यक्र माला तिरोडा तालुक्यातील बिहिरीया, चिखली व माल्ही येथील सेंद्रीय शेती करणाऱ्या तीन गटांचे १५० शेतकरी तसेच कृषि विभागाचे अधिकारी व कृषी सहायक यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)