शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शेतकरी दोन वर्षांपासून नुकसानभरपाईपासून वंचित

By admin | Updated: May 9, 2014 01:46 IST

शेतकऱ्यांवर विविध प्रकारचे सातत्याने संकटे येत आहेत. शासनाच्या विविध योजना असल्या तरी कोणत्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना स्वखुशीने देण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्यांची भूमिका सकारात्मक दिसून येत नाही.

काचेवानी : शेतकऱ्यांवर विविध प्रकारचे सातत्याने संकटे येत आहेत. शासनाच्या विविध योजना असल्या तरी कोणत्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना स्वखुशीने देण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्यांची भूमिका सकारात्मक दिसून येत नाही. असेच उदाहरण तिरोडा वनविभागांतर्गत पहावयास मिळते. तब्बल दोन वर्षे पूर्ण झाले तरीही नुकसानभरपाई आजपर्यंत देण्यात आलेली नाही. तिरोडा वनविभागांतर्गत डुकरांच्या धान नासाडीचे १५० च्या वर प्रकरणे २०१२-१३ मध्ये पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही अपवाद वगळता ७५ टक्के प्रकरण आजही निकाली काढण्यात आले नाही. २०१३-१४ मध्ये ५३ प्रकरण तयार करण्यात आले. परंतु त्यावर कसलीही कारवाई करण्यात आली नाही. वनविभाग जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करत नाही. तसेच या प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाईसुद्धा वेळेत केली जात नाही. त्यामुळे शेतकरी वन विभागाच्या नावाने खूप संतापले आहेत.

काचेवानी तलाठी साज्यांतर्गत नेतराम माने यांच्या शेतातील धानाची नासाडी सन २०१२-१३ मध्ये झाली होती. याचे प्रस्ताव वनविभागने तयार करुन पाठविले होते. परंतु आज दोन वर्षे पूर्ण झाले असून नुकसानभरपाई हाती लागली नाही. २० हजाराचे नुकसान झाले तर अर्धीसुद्धा भरपाई मंजूर केली जात नाही. केले तर दोन ते तीन वर्षे शेतकर्‍यांना देण्यात येत नाही. शेतकर्‍यांच्या मानसिक त्रास आणि आर्थिक अडचणीसाठी हे अधिकारी आणि शासनच दोषी असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. वनपरिक्षेत्राधिकारी तिरोडा यांच्या कार्यालयात डुकराने केलेल्या धानाच्या नुकसान भरपाईच्या माहितीबाबत विचारल्यावर, गोंदिया डिव्हीजनला पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.नेतराम माने यांनी सांगितले की, २०१२ चे प्रस्ताव वन विभाग तिरोडा यांनी पाठविले. सदर प्रस्ताव गोंदिया कार्यालयाने मंजूर केले. परंतु काही कमतरतेमुळे परत करण्यात आले. ते त्वरीत पूर्ण करुन पुन्हा पाठविण्यात आले. आज पाच महिने पूर्ण होत आहेत, परंतु मंजूर झालेले प्रस्ताव पाठविण्यात आले नाही.डुकरांच्या नुकसानीमुळे झालेल्या धान्याच्या नापसाडीचे नुकसान भरपाई प्रस्ताव त्वरीत पाठवित आहोत. प्रलंबित असलेले प्रस्ताव त्वरीत द्या. आपण त्याचवेळी व दिवसी डिव्हिजनला पाठवू. शेतकर्‍यांच्या नुकसानीची तातडीने दखळ घेतली जाईल. (वार्ताहर)