शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

बळीराजा गुंतला मशागतीच्या कामाला

By admin | Updated: June 15, 2015 00:48 IST

निसर्गाच्या लहरीपणाची जाणीव बळीराजाला असून सुद्धा नव्या विश्वासाने, नव्या देमाने या भागातील शेतकरी मान्सून ...

केशोरी : निसर्गाच्या लहरीपणाची जाणीव बळीराजाला असून सुद्धा नव्या विश्वासाने, नव्या देमाने या भागातील शेतकरी मान्सून हवामानाचा अंदाज घेवून व सर्व दु:खे बाजूला सारुन निसर्ग यावर्षी आपल्याला चांगली साथ देईल. या भोळ्या समजवूत्तीने रखरखत्या उन्हात शेतीच्या मशागतीच्या कामात शेतकरी वर्ग लागल्याचे चित्र दिसून येत आहेत.या वर्षीचे उन्हाळी धानपिक शेतकऱ्यांच्या हातात पडले. परंतु धानाला योग्य भाव आणि आधारभूत केंद्रावरील वाढत्या गर्दीने शेतकऱ्यांना निराशच व्हावे लागते. केव्हा बारदान्याअभावी तर कधी जागे अभावी शेतकऱ्यांचे धान घेण्यास आधारभूत केंद्र टाळत असल्याचे सांगण्यात आले. असे प्रसंग शेतकऱ्यांवरती येवूनही नव्या उमेदीने वेळात वेळ काढून शेतातील पालापाचोळा जाळणे, नागरणी करुन ठेवणे, तणनाशक औषध टाकून ठेवणे, शेणखत टाकणे इत्यादी कामे परिसरात दृष्टी टाकल्यानंतर बळीराजा मोठ्या जोमाने काम करीत असल्याचे दिसून येते.धानाला योग्य भाव मिळत नसताना देखील धानाचे उत्पादन काढण्याचा सतत शेतकरी प्रयत्न करीत असतो. धानाच्ळा योग्य भावासंबंधी कोणाकडे दाद मागावी हा नेहमीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. परंतु माझी भात खाणारी लेकरं उपासी राहू नयेत या भावनेने बळीराजा शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. उन्हाची तीव्रता अधिक असताना सुद्धा शेतकऱ्यांना उन्हाची पर्वा नाही. धान शेतीत उत्पन्न कसा घेता येईल, याचाच विचार शेतकरी करीत असतो. फक्त निसर्गाने साथ देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)