शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

हक्काच्या कनेक्शनसाठी शेतकऱ्यांची धाव

By admin | Updated: April 18, 2016 04:08 IST

शेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून पंप चालविले जातात. मात्र हे पंप आता आपल्या स्वत:च्या कनेक्शनवरून

कपिल केकत ल्ल गोंदियाशेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून पंप चालविले जातात. मात्र हे पंप आता आपल्या स्वत:च्या कनेक्शनवरून चालविण्याप्रती शेतकरी जागरूक झाला असून कृषी पंप कनेक्शनसाठी शेतकरी धाव घेत आहेत. हेच कारण आहे की, वीज वितरण कंपनीकडे कृषीपंपांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. यंदा मार्च पर्यंत वीज कंपनीने जिल्ह्यात ३६४१ कनेक्शन केले आहेत.वीज चोरीच्या प्रकारात जिल्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत नेहमीच राहतो. वीज चोरीच्या या प्रकारांमुळे वरिष्ठांकडून जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. परिणामी जिल्हास्तरावर मोहिम छेडून वीजचोरांवर कारवाई केली जाते. अशात जे शेतकरी अवैधरित्या वीज घेऊन पंप चालवितात त्यांच्यावरही गाज पडते व मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागतो. एकंदर फायद्यासाठी केलेले काम तोट्यात जाते. आपल्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्याला कृषी पंपांसाठी कनेक्शन देण्यात यावे यासाठी शासन ही प्रयत्नशील असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातूनही राबविल्या जात आहेत.त्यामुळे वीज चोरीचा प्रकार टाळून स्वत:चे हक्काचे कनेक्शन घेऊनच आपला पंप चालवावा एवढी जागरूकता आता शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कृषी पंप कनेक्शनसाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करीत आहेत. यंदा मार्च २०१६ पर्यंत वीत वितरण कंपनीने जिल्ह्यात ३६४१ शेतकऱ्यांना कृषी पंप कनेक्शन दिले आहेत. या कामगिरीवरून जिल्हा कृषी पंप जोडणीत राज्यात अव्वल देखील ठरला आहे हे विशेष. तर शेतकऱ्यांची ही जागरूकता बघता वीज वितरण कंपनीकडूनही निधीच्या उपलब्धेनुसार शेतकऱ्यांच्या या अर्जांवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे.पाच हजार कनेक्शनचे नियोजन ४कृषी पंप जोडणीसाठी शेतकऱ्यांना जास्त काळ वाट बघावी लागू नये यासाठी वीज कंपनीकडून नेहमीच कार्य केले जात आहे. त्यात आता यंदा पाच हजार कनेक्शनसाठीचे नियोजन केले जात असल्याचे अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण यांनी सांगीतले. यासाठी निधी उपलब्ध होताच काम सुरू केले जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगीतले. वीज कंपनीकडे २२०७ पेड पेंडिंग ४वीज कंपनीने ३६४१ शेतकऱ्यांना मार्च पर्यंत कनेक्शन दिले असले तरिही अर्जांची संख्या काही कमी झाली नसून आजही कंपनीकडे २२०७ पेड पेंडिंग (डिमांड भरलेले) अर्ज आहेत. तर येत्या एप्रिल ते मार्च या कालावधीत आणखी सुमारे तीन हजार अर्ज येण्याची शक्यताही अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे.