शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

हक्काचे पाणी मिळण्यासाठी वर्षभरापासून शेतकऱ्याची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:36 IST

गोंदिया : नियमित पाणीपट्टी भरूनदेखील शेतकऱ्याला कालव्याचे पाणी देण्यास नवेगावबांध पाटबंधारे विभागाकडून मागील वर्षभरापासून टाळटाळ केली जात आहे. त्यामुळे ...

गोंदिया : नियमित पाणीपट्टी भरूनदेखील शेतकऱ्याला कालव्याचे पाणी देण्यास नवेगावबांध पाटबंधारे विभागाकडून मागील वर्षभरापासून टाळटाळ केली जात आहे. त्यामुळे आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळून शेतीत उत्पादन घेता यावे, यासाठी मागील वर्षभरापासून एक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पाटबंधारे कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे. पण, अद्यापही त्याच्या तक्रारीची दखल घेऊन समस्या मार्गी लावण्यात आली नाही.

शासकीय काम आणि महिनाभर थांब असे म्हटले जात असले, तरी वर्षभर प्रतीक्षा करून प्रशासनाकडून कुठलीच कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्याला शेती करण्यापासून वंचित राहावे लागत आहे. नंदलाल सखाराम चांदेवार, रा. गोंडउमरी, ता. सडक अर्जुनी असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. चांदेवार यांची सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा येथे २.४४ हेक्टर आर शेती आहे. या शेतीला नवेगावबांध पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या कालव्याचे पाणी देणे लागू आहे. यासाठी ते नियमित पाणीपट्टीदेखील भरतात. चांदेवार यांनी नवेगावबांध पाटबंधारे विभागाकडे अर्ज करून रब्बी हंगामासाठी कालव्याचे पाणी नियमानुसार देण्याची मागणी केली. मात्र, या विभागाने कालव्याचे पाणी न दिल्याने त्यांना उत्पन्न घेण्यापासून वंचित राहावे लागले. रब्बी हंगामात लावलेल्या पिकासाठी पाणी न मिळाल्याने त्यांना पीक घेण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे झालेली नुकसानभरपाई मिळावी व नियमानुसार कालव्याचे पाणी देण्यात यावे. याकरिता जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पाटबंधारे विभाग यांच्याकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. तसेच प्रत्यक्षात जाऊन तक्रारसुद्धा केली. याला वर्षभराचा कालावधी लोटूनही त्यांच्या तक्रारीची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे चांदेवार यांची पायपीट कायम असून प्रशासन दखल घेत नसले, तरी लोकप्रतिनिधी याची दखल घेऊन कारवाई करतील, असा सवाल चांदेवार यांनी केला आहे.