शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शेतकऱ्यांनो समूह शेतीतून समृद्धी साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST

अर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी समूह शेती लाभदायक आहे. शासनाच्या या योजनेत भरीव सबसिडी आहे. वैयक्तिक शेती करून ...

अर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी समूह शेती लाभदायक आहे. शासनाच्या या योजनेत भरीव सबसिडी आहे. वैयक्तिक शेती करून मर्यादित राहण्यापेक्षा या माध्यमातून मोठ्या उद्योगधंद्यांकडे वळावे. आपण यासाठी समूह गटांना सर्वतोपरी सहकार्य करू. प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यात क्लस्टरचे पाच प्रकल्प राबवायचे आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून समूह शेतीची माहिती घेऊन त्याकडे वळावे व आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.

कृषी विभागातर्फे मंगळवारी स्थानिक उमेद भवनात आयोजित कृषीविषयक विविध योजनांबाबत शेतकऱ्यांशी सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रगतशील शेतकरी रतीराम राणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार उपस्थित होते. चंद्रिकापुरे म्हणाले, आदिवासी समाज मोहवृक्षाला देव मानतात. ते त्यांच्यासाठी कल्पवृक्षच आहेत. मोहफूल आता मुक्त झाला आहे. यापासून अनेक वस्तू तयार होऊ शकतात. आपण मोहावर क्लस्टरची आखणी करत आहोत. यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. केशोरी परिसरात मिरचीचे भरपूर उत्पादन होते. त्यामुळे या परिसरात मिरचीचा क्लस्टर तयार होऊ शकतो. मशरूम व्यवसायाला येथे चांगला वाव आहे. मत्स्यपालन क्लस्टर तयार होऊ शकते. प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे क्लस्टर तयार झाले आहेत. मात्र, त्यांच्यात औत्सुक्य दिसत नाही. सर्वप्रथम क्लस्टर प्रमुखांची निवड करून प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय क्लस्टर तयार करा. बांबू, मका व दुग्ध व्यवसायाचे उत्तम क्लस्टर तयार होऊ शकतात. शेतकऱ्यांना श्रीमंतीचे शास्त्रच अवगत नाही. हा परिसर सुजलाम सुफलाम आहे. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. येथे नैसर्गिक साधन संपत्तीचे भांडार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. समूह शेतीतून कारखाने उभारा व समृद्ध व्हा, असे मार्गदर्शन केले. यावेळी घोरपडे व पाटील यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

290721\45221815-img-20210729-wa0001.jpg

मंचावर उपस्थित आ चंद्रिकापुरे, गणेश घोरपडे व मान्यवर