शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

हक्काच्या कनेक्शनसाठी शेतकऱ्यांची धाव

By admin | Updated: April 18, 2016 04:08 IST

शेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून पंप चालविले जातात. मात्र हे पंप आता आपल्या स्वत:च्या कनेक्शनवरून

कपिल केकत ल्ल गोंदियाशेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून पंप चालविले जातात. मात्र हे पंप आता आपल्या स्वत:च्या कनेक्शनवरून चालविण्याप्रती शेतकरी जागरूक झाला असून कृषी पंप कनेक्शनसाठी शेतकरी धाव घेत आहेत. हेच कारण आहे की, वीज वितरण कंपनीकडे कृषीपंपांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. यंदा मार्च पर्यंत वीज कंपनीने जिल्ह्यात ३६४१ कनेक्शन केले आहेत.वीज चोरीच्या प्रकारात जिल्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत नेहमीच राहतो. वीज चोरीच्या या प्रकारांमुळे वरिष्ठांकडून जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. परिणामी जिल्हास्तरावर मोहिम छेडून वीजचोरांवर कारवाई केली जाते. अशात जे शेतकरी अवैधरित्या वीज घेऊन पंप चालवितात त्यांच्यावरही गाज पडते व मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागतो. एकंदर फायद्यासाठी केलेले काम तोट्यात जाते. आपल्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्याला कृषी पंपांसाठी कनेक्शन देण्यात यावे यासाठी शासन ही प्रयत्नशील असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातूनही राबविल्या जात आहेत.त्यामुळे वीज चोरीचा प्रकार टाळून स्वत:चे हक्काचे कनेक्शन घेऊनच आपला पंप चालवावा एवढी जागरूकता आता शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कृषी पंप कनेक्शनसाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करीत आहेत. यंदा मार्च २०१६ पर्यंत वीत वितरण कंपनीने जिल्ह्यात ३६४१ शेतकऱ्यांना कृषी पंप कनेक्शन दिले आहेत. या कामगिरीवरून जिल्हा कृषी पंप जोडणीत राज्यात अव्वल देखील ठरला आहे हे विशेष. तर शेतकऱ्यांची ही जागरूकता बघता वीज वितरण कंपनीकडूनही निधीच्या उपलब्धेनुसार शेतकऱ्यांच्या या अर्जांवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे.पाच हजार कनेक्शनचे नियोजन ४कृषी पंप जोडणीसाठी शेतकऱ्यांना जास्त काळ वाट बघावी लागू नये यासाठी वीज कंपनीकडून नेहमीच कार्य केले जात आहे. त्यात आता यंदा पाच हजार कनेक्शनसाठीचे नियोजन केले जात असल्याचे अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण यांनी सांगीतले. यासाठी निधी उपलब्ध होताच काम सुरू केले जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगीतले. वीज कंपनीकडे २२०७ पेड पेंडिंग ४वीज कंपनीने ३६४१ शेतकऱ्यांना मार्च पर्यंत कनेक्शन दिले असले तरिही अर्जांची संख्या काही कमी झाली नसून आजही कंपनीकडे २२०७ पेड पेंडिंग (डिमांड भरलेले) अर्ज आहेत. तर येत्या एप्रिल ते मार्च या कालावधीत आणखी सुमारे तीन हजार अर्ज येण्याची शक्यताही अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे.