शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

हक्काचे पाणी मिळण्यासाठी वर्षभरापासून शेतकऱ्याची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:36 IST

गोंदिया : नियमित पाणीपट्टी भरूनदेखील शेतकऱ्याला कालव्याचे पाणी देण्यास नवेगावबांध पाटबंधारे विभागाकडून मागील वर्षभरापासून टाळटाळ केली जात आहे. त्यामुळे ...

गोंदिया : नियमित पाणीपट्टी भरूनदेखील शेतकऱ्याला कालव्याचे पाणी देण्यास नवेगावबांध पाटबंधारे विभागाकडून मागील वर्षभरापासून टाळटाळ केली जात आहे. त्यामुळे आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळून शेतीत उत्पादन घेता यावे, यासाठी मागील वर्षभरापासून एक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पाटबंधारे कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे. पण, अद्यापही त्याच्या तक्रारीची दखल घेऊन समस्या मार्गी लावण्यात आली नाही.

शासकीय काम आणि महिनाभर थांब असे म्हटले जात असले, तरी वर्षभर प्रतीक्षा करून प्रशासनाकडून कुठलीच कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्याला शेती करण्यापासून वंचित राहावे लागत आहे. नंदलाल सखाराम चांदेवार, रा. गोंडउमरी, ता. सडक अर्जुनी असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. चांदेवार यांची सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा येथे २.४४ हेक्टर आर शेती आहे. या शेतीला नवेगावबांध पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या कालव्याचे पाणी देणे लागू आहे. यासाठी ते नियमित पाणीपट्टीदेखील भरतात. चांदेवार यांनी नवेगावबांध पाटबंधारे विभागाकडे अर्ज करून रब्बी हंगामासाठी कालव्याचे पाणी नियमानुसार देण्याची मागणी केली. मात्र, या विभागाने कालव्याचे पाणी न दिल्याने त्यांना उत्पन्न घेण्यापासून वंचित राहावे लागले. रब्बी हंगामात लावलेल्या पिकासाठी पाणी न मिळाल्याने त्यांना पीक घेण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे झालेली नुकसानभरपाई मिळावी व नियमानुसार कालव्याचे पाणी देण्यात यावे. याकरिता जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पाटबंधारे विभाग यांच्याकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. तसेच प्रत्यक्षात जाऊन तक्रारसुद्धा केली. याला वर्षभराचा कालावधी लोटूनही त्यांच्या तक्रारीची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे चांदेवार यांची पायपीट कायम असून प्रशासन दखल घेत नसले, तरी लोकप्रतिनिधी याची दखल घेऊन कारवाई करतील, असा सवाल चांदेवार यांनी केला आहे.