शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

रब्बीच्या धान खरेदीकडे शेतकऱ्यांच्या नजरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST

नवेगावबांध : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर खरिपात खरेदी केलेल्या धानाने गोदाम भरले असून काही ठिकाणी धानाचे पोते उघड्यावर ...

नवेगावबांध : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर खरिपात खरेदी केलेल्या धानाने गोदाम भरले असून काही ठिकाणी धानाचे पोते उघड्यावर ठेवण्यात आले आहेत. भरडाईसाठी व्यापाऱ्यांनी धानाची उचल केली नसल्यामुळे सर्व गोदाम हाऊसफुल्ल आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील धानाची खरेदी आधारभूत केंद्रांवर होणार की नाही, याबाबत शंका असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

रब्बी हंगामातील धान पीक येत्या काही दिवसांत बाजारपेठेत येणार आहेत. त्या धानाची खरेदी वेळेत झाली नाही तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन सर्वच्या सर्व धान पावसात भिजण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रशासनाने तयारी करून धान खरेदी केली नाही तर शेतकऱ्यांच्या डोक्याचा ताप वाढणार आहे हे मात्र निश्चित. रब्बी हंगामातील धान येत्या एक महिन्यात धान खरेदीसाठी केंद्रांवर येईल. त्यावेळी प्रशासनाने आधारभूत हमीभाव केंद्रावर धान खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. असे झाले नसेल तरी शेतकऱ्यांचे धान पावसाळ्यात भिजेल आणि धान खरेदी रखडेल व व्यापारी वर्गाकडून या धानाला मातीमोल भावाने खरेदी केले जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. मातीमोल भाव मिळूनसुद्धा त्या धानाचे पैसे वेळेवर मिळणार की नाही, याचीसुद्धा शाश्वती शेतकऱ्यांना नाही. म्हणून प्रशासनाने हमीभाव दराने धान खरेदी करावी व त्यासाठीची तयारी प्रशासनाने वेळेच्या आत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.