शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

तहसील कार्यालयावर शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:29 IST

सन १९३६ मध्ये देशात पहिल्यांदा शेतकºयांची संघटना स्थापन करण्यात आली. तेव्हापासून अखिल भारतीय किसान सभा १ सप्टेंबर हा मागणी दिवस म्हणून साजरा करते.

ठळक मुद्देतहसीलदारांना दिले निवेदन : मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सन १९३६ मध्ये देशात पहिल्यांदा शेतकºयांची संघटना स्थापन करण्यात आली. तेव्हापासून अखिल भारतीय किसान सभा १ सप्टेंबर हा मागणी दिवस म्हणून साजरा करते. या निमित्ताने बस स्थानकावरुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव व मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात शेतकरी व शेतमजुरांचा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.केंद्रात व राज्यात विद्यमान सरकार आल्यापासून कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणात कमी होण्याऐवजी वाढच झाली आहे. दिवसागणिक ती वाढ होत आहे. हा प्रकार आता धान पट्यातही पोहोचला आहे. यावर तातडीचा उपाय म्हणून शेतकºयांची सरसकट कर्जमाफी ही आहे.मात्र फडणवीस सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी सिध्द होत अहे. तेव्हा सरसकट कर्जमाफी देऊन शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यात यावा. केंद्र व राज्य सरकारच्या प्रमुखांनी निवडणुकीत घसा कोरडा होईपर्यंत डरकाळ््या फोडून स्वामीनाथन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. पण आता केंद्र सरकारने यावर असमर्थता दर्शविली आहे. देशातील शेतकºयांची ही फसवणूक दूर करण्यात यावी व तात्काळ स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा. वनाधिकारी कायदा २००५ मधील इतर पारंपरीक वननिवासी तथा गैरआदिवासींकरिता असलेली तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी. वनाधिकार कायद्याखाली दावे सादर करणाºयांचे दावे प्रक्रिया प्रकरणात दावेदारांना काहीच माहिती दिली जात नाही. तेव्हा त्यांना याबद्दल संधी देण्यात यावी. जिल्हा वनहक्क समितीने दावा फेटाळल्यास त्यांना राज्य सनियंत्रण समितीकडे दाद मागण्यांची सोय करुन देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.गोंदिया, मुंडीपार ता.सडक-अर्जुनी येथील किसान ग्रामपंचायत व नागरिकांनी केलेल्या मागणीप्रमाणे त्या गावातील तलावाची खासगी मालकी असलेली नोंद रद्द करुन ती सार्वजनिक तलाव अशी नोंद करण्यात यावी. तलावाचे नियंत्रण अधिकार संबंधित ग्रामपंचायत किंवा शासकीय एजेन्सीला देण्यात यावे, या मागणीचा सुद्धा निवेदनात समावेश आहे.सदर मोर्चात मिलिंद गणवीर, अशोक मेश्राम, ललित वैद्य, जोमा बावणकर, उध्दव कडुकार, दमयंता वासनिक, धनलाल रंगारी, नाजुकराव मेश्राम, मूलचंद बंसोड आदीउपस्थित होते.