शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

शेतकऱ्यांनो समूह शेतीतून समृद्धी साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:28 AM

अर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी समूह शेती लाभदायक आहे. शासनाच्या या योजनेत भरीव सबसिडी आहे. वैयक्तिक शेती करून ...

अर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी समूह शेती लाभदायक आहे. शासनाच्या या योजनेत भरीव सबसिडी आहे. वैयक्तिक शेती करून मर्यादित राहण्यापेक्षा या माध्यमातून मोठ्या उद्योगधंद्यांकडे वळावे. आपण यासाठी समूह गटांना सर्वतोपरी सहकार्य करू. प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यात क्लस्टरचे पाच प्रकल्प राबवायचे आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून समूह शेतीची माहिती घेऊन त्याकडे वळावे व आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.

कृषी विभागातर्फे मंगळवारी स्थानिक उमेद भवनात आयोजित कृषीविषयक विविध योजनांबाबत शेतकऱ्यांशी सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रगतशील शेतकरी रतीराम राणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार उपस्थित होते. चंद्रिकापुरे म्हणाले, आदिवासी समाज मोहवृक्षाला देव मानतात. ते त्यांच्यासाठी कल्पवृक्षच आहेत. मोहफूल आता मुक्त झाला आहे. यापासून अनेक वस्तू तयार होऊ शकतात. आपण मोहावर क्लस्टरची आखणी करत आहोत. यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. केशोरी परिसरात मिरचीचे भरपूर उत्पादन होते. त्यामुळे या परिसरात मिरचीचा क्लस्टर तयार होऊ शकतो. मशरूम व्यवसायाला येथे चांगला वाव आहे. मत्स्यपालन क्लस्टर तयार होऊ शकते. प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे क्लस्टर तयार झाले आहेत. मात्र, त्यांच्यात औत्सुक्य दिसत नाही. सर्वप्रथम क्लस्टर प्रमुखांची निवड करून प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय क्लस्टर तयार करा. बांबू, मका व दुग्ध व्यवसायाचे उत्तम क्लस्टर तयार होऊ शकतात. शेतकऱ्यांना श्रीमंतीचे शास्त्रच अवगत नाही. हा परिसर सुजलाम सुफलाम आहे. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. येथे नैसर्गिक साधन संपत्तीचे भांडार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. समूह शेतीतून कारखाने उभारा व समृद्ध व्हा, असे मार्गदर्शन केले. यावेळी घोरपडे व पाटील यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

290721\45221815-img-20210729-wa0001.jpg

मंचावर उपस्थित आ चंद्रिकापुरे, गणेश घोरपडे व मान्यवर