शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयावर शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:29 IST

सन १९३६ मध्ये देशात पहिल्यांदा शेतकºयांची संघटना स्थापन करण्यात आली. तेव्हापासून अखिल भारतीय किसान सभा १ सप्टेंबर हा मागणी दिवस म्हणून साजरा करते.

ठळक मुद्देतहसीलदारांना दिले निवेदन : मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सन १९३६ मध्ये देशात पहिल्यांदा शेतकºयांची संघटना स्थापन करण्यात आली. तेव्हापासून अखिल भारतीय किसान सभा १ सप्टेंबर हा मागणी दिवस म्हणून साजरा करते. या निमित्ताने बस स्थानकावरुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव व मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात शेतकरी व शेतमजुरांचा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.केंद्रात व राज्यात विद्यमान सरकार आल्यापासून कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणात कमी होण्याऐवजी वाढच झाली आहे. दिवसागणिक ती वाढ होत आहे. हा प्रकार आता धान पट्यातही पोहोचला आहे. यावर तातडीचा उपाय म्हणून शेतकºयांची सरसकट कर्जमाफी ही आहे.मात्र फडणवीस सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी सिध्द होत अहे. तेव्हा सरसकट कर्जमाफी देऊन शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यात यावा. केंद्र व राज्य सरकारच्या प्रमुखांनी निवडणुकीत घसा कोरडा होईपर्यंत डरकाळ््या फोडून स्वामीनाथन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. पण आता केंद्र सरकारने यावर असमर्थता दर्शविली आहे. देशातील शेतकºयांची ही फसवणूक दूर करण्यात यावी व तात्काळ स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा. वनाधिकारी कायदा २००५ मधील इतर पारंपरीक वननिवासी तथा गैरआदिवासींकरिता असलेली तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी. वनाधिकार कायद्याखाली दावे सादर करणाºयांचे दावे प्रक्रिया प्रकरणात दावेदारांना काहीच माहिती दिली जात नाही. तेव्हा त्यांना याबद्दल संधी देण्यात यावी. जिल्हा वनहक्क समितीने दावा फेटाळल्यास त्यांना राज्य सनियंत्रण समितीकडे दाद मागण्यांची सोय करुन देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.गोंदिया, मुंडीपार ता.सडक-अर्जुनी येथील किसान ग्रामपंचायत व नागरिकांनी केलेल्या मागणीप्रमाणे त्या गावातील तलावाची खासगी मालकी असलेली नोंद रद्द करुन ती सार्वजनिक तलाव अशी नोंद करण्यात यावी. तलावाचे नियंत्रण अधिकार संबंधित ग्रामपंचायत किंवा शासकीय एजेन्सीला देण्यात यावे, या मागणीचा सुद्धा निवेदनात समावेश आहे.सदर मोर्चात मिलिंद गणवीर, अशोक मेश्राम, ललित वैद्य, जोमा बावणकर, उध्दव कडुकार, दमयंता वासनिक, धनलाल रंगारी, नाजुकराव मेश्राम, मूलचंद बंसोड आदीउपस्थित होते.