शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:32 IST

अर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास जिल्हा मध्यवर्ती बँक टाळाटाळ करीत आहे. वसुलीचे कारणे सांगून शेतकऱ्यांना पीक कर्जापासून ...

अर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास जिल्हा मध्यवर्ती बँक टाळाटाळ करीत आहे. वसुलीचे कारणे सांगून शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान सेंट्रल बँकेमार्फत होत आहे. गरजू शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्यास उपोषणाचा इशारा स्थानिक को-ऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक टेकचंद परशुरामकर यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत नवीन सभासद नोंदणी करण्यात आली. जुने सभासद मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांना सभासदत्व देण्यात आले. या सभासदांना नियमाप्रमाणे बँकांनी पीक कर्ज द्यायला हवे मात्र विविध कारणे सांगून शेतकऱ्यांना पिक कर्ज दिले जात नाही.ज्या सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्या शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पीक कर्ज थकीत असल्याचे कारण सांगून नियमित शेतकऱ्यांना डावलले जात आहे. कर्ज वसुलीमध्ये जिल्ह्यातील तालुके मागे आहेत. अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांचा यात काय दोष आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्याची वसुली ८० टक्क्यांच्यावर असताना पीक कर्ज न मिळणे ही शोकांतिका आहे. मागील वर्षीच्या खरिपाचा बोनस आणि यावर्षीच्या रब्बी हंगामातील धान विक्रीचे चुकारे शासनाने दिले नाहीत. त्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. शेतकऱ्यांनी व्यापारी, सावकारांकडून उसनवार करून लागवड केली. रोवणी, खत, किटनाशक औषध, मजुरी आदी खर्च शेतकऱ्यांनी करायचा कुठून? याचा विचार करून जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने नवीन सभासद, कर्जमाफी लाभार्थी सभासद आणि वारसान सभासदांना त्वरित कर्ज पुरवठा करावा अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी बँकेचे संचालक भोजराम रहिले यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक ललित बाळबुद्धे,नाना शहारे, तुलाराम लांजेवार,मधुकर पर्वते, सभासद रमेश झोडे, किशोर शहारे, अरुणा मस्के, केशव खोब्रागडे, नीलकंठ शाहारे उपस्थित होते.

......

वरिष्ठांशी चर्चेनंतर निर्णय

शेतकऱ्यांनी निवेदन दिले. या निवेदनाबाबत वरिष्ठांशी चर्चा करू. मुख्यालयाचे आदेश मिळाल्यानंतर नवीन सभासदांना कर्ज वाटपाविषयी कळविण्यात येईल. या प्रक्रियेला दहा दिवसांचा अवधी लागू शकतो अशी माहिती बँकेचे व्यवस्थापक परशुरामकर यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिली.

180821\08041629-img-20210818-wa0004.jpg

बँक व्यवस्थापकांना निवेदन देतांना शेतकरी