शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हक्काच्या कनेक्शनसाठी शेतकऱ्यांची धाव

By admin | Updated: April 18, 2016 04:08 IST

शेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून पंप चालविले जातात. मात्र हे पंप आता आपल्या स्वत:च्या कनेक्शनवरून

कपिल केकत ल्ल गोंदियाशेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून पंप चालविले जातात. मात्र हे पंप आता आपल्या स्वत:च्या कनेक्शनवरून चालविण्याप्रती शेतकरी जागरूक झाला असून कृषी पंप कनेक्शनसाठी शेतकरी धाव घेत आहेत. हेच कारण आहे की, वीज वितरण कंपनीकडे कृषीपंपांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. यंदा मार्च पर्यंत वीज कंपनीने जिल्ह्यात ३६४१ कनेक्शन केले आहेत.वीज चोरीच्या प्रकारात जिल्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत नेहमीच राहतो. वीज चोरीच्या या प्रकारांमुळे वरिष्ठांकडून जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. परिणामी जिल्हास्तरावर मोहिम छेडून वीजचोरांवर कारवाई केली जाते. अशात जे शेतकरी अवैधरित्या वीज घेऊन पंप चालवितात त्यांच्यावरही गाज पडते व मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागतो. एकंदर फायद्यासाठी केलेले काम तोट्यात जाते. आपल्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्याला कृषी पंपांसाठी कनेक्शन देण्यात यावे यासाठी शासन ही प्रयत्नशील असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातूनही राबविल्या जात आहेत.त्यामुळे वीज चोरीचा प्रकार टाळून स्वत:चे हक्काचे कनेक्शन घेऊनच आपला पंप चालवावा एवढी जागरूकता आता शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कृषी पंप कनेक्शनसाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करीत आहेत. यंदा मार्च २०१६ पर्यंत वीत वितरण कंपनीने जिल्ह्यात ३६४१ शेतकऱ्यांना कृषी पंप कनेक्शन दिले आहेत. या कामगिरीवरून जिल्हा कृषी पंप जोडणीत राज्यात अव्वल देखील ठरला आहे हे विशेष. तर शेतकऱ्यांची ही जागरूकता बघता वीज वितरण कंपनीकडूनही निधीच्या उपलब्धेनुसार शेतकऱ्यांच्या या अर्जांवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे.पाच हजार कनेक्शनचे नियोजन ४कृषी पंप जोडणीसाठी शेतकऱ्यांना जास्त काळ वाट बघावी लागू नये यासाठी वीज कंपनीकडून नेहमीच कार्य केले जात आहे. त्यात आता यंदा पाच हजार कनेक्शनसाठीचे नियोजन केले जात असल्याचे अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण यांनी सांगीतले. यासाठी निधी उपलब्ध होताच काम सुरू केले जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगीतले. वीज कंपनीकडे २२०७ पेड पेंडिंग ४वीज कंपनीने ३६४१ शेतकऱ्यांना मार्च पर्यंत कनेक्शन दिले असले तरिही अर्जांची संख्या काही कमी झाली नसून आजही कंपनीकडे २२०७ पेड पेंडिंग (डिमांड भरलेले) अर्ज आहेत. तर येत्या एप्रिल ते मार्च या कालावधीत आणखी सुमारे तीन हजार अर्ज येण्याची शक्यताही अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे.