शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पुन्हा व्यापाऱ्यांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:21 IST

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनातर्फे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन जिल्हा मार्केटींग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी करते.

ठळक मुद्देधान खरेदीचा सावळा गोंधळ : संचालकाकडून चौकशीचे कारण पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीचा सण चार दिवसांवर आला आहे. मात्र अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्राचा सावळा गोंधळ कायम आहे. त्यामुळे गरजेपोटी शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली. तर खासगी व्यापारी याचा संधीचा फायदा घेत असून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सातशे ते आठशे रुपये कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कायम आहे.शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनातर्फे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन जिल्हा मार्केटींग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी करते. यंदा शासनाने जिल्हा मार्केटींग आणि आदिवासी विकास महामंडळाच्या एकूण १४० धान खरेदी केंद्राना मंजुरी दिली आहे.तर अ दर्जाच्या धानाला १८६८ आणि सर्वसाधारण धानाला १८८८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. १४० धान खरेदी केंद्राना मंजुरी दिली असली तरी अद्यापही धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.सध्या शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी केली असून ते विक्री करुन दिवाळी साजरी करण्याच्या हेतूने धान बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत. मात्र धान खरेदी केंद्रावर पोहचल्यानंतर अद्यापही खरेदी सुरु झाली नसल्याने त्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांच्या दारात जावून धानाची विक्री करावे लागत आहे. खासगी व्यापारी सुध्दा याचा फायदा घेत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५०० ते ७०० रुपये कमी दराने धान खरेदी करीत आहे. हा प्रकार सध्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कायम आहे. धान खरेदी केंद्राचा सावळा गोंधळ सुरू असताना याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने शेतकरी वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.चौकशी भीती की आणखी काहीआदिवासी विकास महामंडळाच्या ७० धान खरेदी केंद्राना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र अद्यापही पूर्ण खरेदी केंद्र सुरू झाले नाही. काही विविध सहकारी संस्थेचे संचालक मंडळ एसआयटी चौकशीेचे कारण पुढे धान खरेदी सुरू करण्यास नकार देत आहे. त्यामुळे धानाची विक्री करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने त्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांच्या दारात जावून धानाची विक्री करावी लागत आहे.खरेदीच्या कालावधीत चौकशी हेतू काय?ल्लसध्या खरीप हंगामातील धान खरेदीचा हंगाम सुरू आहे. मात्र मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. याची सध्या एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. वास्तविक ही चौकशी धान खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वीच करायला हवी होती. मात्र धान खरेदीची वेळ असताना आता चौकशी केली जात असल्याने याचे कारण पुढे केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी तर हा सर्व खटोटोप तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई कराजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही धान खरेदी केंद्र सुरू करण्यास टाळटाळ करुन शेतकऱ्यांची कोंडी करणाऱ्या धान खरेदीच्या संचालकावर कारवाई करुन त्यांचा खरेदीचा परवाना रद्द करुन नवीन धान खरेदी केंद्रास परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.