शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, भाजपाच्या काळात आले का अच्छे दिन?

By admin | Updated: June 28, 2015 01:18 IST

धानाला ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचा वादा करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी सांगावे की यावर्षी धानाला किती भाव मिळाला, ...

पटेलांचा सवाल : विविध ठिकाणी निवडणूक प्रचारसभागोंदिया : धानाला ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचा वादा करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी सांगावे की यावर्षी धानाला किती भाव मिळाला, असे म्हणत शेतकरी बंधुनो, भाजपाच्या काळात आपल्यासाठी अच्छे दिन आलेत काय, असा प्रश्न राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात जाहीर सभामध्ये विचारला.खा.पटेल म्हणाले, शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महागाई प्रचंड वाढली, सर्वसामान्यांच्या जेवणातून दाळ तर गायबच झाली आहे. हेच आहेत का आपल्यासाठी अच्छे दिन, असा खोचक सवाल पटेल यांनी विचारला. केंद्रातील सरकारने बेरोजगारांना रोजगार देण्याचे केवळ स्वप्न दाखविले. आपल्या भागातील किती युवकांना रोजगार मिळाला? या सरकारने युवकाची फसवणुक केली. भूमि अधिग्रहण हा कायदा आणून शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचे षडयंत्र हे भाजपा सरकार करीत आहे. आपल्या जिल्ह्यासाठी वर्षभरात नवीन रेल्वे मिळाली काय, खत व बियाण्यांची कमतरता दूर झाली काय? असे प्रश्न विचारत प्रफुल्ल पटेल यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली.शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक व आपणासर्वांची फसवणूक करणाऱ्या या भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत धडा शिकवून नेहमी विकासाची भूमिका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)